शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

दिव्यांगांच्या सामाजिकीकरणासाठी नागपुरात समेकित क्षेत्रीय केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 11:09 IST

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयांतर्गत दिव्यांगांच्या आरोग्य, कल्याण व विकासासाठी समेकित क्षेत्रीय केंद्र (सीआरसी) नागपुरात सुरू करण्यात आले आहे. नागपुरात सुरू झालेले हे केंद्र सर्व प्रवर्गाच्या दिव्यांगांसाठी क म्पोझिट सेंटर आहे.

ठळक मुद्देआरोग्य, कल्याण व विकास एकाच ठिकाणीमेडिकल परिसरात ४ एकर जागेवर निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयांतर्गत दिव्यांगांच्या आरोग्य, कल्याण व विकासासाठी समेकित क्षेत्रीय केंद्र (सीआरसी) नागपुरात सुरू करण्यात आले आहे. नागपुरात सुरू झालेले हे केंद्र सर्व प्रवर्गाच्या दिव्यांगांसाठी क म्पोझिट सेंटर आहे. दिव्यांगांना मिळणाऱ्या सोयीसवलतींपासून त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया या केंद्राच्या माध्यमातून संचालित करण्यात येत आहे. या केंद्राच्या निर्मितीसाठी मेडिकल परिसरात ४ एकर जागा मिळाली आहे.दिव्यांगांचे आरोग्य, कल्याण व विकासासाठी नागपुरात सुरू झालेले हे केंद्र राज्यासाठी आहे. फेब्रुवारी २०१७ पासून सुरू झालेल्या या केंद्राशी विदर्भातील किमान १० ते १५ हजार दिव्यांग जुळलेले आहेत. त्यांना आवश्यकतेनुसार सुविधा पुरविण्यात येत आहे. या केंद्राचा उद्देश दिव्यांगांना सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्याचा आहे.या केंद्रातर्फे दिव्यांगांना त्यांच्या आरोग्य, कल्याण व विकासाच्या दृष्टिकोनातून शक्य तेवढी मदत केली जाते. पक्षाघात, बहिरेपणा, बोलण्यात अडचण, मतिमंद, सिकलसेल, हिमोफिलिया, पॅरालिसिस, दुरुस्त झालेले कुष्ठरोगी, ४ फुटापेक्षा कमी उंचीची व्यक्ती, अ‍ॅसिड अटॅक पीडित व्यक्ती यांना विविध सुविधा पुरविल्या जाते. त्याचसोबत येथे पुनर्वसनाच्या दृष्टीने अभ्यासक्रम व प्रशिक्षण देण्यात येते. सध्या हे केंद्र यशवंत स्टेडियमच्या क्रीडा प्रबोधिनी सभागृहात असले तरी, भविष्यात भव्य इमारत उभारण्यात येणार आहे. येथे दिव्यांगांना लागणारे विविध प्रमाणपत्र, त्यांना मिळणाऱ्या आरोग्याच्या सुविधा, आवश्यक उपकरणे, पुनर्वसनासाठी रोजगाराचे प्रशिक्षण, दिव्यांगांच्या प्रत्येक प्रवर्गानुसार देण्यात येणार आहे. या केंद्रात १७ तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. केंद्राचे प्रमुख पद हे संचालकांचे आहे. येथून २१ प्रकारच्या दिव्यांगत्वांना सेवा पुरविण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील अपंगांची लोकसंख्या२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात अपंगांची संख्या २९ लाख ६३ हजार ३९२ एवढी आहे. हा टक्का एकूण लोकसंख्येच्या २.०१ टक्के एवढा आहे. यात १६ लाख ९२ हजार २८५ पुरुष व १२ लाख ७१ हजार १०७ स्त्रिया आहेत. प्रवर्गनिहाय अंध व अल्पदृष्टी प्रवर्गातील दिव्यांगांची टक्केवारी ३७ आहे. कर्णबधिर व भाषादोष प्रवर्गात १३ टक्के दिव्यांग आहेत. अस्थिव्यंग प्रवर्गात ३६ टक्के तर मतिमंद प्रवर्गात १४ टक्के दिव्यांग आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य