शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

जडीबुटी विकणऱ्या वैदू समाजाच्या १५ कुटुंबांना गावातून हाकलण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 12:16 IST

नरसाळा गटग्रामपंचायतीच्या सदस्यांनी या भटक्या जमातीतील लाेकांना गावाबाहेर हाकलण्याचा ठरावच पारित केला आहे. संविधानिक मानवाधिकाराचे सर्रास हनन हाेत असताना प्रशासन मात्र मूग गिळून बसले आहे.

ठळक मुद्देनरसाळा ग्रामपंचायतीने पारित केला ठराव : १० वर्षांपासून कुंभापूरला वास्तव्य

निशांत वानखेडे

नागपूर : गावाेगावी भटकंती करून जडीबुटीची औषधी विकणाऱ्या वैदू समाजातील १५ कुटुंबांना गावातून हाकलून लावण्यासाठी गावकरीच उठले आहेत. माैदा तालुक्यातील नरसाळा गटग्रामपंचायतीअंतर्गत कुंभापूर या गावी हा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. या १५ कुटुंबातील ७५ माणसे मागील १० वर्षांपासून या गावात वास्तव्यास आहेत. नरसाळा गटग्रामपंचायतीच्या सदस्यांनी या भटक्या जमातीतील लाेकांना गावाबाहेर हाकलण्याचा ठरावच पारित केला आहे. संविधानिक मानवाधिकाराचे सर्रास हनन हाेत असताना प्रशासन मात्र मूग गिळून बसले आहे.

जंगलातील औषधी जडीबुटी आणून त्याची औषधी बनवून गावाेगावी विकणे हे या वैदू समाजाचे पारंपरिक काम. इंग्रजपूर्व काळात हाेणाऱ्या युद्धात जखमी सैनिकांवर जडीबुटीच्या औषधाने उपचार करण्याचा त्यांचा हातखंडा हाेता. ‘राज गेले की राजपाट जाते’, असे म्हणतात. तशीच अवस्था या वैदू समाजाची झाली आहे. ना सरकारी दप्तरात नाेंद, रेशन कार्ड, व्हाेटिंग कार्ड, आधार कार्ड अशी सरकारी नाेंदही नाही. यांची मुलेही कधी शाळेत गेली नाहीत. कुठे एखाद्या गावी बस्तान बसविले तर गावकरीही त्यांना राहू देत नाहीत.

असाच प्रकार कुंभापूर गावी घडत आहे. हे गाव तसे कन्हान नदीच्या पूरग्रस्त भागात येते. त्यामुळे या जागेवर सरकारी याेजना राबविल्या जात नाहीत. अशा जागेवर या कुटुंबांनी १० वर्षांपासून बस्तान बसविले आहे. मात्र, आता गावकरी त्यांच्या जीवावर उठले आहेत. नरसाळा ग्रामपंचायतीने यांना गावातून हाकलण्याचा ठराव पारित केला आणि या लाेकांना दाेन दिवसांत जागा खाली करण्याचे नाेटीसही बजावले. ही बाब लक्षात आल्यानंतर संघर्ष वाहिनीची टीम या गावात गेली तेव्हा १५ वैदू कुटुंबांवर हाेत असलेल्या अन्यायाचे विदारक वास्तव समाेर आले. संघटनेचे दीनानाथ वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार या लाेकांना चाेर ठरवून गावातून हाकलण्यासाठी ग्रामस्थ सरसावले आहेत. याबाबत त्यांनी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांशी चर्चा केली पण त्यांनी व्यथा ऐकून घ्यायला नकार दिला. त्यांनी तहसीलदारांची भेट घेतली. पण त्यांच्याकडूनही समाधान झाले नाही. तेव्हा या लाेकांनी जावे कुठे, असा सवाल वाघमारे यांनी केला.

भटक्यांना स्वातंत्र्याचे ‘अमृत’ कधी?

तहसीलदारांची भेट घेतली असता त्यांनी वैदू कुटुंबांना सहा महिन्यांची मुदत दिली. त्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यास सांगितले. मात्र, त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी काेण घेणार की त्यांना येथून पळावे लागेल, असा सवाल वाघमारे यांनी उपस्थित केला. ते या देशातील लाेक नाहीत का, त्यांना शासकीय याेजनांचा लाभ कधी मिळेल, त्यांना गावातून हाकलण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला कुणी दिला, असे प्रश्न त्यांनी विचारले. स्वातंत्र्याचा अमृत महाेत्सव साजरा हाेत असताना या भटक्यांना स्वातंत्र्याचे अमृत कधी मिळेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

यांची मुले आली तर आमची मुले शाळेतून काढू

या वैदूंच्या कुटुंबात २५ शाळाबाह्य मुले आहेत. संघर्ष वाहिनीने याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. शिक्षण समन्वयक प्रसेनजित गायकवाड यांनी स्थानिक शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटून मुलांना दाखल करण्यास सांगितले. मात्र, या मुलांना शाळेत घ्याल तर आम्ही आमची मुले शाळेतून काढू, असा सज्जड इशारा गावकऱ्यांनी दिला. इतका टाेकाचा भेदभाव का, असा सवाल येताे. सध्यातरी वयानुसार मुख्याध्यापक व अंगणवाडी सेविकांनी मुलांची नाव नाेंदणी केली आहे. पण पुढे काय हाेईल, याबाबत शंका आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतSocialसामाजिकnagpurनागपूर