शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

कुणी वाघ घेता का वाघ...! घटत्या जंगलात वाढत्या संख्येमुळे काैतुकासाेबत चिंताही

By निशांत वानखेडे | Updated: July 29, 2023 12:48 IST

जागतिक व्याघ्र दिन विशेष : दीड वर्षात वाघाने मारली १०० वर माणसे

निशांत वानखेडे

नागपूर :वाघाची जागतिक राजधानी म्हणून नागपूर-विदर्भाकडे पाहिले जाते आणि गेल्या काही वर्षांत प्रयत्नांमुळे वाढलेली वाघांची संख्या ही काैतुकास्पद बाब ठरली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत व्याघ्र हल्ल्यात माणसांचे बळी गेल्याने हा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. राज्याच्या वनमंत्र्यांनी नुकताच चंद्रपूरच्या ताडाेबातील वाघांच्या स्थानांतरणाचा विचार बाेलून दाखविला आहे. घटत्या वनक्षेत्रात वाढणारी वाघांची संख्या हे चिंतेचे कारण ठरले असून विदर्भातून वाघ घेता का वाघ... अशी परिस्थिती आली आहे.

गेल्या वर्षी चंद्रपूर, गडचिराेली व नागपूर भागात वाघांच्या हल्ल्यात ८० माणसांचा बळी गेला. यावर्षीही जानेवारी ते १८ जुलैपर्यंत वाघाने हल्ला करून १९ माणसे मारून टाकली. धक्कादायक म्हणजे हा संघर्ष अधिकाधिक तीव्र हाेताना दिसत आहे. वाघाच्या हल्ल्यात मानवी मृत्यूची संख्या चंद्रपुरात अधिक आहे. येथे २०१८ पासून २०२२ पर्यंत १३५ च्या वर माणसांची वाघांनी शिकार केली आहे. यात २०१८ मध्ये १५, २०१९ व २०२० मध्ये प्रत्येकी २५ आणि २०२१ मध्ये ३५, तर २०२२ मध्ये ४६ लाेकांना वाघाने लक्ष्य केले. त्यामुळे पर्यटकांना वाघांचे आकर्षण असले तरी जंगलाच्या आसपास राहणाऱ्या ग्रामस्थांसाठी मात्र भीतीचे कारण ठरला आहे.

जंगल घटले, वाघ दुप्पट

मानव-वन्यजीव संघर्षाचे कारण म्हणजे वाघांची संख्या वाढत असताना वनक्षेत्र मात्र मर्यादित आणि घटत चालले आहे. चंद्रपूरचा विचार केल्यास ताडाेबा अभयारण्याचा काेअर एरिया ६२६ चाैरस किमी आणि बफर क्षेत्र ११२५ चाै.किमी. असा १७५० चाै.किमी.चा एरिया आहे. यात शेती, वनदावे आदींमुळे वनक्षेत्रात सातत्याने घट झाली आहे. दुसरीकडे वाघांची संख्या मात्र दुप्पट वाढली आहे. देशात २००६ मध्ये १४०० च्या वर असलेले वाघ २०२२ पर्यंत ३००० च्या वर झाले आहेत. यात ताडाेबाचे वाघ १२५-१५० वरून ३०० च्या वर पाेहचले आहेत. त्यामुळे हा अधिवास कमी पडत आहे.

जेवढे जंगलात, तेवढे बाहेर

वाघ जेवढे जंगलात आहेत, तेवढेच ते बाहेरही आहेत. अधिवास कमी पडत असल्याने वाघांनी विदर्भातील खुरटे जंगल, शेतीलाही अधिवास बनविले आहे. इथून संघर्षाची ठिणगी पडली. पूर्वी गडचिराेली भागात कमी दिसणारे वाघ आता भरपूर वाढले आहेत व त्या भागात माणसांचा बळी घेत आहेत. उमरेड-कऱ्हाडला वनक्षेत्रातही असाच संघर्ष वाढला आहे.

वाघाच्या हल्ल्यात मानवी मृत्यू

- २०२२ मध्ये

चंद्रपूर- ३७, ताडाेबा-८, चंद्रपूर एफडीसीएम-२ : गडचिराेली-२६, नागपूर-७

- २०२३ जुलैपर्यंत

चंद्रपूर-१०, चंद्रपूर एफडीसीएम-२, ताडाेबा-३ : मेळघाट-१, पेंच-१, नागपूर-३

- केवळ चंद्रपुरात : २०१८-१५, २०१९-२५, २०२०-२५, २०२१-३५, २०२२-४७.

शिकारी टाेळ्याही सक्रिय

व्याघ्र शिकार प्रकरणे गेल्या काही वर्षांत घटली हाेती, पण काेराेनानंतर त्यात वाढ झाली आहे. वाघांची संख्या वाढल्याने आंततराष्ट्रीय शिकारी टाेळ्या सक्रिय झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. वन विभागाने याबाबत अलर्टही जारी केला आहे. मात्र, हिवाळा व पावसाळ्यात वन विभागाची माॅनिटरिंग कमजाेर पडत असल्याचे बाेलले जाते.

टॅग्स :environmentपर्यावरणTigerवाघVidarbhaविदर्भ