शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

जडीबुटी विकणऱ्या वैदू समाजाच्या १५ कुटुंबांना गावातून हाकलण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 12:16 IST

नरसाळा गटग्रामपंचायतीच्या सदस्यांनी या भटक्या जमातीतील लाेकांना गावाबाहेर हाकलण्याचा ठरावच पारित केला आहे. संविधानिक मानवाधिकाराचे सर्रास हनन हाेत असताना प्रशासन मात्र मूग गिळून बसले आहे.

ठळक मुद्देनरसाळा ग्रामपंचायतीने पारित केला ठराव : १० वर्षांपासून कुंभापूरला वास्तव्य

निशांत वानखेडे

नागपूर : गावाेगावी भटकंती करून जडीबुटीची औषधी विकणाऱ्या वैदू समाजातील १५ कुटुंबांना गावातून हाकलून लावण्यासाठी गावकरीच उठले आहेत. माैदा तालुक्यातील नरसाळा गटग्रामपंचायतीअंतर्गत कुंभापूर या गावी हा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. या १५ कुटुंबातील ७५ माणसे मागील १० वर्षांपासून या गावात वास्तव्यास आहेत. नरसाळा गटग्रामपंचायतीच्या सदस्यांनी या भटक्या जमातीतील लाेकांना गावाबाहेर हाकलण्याचा ठरावच पारित केला आहे. संविधानिक मानवाधिकाराचे सर्रास हनन हाेत असताना प्रशासन मात्र मूग गिळून बसले आहे.

जंगलातील औषधी जडीबुटी आणून त्याची औषधी बनवून गावाेगावी विकणे हे या वैदू समाजाचे पारंपरिक काम. इंग्रजपूर्व काळात हाेणाऱ्या युद्धात जखमी सैनिकांवर जडीबुटीच्या औषधाने उपचार करण्याचा त्यांचा हातखंडा हाेता. ‘राज गेले की राजपाट जाते’, असे म्हणतात. तशीच अवस्था या वैदू समाजाची झाली आहे. ना सरकारी दप्तरात नाेंद, रेशन कार्ड, व्हाेटिंग कार्ड, आधार कार्ड अशी सरकारी नाेंदही नाही. यांची मुलेही कधी शाळेत गेली नाहीत. कुठे एखाद्या गावी बस्तान बसविले तर गावकरीही त्यांना राहू देत नाहीत.

असाच प्रकार कुंभापूर गावी घडत आहे. हे गाव तसे कन्हान नदीच्या पूरग्रस्त भागात येते. त्यामुळे या जागेवर सरकारी याेजना राबविल्या जात नाहीत. अशा जागेवर या कुटुंबांनी १० वर्षांपासून बस्तान बसविले आहे. मात्र, आता गावकरी त्यांच्या जीवावर उठले आहेत. नरसाळा ग्रामपंचायतीने यांना गावातून हाकलण्याचा ठराव पारित केला आणि या लाेकांना दाेन दिवसांत जागा खाली करण्याचे नाेटीसही बजावले. ही बाब लक्षात आल्यानंतर संघर्ष वाहिनीची टीम या गावात गेली तेव्हा १५ वैदू कुटुंबांवर हाेत असलेल्या अन्यायाचे विदारक वास्तव समाेर आले. संघटनेचे दीनानाथ वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार या लाेकांना चाेर ठरवून गावातून हाकलण्यासाठी ग्रामस्थ सरसावले आहेत. याबाबत त्यांनी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांशी चर्चा केली पण त्यांनी व्यथा ऐकून घ्यायला नकार दिला. त्यांनी तहसीलदारांची भेट घेतली. पण त्यांच्याकडूनही समाधान झाले नाही. तेव्हा या लाेकांनी जावे कुठे, असा सवाल वाघमारे यांनी केला.

भटक्यांना स्वातंत्र्याचे ‘अमृत’ कधी?

तहसीलदारांची भेट घेतली असता त्यांनी वैदू कुटुंबांना सहा महिन्यांची मुदत दिली. त्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यास सांगितले. मात्र, त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी काेण घेणार की त्यांना येथून पळावे लागेल, असा सवाल वाघमारे यांनी उपस्थित केला. ते या देशातील लाेक नाहीत का, त्यांना शासकीय याेजनांचा लाभ कधी मिळेल, त्यांना गावातून हाकलण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला कुणी दिला, असे प्रश्न त्यांनी विचारले. स्वातंत्र्याचा अमृत महाेत्सव साजरा हाेत असताना या भटक्यांना स्वातंत्र्याचे अमृत कधी मिळेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

यांची मुले आली तर आमची मुले शाळेतून काढू

या वैदूंच्या कुटुंबात २५ शाळाबाह्य मुले आहेत. संघर्ष वाहिनीने याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. शिक्षण समन्वयक प्रसेनजित गायकवाड यांनी स्थानिक शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटून मुलांना दाखल करण्यास सांगितले. मात्र, या मुलांना शाळेत घ्याल तर आम्ही आमची मुले शाळेतून काढू, असा सज्जड इशारा गावकऱ्यांनी दिला. इतका टाेकाचा भेदभाव का, असा सवाल येताे. सध्यातरी वयानुसार मुख्याध्यापक व अंगणवाडी सेविकांनी मुलांची नाव नाेंदणी केली आहे. पण पुढे काय हाेईल, याबाबत शंका आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतSocialसामाजिकnagpurनागपूर