शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

अत्याचाराच्या काळ्या ऋचा लिहिल्यात माझ्या शरीरावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 21:11 IST

साहित्य अकादमी पुरस्कार विजेता गुजराती कवी जयंत परमार अतिशय साधे पण तेवढेच संवेदनशील आणि कठोर व्यक्तिमत्त्व. गुजरातच्या दलित कुटुंबात जन्मल्याने साहजिकच सहन केलेल्या अन्यायाच्या जखमा त्यांच्या काव्यातून व्यक्त होतात.

ठळक मुद्देसाहित्य अकादमी पुरस्कार विजेता जयंत परमार यांची मुलाखत २००६ ला नाकारला होता गुजरात गौरव पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनिशांत वानखेडेनागपूर : साहित्य अकादमी पुरस्कार विजेता गुजराती कवी जयंत परमार अतिशय साधे पण तेवढेच संवेदनशील आणि कठोर व्यक्तिमत्त्व. गुजरातच्या दलित कुटुंबात जन्मल्याने साहजिकच सहन केलेल्या अन्यायाच्या जखमा त्यांच्या काव्यातून व्यक्त होतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य आयुष्यात आल्याने वर्षानुवर्षे होत असलेल्या अत्याचाराची आणि माणूसपणाची जाणीव झाली आणि त्यांची उर्दू ‘नज्म’ या अत्याचाराच्या विरोधातील हत्यार बनली. उर्दू जगतालाही ही जाणीव नवीन असल्याने ती देशात आणि देशाबाहेरही स्वीकारली गेली. आपल्या भावस्पर्शी रचनांनी रसिकांना भुरळ घालणारे गीतकार दस्तुरखुद्द गुलजार हेही परमार यांचे ‘मुरीद’ झाले. २००६ ला गुजरात सरकारने त्यांना गुजरात गौरव पुरस्कार जाहीर केला. मात्र गुजरात दंग्यांनी अस्वस्थ झालेल्या या संवेदनशील कवीने तो पुरस्कार स्वीकारण्यासच नकार दिला. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर आलेल्या जयंत परमार यांची लोकमत प्रतिनिधीने घेतलेली ही मुलाखत.- तुमच्या काव्यात विद्रोह जाणवतो?ते साहजिक आहे. माझा जन्म दलित कुटुंबात झाला. जातीभेदाचे चटके मी स्वत: अनुभवले व पाहिले आहेत. आमच्यासाठी शाळेत वेगळी व्यवस्था केली जायची, हीन लेखले जायचे. आजही मंदिरात प्रवेश दिला जात नाही. शहरात काही प्रमाणात स्थिती सुधारली आहे, मात्र गावांमध्ये आजही अवस्था वाईट आहे. उणा सारख्या घटना हे त्याचेच उदाहरण आहे. पूर्वी हा अन्याय बाहेर येत नव्हता. मात्र आता समाजात निर्माण झालेली जागृती आणि सोशल मीडियामुळे या घटना बाहेर येत आहेत. हे अस्वस्थ करणारे वातावरण मला गप्प बसू देत नाही. ‘जुल्म की काली ऋचाएँ लिखी गई थी मेरे बदन पर...’- उर्दू भाषेची निवड का केली?राहत असलेल्या घराजवळ मशीद आहे. तेथून उर्दू शब्द कानावर पडत होते. मशिदीवर लिहलेल्या उर्दूतील आयाती चित्रांप्रमाणे वाटत होत्या. त्यामुळे या भाषेचे वेगळे आकर्षण निर्माण झाले. सुरुवातीला गुजराती भाषेत लिहायला सुरुवात केली. मात्र माझ्या भावना अधिक व्यापक करण्यासाठी उर्दूतूनच लिहावे असे वाटले. जुन्या पुस्तकाच्या बाजारातून उर्दू व्याकरणाची पुस्तक घेतली आणि स्वत:च उर्दू शिकलो व माझे काव्य उर्दूतून लिहू लागलो. भाषेचा प्रभाव म्हणा की माझ्यातील आंतरिक आवाज, हे काव्य लोकांना आवडले. साहित्य जगतातून प्रतिसाद मिळात गेला व ओळख मिळत गेली. अनेकांनी हे काव्य विविध भाषेत भाषांतरित केले. ‘पेन्सील और दुसरी नज्मे’ या दुसऱ्याच काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळणे ही सुद्धा माझ्यासाठी गौरवाची बाब आहे.- महाराष्ट्रातील दलित, विद्रोही साहित्याचा प्रभाव?