शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

कुणी वाघ घेता का वाघ...! घटत्या जंगलात वाढत्या संख्येमुळे काैतुकासाेबत चिंताही

By निशांत वानखेडे | Updated: July 29, 2023 12:48 IST

जागतिक व्याघ्र दिन विशेष : दीड वर्षात वाघाने मारली १०० वर माणसे

निशांत वानखेडे

नागपूर :वाघाची जागतिक राजधानी म्हणून नागपूर-विदर्भाकडे पाहिले जाते आणि गेल्या काही वर्षांत प्रयत्नांमुळे वाढलेली वाघांची संख्या ही काैतुकास्पद बाब ठरली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत व्याघ्र हल्ल्यात माणसांचे बळी गेल्याने हा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. राज्याच्या वनमंत्र्यांनी नुकताच चंद्रपूरच्या ताडाेबातील वाघांच्या स्थानांतरणाचा विचार बाेलून दाखविला आहे. घटत्या वनक्षेत्रात वाढणारी वाघांची संख्या हे चिंतेचे कारण ठरले असून विदर्भातून वाघ घेता का वाघ... अशी परिस्थिती आली आहे.

गेल्या वर्षी चंद्रपूर, गडचिराेली व नागपूर भागात वाघांच्या हल्ल्यात ८० माणसांचा बळी गेला. यावर्षीही जानेवारी ते १८ जुलैपर्यंत वाघाने हल्ला करून १९ माणसे मारून टाकली. धक्कादायक म्हणजे हा संघर्ष अधिकाधिक तीव्र हाेताना दिसत आहे. वाघाच्या हल्ल्यात मानवी मृत्यूची संख्या चंद्रपुरात अधिक आहे. येथे २०१८ पासून २०२२ पर्यंत १३५ च्या वर माणसांची वाघांनी शिकार केली आहे. यात २०१८ मध्ये १५, २०१९ व २०२० मध्ये प्रत्येकी २५ आणि २०२१ मध्ये ३५, तर २०२२ मध्ये ४६ लाेकांना वाघाने लक्ष्य केले. त्यामुळे पर्यटकांना वाघांचे आकर्षण असले तरी जंगलाच्या आसपास राहणाऱ्या ग्रामस्थांसाठी मात्र भीतीचे कारण ठरला आहे.

जंगल घटले, वाघ दुप्पट

मानव-वन्यजीव संघर्षाचे कारण म्हणजे वाघांची संख्या वाढत असताना वनक्षेत्र मात्र मर्यादित आणि घटत चालले आहे. चंद्रपूरचा विचार केल्यास ताडाेबा अभयारण्याचा काेअर एरिया ६२६ चाैरस किमी आणि बफर क्षेत्र ११२५ चाै.किमी. असा १७५० चाै.किमी.चा एरिया आहे. यात शेती, वनदावे आदींमुळे वनक्षेत्रात सातत्याने घट झाली आहे. दुसरीकडे वाघांची संख्या मात्र दुप्पट वाढली आहे. देशात २००६ मध्ये १४०० च्या वर असलेले वाघ २०२२ पर्यंत ३००० च्या वर झाले आहेत. यात ताडाेबाचे वाघ १२५-१५० वरून ३०० च्या वर पाेहचले आहेत. त्यामुळे हा अधिवास कमी पडत आहे.

जेवढे जंगलात, तेवढे बाहेर

वाघ जेवढे जंगलात आहेत, तेवढेच ते बाहेरही आहेत. अधिवास कमी पडत असल्याने वाघांनी विदर्भातील खुरटे जंगल, शेतीलाही अधिवास बनविले आहे. इथून संघर्षाची ठिणगी पडली. पूर्वी गडचिराेली भागात कमी दिसणारे वाघ आता भरपूर वाढले आहेत व त्या भागात माणसांचा बळी घेत आहेत. उमरेड-कऱ्हाडला वनक्षेत्रातही असाच संघर्ष वाढला आहे.

वाघाच्या हल्ल्यात मानवी मृत्यू

- २०२२ मध्ये

चंद्रपूर- ३७, ताडाेबा-८, चंद्रपूर एफडीसीएम-२ : गडचिराेली-२६, नागपूर-७

- २०२३ जुलैपर्यंत

चंद्रपूर-१०, चंद्रपूर एफडीसीएम-२, ताडाेबा-३ : मेळघाट-१, पेंच-१, नागपूर-३

- केवळ चंद्रपुरात : २०१८-१५, २०१९-२५, २०२०-२५, २०२१-३५, २०२२-४७.

शिकारी टाेळ्याही सक्रिय

व्याघ्र शिकार प्रकरणे गेल्या काही वर्षांत घटली हाेती, पण काेराेनानंतर त्यात वाढ झाली आहे. वाघांची संख्या वाढल्याने आंततराष्ट्रीय शिकारी टाेळ्या सक्रिय झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. वन विभागाने याबाबत अलर्टही जारी केला आहे. मात्र, हिवाळा व पावसाळ्यात वन विभागाची माॅनिटरिंग कमजाेर पडत असल्याचे बाेलले जाते.

टॅग्स :environmentपर्यावरणTigerवाघVidarbhaविदर्भ