शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांच्या जिवांशी खेळ : नागपूर विदर्भातील स्फोटकांच्या कंपन्यांमधील गैरकारभारांची चाैकशी;  'स्फोटक अहवाल' लवकरच सरकारकडे

By नरेश डोंगरे | Updated: July 2, 2024 00:59 IST

...या कंपन्यातील गलथाणपणाचा 'स्फोटक अहवाल' तयार होत असल्याची खास सूत्रांची माहिती आहे.

नरेश डोंगरे -

नागपूर : ९ जिवांचे बळी घेणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीतील स्फोटाच्या घटनेनंतर सरकारी यंत्रणांकडून ठिकठिकाणच्या स्फोटकांच्या (एक्सप्लोसिव्ह) कंपन्यांमधील गैरकारभाराची गोपनिय पद्धतीने चाैकशी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, नागपूर-विदर्भातील अनेक जिल्ह्यातील स्फोटकांच्या कारखान्यात आकस्मिक भेटी देऊन संबंधित अधिकाऱ्यांच्या पथकाने तेथील तपासणी केल्याची माहिती आहे. अनेक कंपन्यांनी कामगारांच्या जिवाचा खेळ मांडल्याचे धक्कादायक वास्तव या तपासणीतून पुढे आले असून, या कंपन्यातील गलथाणपणाचा 'स्फोटक अहवाल' तयार होत असल्याची खास सूत्रांची माहिती आहे.

नागपूर जिल्ह्यातील धामना-लिंगा या छोट्याशा गावात असलेल्या चामुंडी एक्सप्लोसिव्ह प्रा. लि. कंपनीत १३ जूनला भीषण स्फोट झाला होता. त्यात प्राची श्रीकांत फलके (१९), वैशाली आनंदराव क्षीरसागर (२०), प्रांजली किसनाजी मोंदरे (२२), मोनाली शंकरराव अलोने (२५), शीतल आशिष चटप (३०), श्रद्धा वनराज पाटील (२२, सर्व रा. धामना), पन्नालाल बंदेवार (६०, रा. सातनवरी) दानसा मरसकोल्हे (२६, रा. मध्य प्रदेश) आणि प्रमोद चवारे (२५, रा. नेरी) या ९ जणांचा बळी गेला होता.या स्फोटापूर्वी चामुंडी कंपनीत सुरक्षेच्या कसल्याही उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. स्फोटके हाताळणाऱ्या कामगारांना मृत्यूच्या जबड्यात ढकलून देणाऱ्या या कंपनीत प्रशासनाने साधी आग विझविण्याची सोय करून ठेवली नव्हती. रुग्णवाहिकादेखिल तेथे उपलब्ध नव्हती. त्यामुळे स्फोटात गंभीर जखमी झालेल्या तरुण-तरुणींना अनेक तास कंपनीच्या आवारातच जिवघेण्या वेदना सहन कराव्या लागल्या. ते तडफडत असताना कंपनी प्रशासनाने तातडीने उपचाराची व्यवस्था करून दिली नाही. त्याचमुळे त्यांचा मृत्यू झाला. या भीषण घटनेनंतर 'लोकमत'ने या घटनेशी संबंधित अनेक पैलू उघड केले. त्यासंबंधाने समाजाच्या सर्वच क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर या स्फोटाच्या घटनेची तसेच या कंपनीसह स्फोटकांच्या नागपूर विदर्भातील कंपन्यातील गलथानपणाची चाैकशी करण्यासाठी एक समिती निर्माण करण्यात आली. या पार्श्वभूमीवर, नागपूर विदर्भातील २४ कंपन्यांची पोलीस, औद्योगिक सुरक्षा विभाग, आरोग्य विभाग आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोपनिय चाैकशी केल्याची माहिती आहे.अधिकाऱ्यांकडून ओठावर बोट -या संबंधाने पोलीस तसेच अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी यावर बोलण्याचे टाळले. काही अधिकाऱ्यांनी तर फोनच उचलण्याचे टाळले. तर, ही चाैकशी वरिष्ठ पातळीवर असल्याने आमचे या संबंधाने काहीही बोलणे योग्य नसल्याचे काही अधिकारी म्हणाले.

...तर, विधिमंडळात अहवाल! -विशेष म्हणजे, सध्या राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. स्फोटकाच्या अनेक कंपन्यात गलथानपणा चाैकशी करणाऱ्यांना आढळला असून, त्यामुळे कामगारांच्या जिवाला धोका होण्याची भीती अधोरेखित झाल्याचे सूत्रांचे सांगणे आहे. त्यासंबंधाने एक 'स्फोटक अहवाल' तयार होत आहे. अधिवेशनात चामुंडीच्या कंपनीतील स्फोटाचा मुद्दा उपस्थित झाल्यास हा अहवाल उत्तरादाखल सादर केला जाऊ शकतो, अशीही खास सूत्रांची माहिती आहे.

टॅग्स :Blastस्फोटnagpurनागपूरState Governmentराज्य सरकार