शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

जडीबुटी विकणऱ्या वैदू समाजाच्या १५ कुटुंबांना गावातून हाकलण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 12:16 IST

नरसाळा गटग्रामपंचायतीच्या सदस्यांनी या भटक्या जमातीतील लाेकांना गावाबाहेर हाकलण्याचा ठरावच पारित केला आहे. संविधानिक मानवाधिकाराचे सर्रास हनन हाेत असताना प्रशासन मात्र मूग गिळून बसले आहे.

ठळक मुद्देनरसाळा ग्रामपंचायतीने पारित केला ठराव : १० वर्षांपासून कुंभापूरला वास्तव्य

निशांत वानखेडे

नागपूर : गावाेगावी भटकंती करून जडीबुटीची औषधी विकणाऱ्या वैदू समाजातील १५ कुटुंबांना गावातून हाकलून लावण्यासाठी गावकरीच उठले आहेत. माैदा तालुक्यातील नरसाळा गटग्रामपंचायतीअंतर्गत कुंभापूर या गावी हा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. या १५ कुटुंबातील ७५ माणसे मागील १० वर्षांपासून या गावात वास्तव्यास आहेत. नरसाळा गटग्रामपंचायतीच्या सदस्यांनी या भटक्या जमातीतील लाेकांना गावाबाहेर हाकलण्याचा ठरावच पारित केला आहे. संविधानिक मानवाधिकाराचे सर्रास हनन हाेत असताना प्रशासन मात्र मूग गिळून बसले आहे.

जंगलातील औषधी जडीबुटी आणून त्याची औषधी बनवून गावाेगावी विकणे हे या वैदू समाजाचे पारंपरिक काम. इंग्रजपूर्व काळात हाेणाऱ्या युद्धात जखमी सैनिकांवर जडीबुटीच्या औषधाने उपचार करण्याचा त्यांचा हातखंडा हाेता. ‘राज गेले की राजपाट जाते’, असे म्हणतात. तशीच अवस्था या वैदू समाजाची झाली आहे. ना सरकारी दप्तरात नाेंद, रेशन कार्ड, व्हाेटिंग कार्ड, आधार कार्ड अशी सरकारी नाेंदही नाही. यांची मुलेही कधी शाळेत गेली नाहीत. कुठे एखाद्या गावी बस्तान बसविले तर गावकरीही त्यांना राहू देत नाहीत.

असाच प्रकार कुंभापूर गावी घडत आहे. हे गाव तसे कन्हान नदीच्या पूरग्रस्त भागात येते. त्यामुळे या जागेवर सरकारी याेजना राबविल्या जात नाहीत. अशा जागेवर या कुटुंबांनी १० वर्षांपासून बस्तान बसविले आहे. मात्र, आता गावकरी त्यांच्या जीवावर उठले आहेत. नरसाळा ग्रामपंचायतीने यांना गावातून हाकलण्याचा ठराव पारित केला आणि या लाेकांना दाेन दिवसांत जागा खाली करण्याचे नाेटीसही बजावले. ही बाब लक्षात आल्यानंतर संघर्ष वाहिनीची टीम या गावात गेली तेव्हा १५ वैदू कुटुंबांवर हाेत असलेल्या अन्यायाचे विदारक वास्तव समाेर आले. संघटनेचे दीनानाथ वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार या लाेकांना चाेर ठरवून गावातून हाकलण्यासाठी ग्रामस्थ सरसावले आहेत. याबाबत त्यांनी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांशी चर्चा केली पण त्यांनी व्यथा ऐकून घ्यायला नकार दिला. त्यांनी तहसीलदारांची भेट घेतली. पण त्यांच्याकडूनही समाधान झाले नाही. तेव्हा या लाेकांनी जावे कुठे, असा सवाल वाघमारे यांनी केला.

भटक्यांना स्वातंत्र्याचे ‘अमृत’ कधी?

तहसीलदारांची भेट घेतली असता त्यांनी वैदू कुटुंबांना सहा महिन्यांची मुदत दिली. त्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यास सांगितले. मात्र, त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी काेण घेणार की त्यांना येथून पळावे लागेल, असा सवाल वाघमारे यांनी उपस्थित केला. ते या देशातील लाेक नाहीत का, त्यांना शासकीय याेजनांचा लाभ कधी मिळेल, त्यांना गावातून हाकलण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला कुणी दिला, असे प्रश्न त्यांनी विचारले. स्वातंत्र्याचा अमृत महाेत्सव साजरा हाेत असताना या भटक्यांना स्वातंत्र्याचे अमृत कधी मिळेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

यांची मुले आली तर आमची मुले शाळेतून काढू

या वैदूंच्या कुटुंबात २५ शाळाबाह्य मुले आहेत. संघर्ष वाहिनीने याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. शिक्षण समन्वयक प्रसेनजित गायकवाड यांनी स्थानिक शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटून मुलांना दाखल करण्यास सांगितले. मात्र, या मुलांना शाळेत घ्याल तर आम्ही आमची मुले शाळेतून काढू, असा सज्जड इशारा गावकऱ्यांनी दिला. इतका टाेकाचा भेदभाव का, असा सवाल येताे. सध्यातरी वयानुसार मुख्याध्यापक व अंगणवाडी सेविकांनी मुलांची नाव नाेंदणी केली आहे. पण पुढे काय हाेईल, याबाबत शंका आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतSocialसामाजिकnagpurनागपूर