शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
6
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
7
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
8
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
9
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
10
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
11
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
12
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
13
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
14
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
15
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
16
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
17
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
18
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
19
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
20
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

National Inter-Religious Conference: देवालाही विविधता आवडते, आपल्याला विविधतेचा द्वेष का?; गुरुदेव श्री श्री रवि शंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 17:13 IST

shree shree Ravi Shankar speech in Nagpur: सर्वधर्मसमभाव व विविधता ही भारताची विशेषताच आहे, अशी भावना ‘दी आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केली.

नागपूर : विविधतेतच खरा रस असतो, तरीदेखील विविधतेचा आपल्याला द्वेष का आहे, असा अनेकदा प्रश्न पडतो. मुळात तणावातून हा द्वेष निर्माण होतो. विविधतेने बुद्धिमान लोक आनंदित होतात व मूर्ख एकमेकांशी लढतात. मानवजीवनात वैविध्यतेचा अंगीकार व्हायलाच हवा. एकत्रित येत असताना भावनांशी समरस झाले पाहिजे. प्रत्येक धर्म, पंथाची स्वत:ची विशेषता आहे. देवालादेखील विविधता आवडते. बौद्ध, जैन, ख्रिश्चन, हिंदू, इस्लाम या धर्मांमध्येदेखील वैविध्य आहे. सर्वधर्मसमभाव व विविधता ही भारताची विशेषताच आहे, अशी भावना ‘दी आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर (shree shree Ravi Shankar) यांनी व्यक्त केली. ( Lokmat National Inter-Religious Conference in Nagpur)

प्रत्येक संप्रदाय जगाचे अनमोल रत्न आहे. सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा सन्मान करायला हवा. विद्वेष निर्माण करण्याचे षडयंत्र काही लोक करतात. मात्र वैविध्यतेतच रस आहे व ईश्वर रसरूपी आहे हे लक्षात ठेवायला हवे. जर व्यक्तीची मागणी जास्त असेल व जबाबदारी घेण्याची भावना नसेल तर दु:ख वाढते. अशी व्यक्ती मनुष्य म्हणवण्यास पात्र नसते. धर्म लोकांना बांधून ठेवतो. पुढील पिढ्या आनंदी, प्रसन्न व्हाव्यात असे सर्वांना वाटते. परंतु प्रार्थनास्थळात गेल्यावर लोक गंभीर होतात. असे व्हायला नको. प्रसन्नता झळकली पाहिजे, कारण तेच धर्माचे लक्षण आहे. अध्यात्म हे मानवऊर्जेशी संबंधित असते व ते लोकांना जोडते. विविध वाद, वैमनस्य यांचे समाधान योग्य मध्यस्थीमुळे होऊ शकते. वादांचे निराकरण करणे हेदेखील धर्माचेच काम आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अन् इराकमधील आठ हजार कुटुंबीय स्वगृही परतली

यावेळी श्री श्री रविशंकर यांनी इराकमधील अनुभव सांगितले. इराकमध्ये तणावाची स्थिती असताना मी राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावर तेथे गेलो होते. इंग्लंडचे पंतप्रधान रेड झोनमध्ये थांबले होते व तेथेच बॉम्बस्फोट झाला होता. मला तेथे कडेकोट सुरक्षाव्यवस्था देण्यात आली होती. परंतु मला रेड झोनमध्ये जायचे होते. तेथे जिद्द करून गेल्यानंतर तेथील लोकांनी माझे स्वागत केले. मी त्यांच्या वेदना जाणून घेतल्या व पहिल्यांदाच आम्हाला कुणी ऐकून घेत आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी विरोधी गटातील आठ हजार कुटुंबीयांची हकालपट्टी केली होती. दुसऱ्या दिवशी मी विरोधी गटातील प्रतिनिधींना रेड झोनमध्ये घेऊन गेलो. अगोदर चर्चेदरम्यान वाद झाले, पण मग ते मध्यस्थीतून शांत झाले. तो इराकसाठी टर्निंग पॉईंट ठरला व आठ हजार कुटुंबीय स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला, असे श्री श्री रविशंकर यांनी सांगितले.

टॅग्स :National Inter-Religious Conferenceराष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद