शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

कुणी वाघ घेता का वाघ...! घटत्या जंगलात वाढत्या संख्येमुळे काैतुकासाेबत चिंताही

By निशांत वानखेडे | Updated: July 29, 2023 12:48 IST

जागतिक व्याघ्र दिन विशेष : दीड वर्षात वाघाने मारली १०० वर माणसे

निशांत वानखेडे

नागपूर :वाघाची जागतिक राजधानी म्हणून नागपूर-विदर्भाकडे पाहिले जाते आणि गेल्या काही वर्षांत प्रयत्नांमुळे वाढलेली वाघांची संख्या ही काैतुकास्पद बाब ठरली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत व्याघ्र हल्ल्यात माणसांचे बळी गेल्याने हा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. राज्याच्या वनमंत्र्यांनी नुकताच चंद्रपूरच्या ताडाेबातील वाघांच्या स्थानांतरणाचा विचार बाेलून दाखविला आहे. घटत्या वनक्षेत्रात वाढणारी वाघांची संख्या हे चिंतेचे कारण ठरले असून विदर्भातून वाघ घेता का वाघ... अशी परिस्थिती आली आहे.

गेल्या वर्षी चंद्रपूर, गडचिराेली व नागपूर भागात वाघांच्या हल्ल्यात ८० माणसांचा बळी गेला. यावर्षीही जानेवारी ते १८ जुलैपर्यंत वाघाने हल्ला करून १९ माणसे मारून टाकली. धक्कादायक म्हणजे हा संघर्ष अधिकाधिक तीव्र हाेताना दिसत आहे. वाघाच्या हल्ल्यात मानवी मृत्यूची संख्या चंद्रपुरात अधिक आहे. येथे २०१८ पासून २०२२ पर्यंत १३५ च्या वर माणसांची वाघांनी शिकार केली आहे. यात २०१८ मध्ये १५, २०१९ व २०२० मध्ये प्रत्येकी २५ आणि २०२१ मध्ये ३५, तर २०२२ मध्ये ४६ लाेकांना वाघाने लक्ष्य केले. त्यामुळे पर्यटकांना वाघांचे आकर्षण असले तरी जंगलाच्या आसपास राहणाऱ्या ग्रामस्थांसाठी मात्र भीतीचे कारण ठरला आहे.

जंगल घटले, वाघ दुप्पट

मानव-वन्यजीव संघर्षाचे कारण म्हणजे वाघांची संख्या वाढत असताना वनक्षेत्र मात्र मर्यादित आणि घटत चालले आहे. चंद्रपूरचा विचार केल्यास ताडाेबा अभयारण्याचा काेअर एरिया ६२६ चाैरस किमी आणि बफर क्षेत्र ११२५ चाै.किमी. असा १७५० चाै.किमी.चा एरिया आहे. यात शेती, वनदावे आदींमुळे वनक्षेत्रात सातत्याने घट झाली आहे. दुसरीकडे वाघांची संख्या मात्र दुप्पट वाढली आहे. देशात २००६ मध्ये १४०० च्या वर असलेले वाघ २०२२ पर्यंत ३००० च्या वर झाले आहेत. यात ताडाेबाचे वाघ १२५-१५० वरून ३०० च्या वर पाेहचले आहेत. त्यामुळे हा अधिवास कमी पडत आहे.

जेवढे जंगलात, तेवढे बाहेर

वाघ जेवढे जंगलात आहेत, तेवढेच ते बाहेरही आहेत. अधिवास कमी पडत असल्याने वाघांनी विदर्भातील खुरटे जंगल, शेतीलाही अधिवास बनविले आहे. इथून संघर्षाची ठिणगी पडली. पूर्वी गडचिराेली भागात कमी दिसणारे वाघ आता भरपूर वाढले आहेत व त्या भागात माणसांचा बळी घेत आहेत. उमरेड-कऱ्हाडला वनक्षेत्रातही असाच संघर्ष वाढला आहे.

वाघाच्या हल्ल्यात मानवी मृत्यू

- २०२२ मध्ये

चंद्रपूर- ३७, ताडाेबा-८, चंद्रपूर एफडीसीएम-२ : गडचिराेली-२६, नागपूर-७

- २०२३ जुलैपर्यंत

चंद्रपूर-१०, चंद्रपूर एफडीसीएम-२, ताडाेबा-३ : मेळघाट-१, पेंच-१, नागपूर-३

- केवळ चंद्रपुरात : २०१८-१५, २०१९-२५, २०२०-२५, २०२१-३५, २०२२-४७.

शिकारी टाेळ्याही सक्रिय

व्याघ्र शिकार प्रकरणे गेल्या काही वर्षांत घटली हाेती, पण काेराेनानंतर त्यात वाढ झाली आहे. वाघांची संख्या वाढल्याने आंततराष्ट्रीय शिकारी टाेळ्या सक्रिय झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. वन विभागाने याबाबत अलर्टही जारी केला आहे. मात्र, हिवाळा व पावसाळ्यात वन विभागाची माॅनिटरिंग कमजाेर पडत असल्याचे बाेलले जाते.

टॅग्स :environmentपर्यावरणTigerवाघVidarbhaविदर्भ