शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
2
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
3
“डॉक्टर नसलो, तरी मोठी ऑपरेशन करतो!”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी
4
१८ व्या वर्षी तुमचं मुल होईल कोट्यधीश! SSY, NPS आणि PPF सह 'या' ६ योजनांमध्ये आजच करा गुंतवणूक
5
Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
6
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
7
Bihar: बिहारमध्ये एनडीएचा अनोखा विक्रम; २५ पैकी २४ मंत्री विजयी!
8
Tips: कामाच्या ठिकाणी होणारे मतभेद मिटवण्यासाठी ६ सोप्या टिप्स!
9
अमेरिकेची धमकी निष्फळ! २.५ अब्ज डॉलर्सची खरेदी करून भारत रशियन तेलाचा दुसरा मोठा ग्राहक
10
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
11
DSP Siraj Broke Stumps : मियाँ मॅजिक! स्टंप तोड बॉलिंगसह दाखवला 'सायमन गो बॅक'चा खास नजारा (VIDEO)
12
शाळांच्या सहलीसाठी मिळणार 'एसटी'च्या नव्या बसेस; विद्यार्थ्यांना घेता येणार संस्मरणीय अनुभव
13
भीषण अपघात! ग्वाल्हेरमध्ये फॉर्च्युनरची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक, ५ तरुणांचा जागीच मृत्यू
14
Farming: ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवसाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला मिळणार ५० हजार
15
आरबीआयने दर घटवले तरी पोस्ट ऑफिस देतंय मोठा फायदा; ५ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर कायम
16
IND vs SA : द.आफ्रिकेचा कर्णधार बावुमाचं नाबाद अर्धशतक! टीम इंडियासमोर १२४ धावांचे टार्गेट
17
Bigg Boss 19: शिव ठाकरेचा 'महाराष्ट्रीयन भाऊ'ला फूल सपोर्ट! प्रणित मोरेसाठी केली पोस्ट, म्हणाला- "भाऊ..."
18
बिहार: उत्तर तरी काय देणार.. प्रशांत किशोर यांनी बोलवलेली पत्रकार परिषद शेवटच्या क्षणी रद्द
19
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
20
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस; मंगळ ग्रहाप्रमाणे तर हाेणार नाही अवस्था?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2022 21:04 IST

Nagpur News जीववैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार, पृथ्वीवरील अनेक प्रजाती नष्ट हाेत आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत पृथ्वीची अवस्था मंगळाप्रमाणे हाेईल का, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देजीवसृष्टी विलुप्त हाेण्याच्या सहाव्या घटनेचाही धाेका यावेळी मानवनिर्मित असेल संकट

 

निशांत वानखेडे

नागपूर : काही अब्ज वर्षांपूर्वी आपल्या साैरमालेतील लाल ग्रह म्हणजे मंगळावर जीवसृष्टी किंवा पाण्याचे स्राेत असण्याचा दावा खगाेल वैज्ञानिकांद्वारे केला जाताे. मात्र, सूर्याच्या मॅग्नेटिक शक्तीमुळे तापमान वाढून सर्व नष्ट झाले. सध्या आपली पृथ्वी याच अवस्थेतून जात आहे. जागतिक तापमान वाढीचे संकट दिवसेंदिवस भीषण रूप घेत असून जीववैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार, पृथ्वीवरील अनेक प्रजाती नष्ट हाेत आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत पृथ्वीची अवस्था मंगळाप्रमाणे हाेईल का, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पृथ्वीवर आतापर्यंत पाचवेळा सामूहिकरीत्या जैवविविधता विलुप्त हाेण्याच्या घटना घडल्या आहेत. आईस एज किंवा डायनाेसार विलुप्त हाेण्याची घटना त्यामधलीच आहे. मात्र, या सगळ्या घटना नैसर्गिक आणि मानव जन्मापूर्वीच्या हाेत्या. जैवविविधतेवर संकटाची सहावी घटना मानवनिर्मित असेल, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. काही वैज्ञानिकांच्या मते, जैवविविधता विलुप्त हाेण्याच्या घटनेला सुरुवातही झाली आहे. यात अनेक पक्षी, प्राण्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत. विकासकामे आणि वनसंपदा नष्ट हाेणे, हे संकटाचे माेठे कारण आहेत.

तापमान वाढीचा धाेका

नुकत्याच एका रिपाेर्टनुसार, २०५० पर्यंत २ नाही, तर ३ अंशाने वाढण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या काही वर्षांत पृथ्वीवर प्रचंड उलथापालथ हाेण्याची शक्यता आहे. अनेक सजीव प्रजाती नष्ट हाेतील. यात असंख्य वनस्पती, सरपटणारे प्राणी व पक्ष्यांची संख्या अधिक आहे. अनियंत्रित विकास आणि जंगले नष्ट हाेत चालल्याने तापमान वाढ हाेत आहे. संशाेधकांच्या अभ्यासानुसार, मागील ४० वर्षांत जगातील अर्धे वन्यजीव नामशेष झाले आहेत. तापमान वाढ आणि प्रदूषणाचे संकट समुद्री जिवांवर अधिक वाढले आहे.

१५०० वर्षांत २.६० लाख प्रजाती नष्ट झाल्या

यूएच मानोआ पॅसिफिक बायोसायंसेज रिसर्च संस्थेच्या वैज्ञानिकांनी जमिनीत राहणारे घाेंगे यांच्या अध्ययनातून १५०० वर्षांचा इतिहास धुंडाळला आहे. त्यानुसार १५०० इसवीनंतर पृथ्वीवर ज्ञात असलेल्या २० लाख प्रजातींपैकी ७.५ ते १३ टक्के प्रजाती नामशेष झाल्या. म्हणजे जवळपास २ ला ६० हजार प्रजाती विलुप्त झाल्या. यात पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्या अधिक आहे. मात्र, मागील ४०० वर्षांत नष्ट झालेल्या केवळ ८०० प्रजातींचे डाक्युमेंटेशन हाेऊ शकले आहे. सध्याच्या परिस्थितीत दरराेज एक प्रजाती नष्ट हाेत असल्याची भीती वैज्ञानिकांना आहे.

काेराेनासारख्या महामारीचे संकट वाढेल

जंगल नष्ट झाली की प्राणी नष्ट हाेतील आणि त्याचा मानवावर प्रभाव पडणार आहे. तापमान वाढले की राेगराई वाढेल, पाऊस वाढला तर राेगराई वाढेल. प्राणी नष्ट झाले की त्यांचे आजार मानवापर्यंत पाेहोचतील. मागील दाेन वर्षांत जगभरात काेट्यवधी लाेक काेराेनाने दगावली आहेत. पुढे अशी महामारी वाढण्याची भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.

वेगाने झाडे कापली जात आहेत, तेवढ्या वेगाने नवी झाडे हाेत नाहीत. नदी व भूगर्भातून जेवढे पाणी काढताे तेवढे पावसाने भरले जात नाही. आपण अतिशय वेगाने संकटाकडे ओढले जात आहाेत. हे संकट थांबविण्यासाठी जगाने एकत्र येऊन आपली जंगले, पर्यावरण वाचविण्याची नितांत गरज आहे, अन्यथा वैज्ञानिकांच्या निर्धारित वेळेच्या आधीच सामूहिक विलुप्तीची घटना घडेल.

- प्रा. सुरेश चाेपणे, हवामान अभ्यासक.

टॅग्स :Earthपृथ्वी