शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस; मंगळ ग्रहाप्रमाणे तर हाेणार नाही अवस्था?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2022 21:04 IST

Nagpur News जीववैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार, पृथ्वीवरील अनेक प्रजाती नष्ट हाेत आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत पृथ्वीची अवस्था मंगळाप्रमाणे हाेईल का, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देजीवसृष्टी विलुप्त हाेण्याच्या सहाव्या घटनेचाही धाेका यावेळी मानवनिर्मित असेल संकट

 

निशांत वानखेडे

नागपूर : काही अब्ज वर्षांपूर्वी आपल्या साैरमालेतील लाल ग्रह म्हणजे मंगळावर जीवसृष्टी किंवा पाण्याचे स्राेत असण्याचा दावा खगाेल वैज्ञानिकांद्वारे केला जाताे. मात्र, सूर्याच्या मॅग्नेटिक शक्तीमुळे तापमान वाढून सर्व नष्ट झाले. सध्या आपली पृथ्वी याच अवस्थेतून जात आहे. जागतिक तापमान वाढीचे संकट दिवसेंदिवस भीषण रूप घेत असून जीववैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार, पृथ्वीवरील अनेक प्रजाती नष्ट हाेत आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत पृथ्वीची अवस्था मंगळाप्रमाणे हाेईल का, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पृथ्वीवर आतापर्यंत पाचवेळा सामूहिकरीत्या जैवविविधता विलुप्त हाेण्याच्या घटना घडल्या आहेत. आईस एज किंवा डायनाेसार विलुप्त हाेण्याची घटना त्यामधलीच आहे. मात्र, या सगळ्या घटना नैसर्गिक आणि मानव जन्मापूर्वीच्या हाेत्या. जैवविविधतेवर संकटाची सहावी घटना मानवनिर्मित असेल, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. काही वैज्ञानिकांच्या मते, जैवविविधता विलुप्त हाेण्याच्या घटनेला सुरुवातही झाली आहे. यात अनेक पक्षी, प्राण्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत. विकासकामे आणि वनसंपदा नष्ट हाेणे, हे संकटाचे माेठे कारण आहेत.

तापमान वाढीचा धाेका

नुकत्याच एका रिपाेर्टनुसार, २०५० पर्यंत २ नाही, तर ३ अंशाने वाढण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या काही वर्षांत पृथ्वीवर प्रचंड उलथापालथ हाेण्याची शक्यता आहे. अनेक सजीव प्रजाती नष्ट हाेतील. यात असंख्य वनस्पती, सरपटणारे प्राणी व पक्ष्यांची संख्या अधिक आहे. अनियंत्रित विकास आणि जंगले नष्ट हाेत चालल्याने तापमान वाढ हाेत आहे. संशाेधकांच्या अभ्यासानुसार, मागील ४० वर्षांत जगातील अर्धे वन्यजीव नामशेष झाले आहेत. तापमान वाढ आणि प्रदूषणाचे संकट समुद्री जिवांवर अधिक वाढले आहे.

१५०० वर्षांत २.६० लाख प्रजाती नष्ट झाल्या

यूएच मानोआ पॅसिफिक बायोसायंसेज रिसर्च संस्थेच्या वैज्ञानिकांनी जमिनीत राहणारे घाेंगे यांच्या अध्ययनातून १५०० वर्षांचा इतिहास धुंडाळला आहे. त्यानुसार १५०० इसवीनंतर पृथ्वीवर ज्ञात असलेल्या २० लाख प्रजातींपैकी ७.५ ते १३ टक्के प्रजाती नामशेष झाल्या. म्हणजे जवळपास २ ला ६० हजार प्रजाती विलुप्त झाल्या. यात पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्या अधिक आहे. मात्र, मागील ४०० वर्षांत नष्ट झालेल्या केवळ ८०० प्रजातींचे डाक्युमेंटेशन हाेऊ शकले आहे. सध्याच्या परिस्थितीत दरराेज एक प्रजाती नष्ट हाेत असल्याची भीती वैज्ञानिकांना आहे.

काेराेनासारख्या महामारीचे संकट वाढेल

जंगल नष्ट झाली की प्राणी नष्ट हाेतील आणि त्याचा मानवावर प्रभाव पडणार आहे. तापमान वाढले की राेगराई वाढेल, पाऊस वाढला तर राेगराई वाढेल. प्राणी नष्ट झाले की त्यांचे आजार मानवापर्यंत पाेहोचतील. मागील दाेन वर्षांत जगभरात काेट्यवधी लाेक काेराेनाने दगावली आहेत. पुढे अशी महामारी वाढण्याची भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.

वेगाने झाडे कापली जात आहेत, तेवढ्या वेगाने नवी झाडे हाेत नाहीत. नदी व भूगर्भातून जेवढे पाणी काढताे तेवढे पावसाने भरले जात नाही. आपण अतिशय वेगाने संकटाकडे ओढले जात आहाेत. हे संकट थांबविण्यासाठी जगाने एकत्र येऊन आपली जंगले, पर्यावरण वाचविण्याची नितांत गरज आहे, अन्यथा वैज्ञानिकांच्या निर्धारित वेळेच्या आधीच सामूहिक विलुप्तीची घटना घडेल.

- प्रा. सुरेश चाेपणे, हवामान अभ्यासक.

टॅग्स :Earthपृथ्वी