डॉ. आंबेडकर यांच्या प्रभावामुळे ७० च्या दशकात दलित पँथर, दलित व विद्रोही साहित्याची चळवळ महाराष्ट्रात पसरली होती. शरदचंद्र परमार यांनी गुजराती भाषेत अनुवादित केलेले मराठीतील विद्रोही साहित्य पहिल्यांदा वाचायला मिळाले आणि माझ्या भावनांना दिशा मिळाली. नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर, त्र्यंबक सपकाळ, बाबुराव बागुल आदी साहित्यिकांच्या काव्यात, लेखनात अस्मितेच्या संवेदना प्रभावीपणे मांडल्या आहेत. या प्रेरणेतून माझ्यातील संवेदना उर्दू कवितेत उतरू लागल्या. विशेष म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांनी माझ्या कविता अनुवादित करून त्यांच्या अस्मितादर्शमध्ये प्रकाशित केल्या. बंगळुरूच्या मासिकात माझे काव्य प्रकाशित झाले आणि उर्दूतील पहिले दलित काव्य म्हणून गौरवही झाला. मला आवडणारे नागपूरचे कवी लोकनाथ यशवंत यांनीही माझ्या कवितांना मराठीत भाषांतरित केले आहे.- गुजरात गौरव पुरस्कार परत करण्यामागचे कारण?२००६ मध्ये साहित्य कार्यासाठी राज्य सरकारकडून ‘गुजरात गौरव’ पुरस्कारासाठी माझी निवड करण्यात आली. मात्र गुजरात दंगलीसाठी कारणीभूत असणाऱ्या सरकारच्या नेतृत्वाकडून पुरस्कार स्वीकारणार नाही, या भूमिकेवर मी ठाम होतो. २०१४ मध्ये ‘पुरस्कार वापसी’ची मोहीम चालली होती, त्याच्या कितीतरी वर्षाआधी मी ही भूमिका घेतली होती.- कविता आणि चित्रकलेचे समीकरणबालपणापासूनच मला चित्रकलेची आवड होती. ही चित्रकारिता काव्यातही उतरली. चित्रांच्या माध्यमातून दलित अस्मिता मांडली आहे. पुढे कॅलिग्रॅफी शिकून घेतली. माझे प्रत्येक पुस्तकांचे डिझाईन व कव्हर मी तयार करीत असतो. ‘नज्म याने’ या काव्यसंग्रहात ५० कवितांसाठी ५० पेंटिंग्ज साकार केल्या होत्या. ही कृती साहित्यप्रेमींना खूप आवडली.- डॉ. आंबेडकर यांची प्रेरणाआम्ही लहान असताना त्यावेळीही आमच्या घरी व मंदिरांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असायचे. हे आमचे ‘मसिहा’ आहेत, एवढी ओळख होती. मात्र त्यांच्या विचारांबाबत फार जाणीव नव्हती. परंतु साहित्याच्या रूपातील त्यांचे विचार माझ्या अभ्यासात आले, तेव्हा खऱ्या अर्थाने माणूसपणाची जाणीव झाली. वर्षानुवर्षांच्या धार्मिक गुलामी व अत्याचाराने आमच्या भावनाही मेल्या होत्या. पण या महापुरुषाने मृत भावनांना जागे केले. अधिकारांची जाणीव करून दिली व त्याहीपेक्षा स्वाभिमान जागविला. या भागात शिक्षण घेणारी आमची पहिली पिढी असावी. नव्या पिढीमध्ये ही प्रेरणाज्योत पेटायला लागली आहे.वर्तमान परिस्थितीबाबत काय वाटते?खरं म्हणजे भयमुक्त वातावरणात प्रत्येकाला अभिव्यक्त होण्याचे, आंतरिक भावना मांडण्याचे स्वातंत्र असायला पाहीजे. मात्र दुर्दैवाने आजची परिस्थिती त्या दृष्टीने योग्य नाही, असे मला प्रामाणिकपणे वाटते. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, ढासळती अर्थव्यवस्था असे गंभीर प्रश्न समोर आहेत. खासगीकरण वाढले आहे, नैसर्गिक संपत्तीचे दोहन होत आहे. मात्र समाजाच्या हिताचे मुद्दे सोडून भलत्याच गोष्टीकडे लक्ष वळवले जात आहे, माणसे मारली जात आहेत. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बोलणाºया दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश अशांची हत्या केली जाते.

टॅग्स :interviewमुलाखत