शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कुणी वाघ घेता का वाघ...! घटत्या जंगलात वाढत्या संख्येमुळे काैतुकासाेबत चिंताही

By निशांत वानखेडे | Updated: July 29, 2023 12:48 IST

जागतिक व्याघ्र दिन विशेष : दीड वर्षात वाघाने मारली १०० वर माणसे

निशांत वानखेडे

नागपूर :वाघाची जागतिक राजधानी म्हणून नागपूर-विदर्भाकडे पाहिले जाते आणि गेल्या काही वर्षांत प्रयत्नांमुळे वाढलेली वाघांची संख्या ही काैतुकास्पद बाब ठरली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत व्याघ्र हल्ल्यात माणसांचे बळी गेल्याने हा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. राज्याच्या वनमंत्र्यांनी नुकताच चंद्रपूरच्या ताडाेबातील वाघांच्या स्थानांतरणाचा विचार बाेलून दाखविला आहे. घटत्या वनक्षेत्रात वाढणारी वाघांची संख्या हे चिंतेचे कारण ठरले असून विदर्भातून वाघ घेता का वाघ... अशी परिस्थिती आली आहे.

गेल्या वर्षी चंद्रपूर, गडचिराेली व नागपूर भागात वाघांच्या हल्ल्यात ८० माणसांचा बळी गेला. यावर्षीही जानेवारी ते १८ जुलैपर्यंत वाघाने हल्ला करून १९ माणसे मारून टाकली. धक्कादायक म्हणजे हा संघर्ष अधिकाधिक तीव्र हाेताना दिसत आहे. वाघाच्या हल्ल्यात मानवी मृत्यूची संख्या चंद्रपुरात अधिक आहे. येथे २०१८ पासून २०२२ पर्यंत १३५ च्या वर माणसांची वाघांनी शिकार केली आहे. यात २०१८ मध्ये १५, २०१९ व २०२० मध्ये प्रत्येकी २५ आणि २०२१ मध्ये ३५, तर २०२२ मध्ये ४६ लाेकांना वाघाने लक्ष्य केले. त्यामुळे पर्यटकांना वाघांचे आकर्षण असले तरी जंगलाच्या आसपास राहणाऱ्या ग्रामस्थांसाठी मात्र भीतीचे कारण ठरला आहे.

जंगल घटले, वाघ दुप्पट

मानव-वन्यजीव संघर्षाचे कारण म्हणजे वाघांची संख्या वाढत असताना वनक्षेत्र मात्र मर्यादित आणि घटत चालले आहे. चंद्रपूरचा विचार केल्यास ताडाेबा अभयारण्याचा काेअर एरिया ६२६ चाैरस किमी आणि बफर क्षेत्र ११२५ चाै.किमी. असा १७५० चाै.किमी.चा एरिया आहे. यात शेती, वनदावे आदींमुळे वनक्षेत्रात सातत्याने घट झाली आहे. दुसरीकडे वाघांची संख्या मात्र दुप्पट वाढली आहे. देशात २००६ मध्ये १४०० च्या वर असलेले वाघ २०२२ पर्यंत ३००० च्या वर झाले आहेत. यात ताडाेबाचे वाघ १२५-१५० वरून ३०० च्या वर पाेहचले आहेत. त्यामुळे हा अधिवास कमी पडत आहे.

जेवढे जंगलात, तेवढे बाहेर

वाघ जेवढे जंगलात आहेत, तेवढेच ते बाहेरही आहेत. अधिवास कमी पडत असल्याने वाघांनी विदर्भातील खुरटे जंगल, शेतीलाही अधिवास बनविले आहे. इथून संघर्षाची ठिणगी पडली. पूर्वी गडचिराेली भागात कमी दिसणारे वाघ आता भरपूर वाढले आहेत व त्या भागात माणसांचा बळी घेत आहेत. उमरेड-कऱ्हाडला वनक्षेत्रातही असाच संघर्ष वाढला आहे.

वाघाच्या हल्ल्यात मानवी मृत्यू

- २०२२ मध्ये

चंद्रपूर- ३७, ताडाेबा-८, चंद्रपूर एफडीसीएम-२ : गडचिराेली-२६, नागपूर-७

- २०२३ जुलैपर्यंत

चंद्रपूर-१०, चंद्रपूर एफडीसीएम-२, ताडाेबा-३ : मेळघाट-१, पेंच-१, नागपूर-३

- केवळ चंद्रपुरात : २०१८-१५, २०१९-२५, २०२०-२५, २०२१-३५, २०२२-४७.

शिकारी टाेळ्याही सक्रिय

व्याघ्र शिकार प्रकरणे गेल्या काही वर्षांत घटली हाेती, पण काेराेनानंतर त्यात वाढ झाली आहे. वाघांची संख्या वाढल्याने आंततराष्ट्रीय शिकारी टाेळ्या सक्रिय झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. वन विभागाने याबाबत अलर्टही जारी केला आहे. मात्र, हिवाळा व पावसाळ्यात वन विभागाची माॅनिटरिंग कमजाेर पडत असल्याचे बाेलले जाते.

टॅग्स :environmentपर्यावरणTigerवाघVidarbhaविदर्भ