शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

National Inter-Religious Conference: देवालाही विविधता आवडते, आपल्याला विविधतेचा द्वेष का?; गुरुदेव श्री श्री रवि शंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 17:13 IST

shree shree Ravi Shankar speech in Nagpur: सर्वधर्मसमभाव व विविधता ही भारताची विशेषताच आहे, अशी भावना ‘दी आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केली.

नागपूर : विविधतेतच खरा रस असतो, तरीदेखील विविधतेचा आपल्याला द्वेष का आहे, असा अनेकदा प्रश्न पडतो. मुळात तणावातून हा द्वेष निर्माण होतो. विविधतेने बुद्धिमान लोक आनंदित होतात व मूर्ख एकमेकांशी लढतात. मानवजीवनात वैविध्यतेचा अंगीकार व्हायलाच हवा. एकत्रित येत असताना भावनांशी समरस झाले पाहिजे. प्रत्येक धर्म, पंथाची स्वत:ची विशेषता आहे. देवालादेखील विविधता आवडते. बौद्ध, जैन, ख्रिश्चन, हिंदू, इस्लाम या धर्मांमध्येदेखील वैविध्य आहे. सर्वधर्मसमभाव व विविधता ही भारताची विशेषताच आहे, अशी भावना ‘दी आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर (shree shree Ravi Shankar) यांनी व्यक्त केली. ( Lokmat National Inter-Religious Conference in Nagpur)

प्रत्येक संप्रदाय जगाचे अनमोल रत्न आहे. सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा सन्मान करायला हवा. विद्वेष निर्माण करण्याचे षडयंत्र काही लोक करतात. मात्र वैविध्यतेतच रस आहे व ईश्वर रसरूपी आहे हे लक्षात ठेवायला हवे. जर व्यक्तीची मागणी जास्त असेल व जबाबदारी घेण्याची भावना नसेल तर दु:ख वाढते. अशी व्यक्ती मनुष्य म्हणवण्यास पात्र नसते. धर्म लोकांना बांधून ठेवतो. पुढील पिढ्या आनंदी, प्रसन्न व्हाव्यात असे सर्वांना वाटते. परंतु प्रार्थनास्थळात गेल्यावर लोक गंभीर होतात. असे व्हायला नको. प्रसन्नता झळकली पाहिजे, कारण तेच धर्माचे लक्षण आहे. अध्यात्म हे मानवऊर्जेशी संबंधित असते व ते लोकांना जोडते. विविध वाद, वैमनस्य यांचे समाधान योग्य मध्यस्थीमुळे होऊ शकते. वादांचे निराकरण करणे हेदेखील धर्माचेच काम आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अन् इराकमधील आठ हजार कुटुंबीय स्वगृही परतली

यावेळी श्री श्री रविशंकर यांनी इराकमधील अनुभव सांगितले. इराकमध्ये तणावाची स्थिती असताना मी राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावर तेथे गेलो होते. इंग्लंडचे पंतप्रधान रेड झोनमध्ये थांबले होते व तेथेच बॉम्बस्फोट झाला होता. मला तेथे कडेकोट सुरक्षाव्यवस्था देण्यात आली होती. परंतु मला रेड झोनमध्ये जायचे होते. तेथे जिद्द करून गेल्यानंतर तेथील लोकांनी माझे स्वागत केले. मी त्यांच्या वेदना जाणून घेतल्या व पहिल्यांदाच आम्हाला कुणी ऐकून घेत आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी विरोधी गटातील आठ हजार कुटुंबीयांची हकालपट्टी केली होती. दुसऱ्या दिवशी मी विरोधी गटातील प्रतिनिधींना रेड झोनमध्ये घेऊन गेलो. अगोदर चर्चेदरम्यान वाद झाले, पण मग ते मध्यस्थीतून शांत झाले. तो इराकसाठी टर्निंग पॉईंट ठरला व आठ हजार कुटुंबीय स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला, असे श्री श्री रविशंकर यांनी सांगितले.

टॅग्स :National Inter-Religious Conferenceराष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद