शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

रेशन दुकानात आता मिळणार 'आटा'सोबत डेटा; १०० रुपयांत अनलिमिटेड इंटरनेट सेवा

By आनंद डेकाटे | Updated: December 10, 2022 13:26 IST

२०० मीटर परिसरातील नागरिकांना घेता येईल ‘वायफाय’चा लाभ

नागपूर : घरोघरी इंटरनेटची सुविधा उपलब्ध व्हावी. विशेषत: ग्रामीण भागात इंटरनेटचे जाळे निर्माण करण्यासाठी आता रेशन दुकानाच्या माध्यमातून ‘वायफाय’ व इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

रेशन दुकानाच्या जवळपास २०० मीटर परिसरातील नागरिक याचा लाभ घेऊ शकतील. यात १०० रुपयांत अनलिमिटेड इंटरनेट सेवा मिळेल. स्पीडही ४ जीची असेल. दिवसानुसारही वायफाय खरेदी करता येऊ शकेल. म्हणजेच पाच रुपयांत एक दिवस इंटरनेट चालवता येईल.

देशात इंटरनेटचे जाळे निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने पीएम वाणी (पंतप्रधान वायफाय एक्सेस नेटवर्क इंटरफेस) ही योजना सुरू केली आहे. याद्वारे सार्वजनिक ठिकाणी वायफायची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी देशभरात सार्वजनिक डेटा कार्यालये उभारली जाणार आहेत. रेशन दुकानांंमध्येही डेटा कार्यालये उभारली जाणार आहेत. येथूनच परिसरातील नागरिकांना वायफाय- इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पसरली असल्याने त्याच्या माध्यमातून दुर्गम भागातही इंटरनेट पोहोचवणे शक्य होईल.

- अशी राहील अंमलबजावणी

  • सार्वजनिक डेटा कार्यालय (पीडीओ) : हे वायफायची स्थापना, देखभाल आणि संचालन करील. ग्राहकांना ब्रॉडबँड सेवा वितरित करील.
  • सार्वजनिक डेटा कार्यालय एग्रिग्रेटर (पीडीओए) : हे सार्वजनिक डेटा कार्यालयांना एकत्रित करतील आणि अधिकृत व लेखांकनाशी संबंधित कार्य पार पाडतील.
  • प प्रदाता (प्रोव्हायडर) : हे वापरकर्त्यांची नोंदणी करण्यासाठी आणि जवळपासच्या परिसरात वानी अनुरूप हॉटस्पॉट शोधण्यासाठी ॲप विकसित करील आणि इंटरनेट सेवेमध्ये प्रवेश करण्यासाठी ॲपमध्ये तशी सुविधा उपलब्ध करून देईल.
  • केंद्रीय नोंदणी : सार्वजनिक डेटा कार्यालय, सार्वजनिक डेटा कार्यालय एग्रिग्रेटर ॲप प्रदाता यांचे तपशील ठेवतील. सुरुवातीला केंद्रीय नोंदणी सी-डॉटद्वारे ठेवली जाईल.

 

७० टक्के दुकानदार, ३० टक्के कंपनीला

यासाठी सरकारने कुठलेही दर निश्चित केलेले नाहीत. स्थानिक स्तरावरील कंपनी हे दर ठरवेल; परंतु हे दर अतिशय माफक असतील असे सांगितले जाते. सूत्रानुसार १०० रुपयांत अनलिमिटेड इंटरनेट सेवा मिळेल. इंटरनेटची स्पीडही ४ जीची असेल. दिवसानुसारही वायफाय खरेदी करता येऊ शकते. पाच रुपयांत एक दिवस इंटरनेट चालवता येईल. यातील ७० टक्के दुकानदार व ३० टक्के कंपनीला मिळणार असल्याचे सांगितले जाते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :SocialसामाजिकInternetइंटरनेट