शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस; मंगळ ग्रहाप्रमाणे तर हाेणार नाही अवस्था?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2022 21:04 IST

Nagpur News जीववैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार, पृथ्वीवरील अनेक प्रजाती नष्ट हाेत आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत पृथ्वीची अवस्था मंगळाप्रमाणे हाेईल का, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देजीवसृष्टी विलुप्त हाेण्याच्या सहाव्या घटनेचाही धाेका यावेळी मानवनिर्मित असेल संकट

 

निशांत वानखेडे

नागपूर : काही अब्ज वर्षांपूर्वी आपल्या साैरमालेतील लाल ग्रह म्हणजे मंगळावर जीवसृष्टी किंवा पाण्याचे स्राेत असण्याचा दावा खगाेल वैज्ञानिकांद्वारे केला जाताे. मात्र, सूर्याच्या मॅग्नेटिक शक्तीमुळे तापमान वाढून सर्व नष्ट झाले. सध्या आपली पृथ्वी याच अवस्थेतून जात आहे. जागतिक तापमान वाढीचे संकट दिवसेंदिवस भीषण रूप घेत असून जीववैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार, पृथ्वीवरील अनेक प्रजाती नष्ट हाेत आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत पृथ्वीची अवस्था मंगळाप्रमाणे हाेईल का, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पृथ्वीवर आतापर्यंत पाचवेळा सामूहिकरीत्या जैवविविधता विलुप्त हाेण्याच्या घटना घडल्या आहेत. आईस एज किंवा डायनाेसार विलुप्त हाेण्याची घटना त्यामधलीच आहे. मात्र, या सगळ्या घटना नैसर्गिक आणि मानव जन्मापूर्वीच्या हाेत्या. जैवविविधतेवर संकटाची सहावी घटना मानवनिर्मित असेल, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. काही वैज्ञानिकांच्या मते, जैवविविधता विलुप्त हाेण्याच्या घटनेला सुरुवातही झाली आहे. यात अनेक पक्षी, प्राण्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत. विकासकामे आणि वनसंपदा नष्ट हाेणे, हे संकटाचे माेठे कारण आहेत.

तापमान वाढीचा धाेका

नुकत्याच एका रिपाेर्टनुसार, २०५० पर्यंत २ नाही, तर ३ अंशाने वाढण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या काही वर्षांत पृथ्वीवर प्रचंड उलथापालथ हाेण्याची शक्यता आहे. अनेक सजीव प्रजाती नष्ट हाेतील. यात असंख्य वनस्पती, सरपटणारे प्राणी व पक्ष्यांची संख्या अधिक आहे. अनियंत्रित विकास आणि जंगले नष्ट हाेत चालल्याने तापमान वाढ हाेत आहे. संशाेधकांच्या अभ्यासानुसार, मागील ४० वर्षांत जगातील अर्धे वन्यजीव नामशेष झाले आहेत. तापमान वाढ आणि प्रदूषणाचे संकट समुद्री जिवांवर अधिक वाढले आहे.

१५०० वर्षांत २.६० लाख प्रजाती नष्ट झाल्या

यूएच मानोआ पॅसिफिक बायोसायंसेज रिसर्च संस्थेच्या वैज्ञानिकांनी जमिनीत राहणारे घाेंगे यांच्या अध्ययनातून १५०० वर्षांचा इतिहास धुंडाळला आहे. त्यानुसार १५०० इसवीनंतर पृथ्वीवर ज्ञात असलेल्या २० लाख प्रजातींपैकी ७.५ ते १३ टक्के प्रजाती नामशेष झाल्या. म्हणजे जवळपास २ ला ६० हजार प्रजाती विलुप्त झाल्या. यात पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्या अधिक आहे. मात्र, मागील ४०० वर्षांत नष्ट झालेल्या केवळ ८०० प्रजातींचे डाक्युमेंटेशन हाेऊ शकले आहे. सध्याच्या परिस्थितीत दरराेज एक प्रजाती नष्ट हाेत असल्याची भीती वैज्ञानिकांना आहे.

काेराेनासारख्या महामारीचे संकट वाढेल

जंगल नष्ट झाली की प्राणी नष्ट हाेतील आणि त्याचा मानवावर प्रभाव पडणार आहे. तापमान वाढले की राेगराई वाढेल, पाऊस वाढला तर राेगराई वाढेल. प्राणी नष्ट झाले की त्यांचे आजार मानवापर्यंत पाेहोचतील. मागील दाेन वर्षांत जगभरात काेट्यवधी लाेक काेराेनाने दगावली आहेत. पुढे अशी महामारी वाढण्याची भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.

वेगाने झाडे कापली जात आहेत, तेवढ्या वेगाने नवी झाडे हाेत नाहीत. नदी व भूगर्भातून जेवढे पाणी काढताे तेवढे पावसाने भरले जात नाही. आपण अतिशय वेगाने संकटाकडे ओढले जात आहाेत. हे संकट थांबविण्यासाठी जगाने एकत्र येऊन आपली जंगले, पर्यावरण वाचविण्याची नितांत गरज आहे, अन्यथा वैज्ञानिकांच्या निर्धारित वेळेच्या आधीच सामूहिक विलुप्तीची घटना घडेल.

- प्रा. सुरेश चाेपणे, हवामान अभ्यासक.

टॅग्स :Earthपृथ्वी