शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

भरतवनच्या संरक्षणासाठी एकवटल्या संघटना : बुधवारी मानव शृंखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 22:11 IST

फुटाळा तलावाच्या सौंदर्यीकरणांतर्गत प्रस्तावित भरतनगर ते तेलंगखेडी हनुमान मंदिरापर्यंतच्या रस्त्याला आता सर्वच स्तरातून विरोध होत आहे. या प्रस्तावित मार्गासाठी शेकडो वृक्षांच्या तोडीविरोधात ५० च्यावर संघटना एकवटल्या आहेत. याअंतर्गत बुधवारी सकाळी भरतवन व फुटाळा तलाव परिसरात मानव शृंखला आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला वनराईनेही पाठिंबा दर्शविला असून पर्यावरणाच्या प्रश्नावर जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

ठळक मुद्देवनराईने दर्शविला पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फुटाळा तलावाच्या सौंदर्यीकरणांतर्गत प्रस्तावित भरतनगर ते तेलंगखेडी हनुमान मंदिरापर्यंतच्या रस्त्याला आता सर्वच स्तरातून विरोध होत आहे. या प्रस्तावित मार्गासाठी शेकडो वृक्षांच्या तोडीविरोधात ५० च्यावर संघटना एकवटल्या आहेत. याअंतर्गत बुधवारी सकाळी भरतवन व फुटाळा तलाव परिसरात मानव शृंखला आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला वनराईनेही पाठिंबा दर्शविला असून पर्यावरणाच्या प्रश्नावर जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.फुटाळा तलावाचे सौंदर्यीकरण आणि म्युझिकल फाऊंटेन तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी अ‍ॅप्रोच म्हणून भरतनगर, अमरावती रोड ते तेलंगखेडी हनुमान मंदिर हा नवीन रोड तयार करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. धक्कादायक म्हणजे हा प्रस्तावित मार्ग भरतवन या वनपरिसरातून होत जाणार आहे. त्यासाठी वनपरिसरातील शेकडो झाडांची कटाई केली जाणार असून अशी झाडे चिन्हांकित करण्यात आली आहेत. वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांनी या प्रस्तावाबाबत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, चिन्हांकित करण्यात आलेली १५० च्यावर वृक्ष १०० ते १५० वर्षे जुने आहेत. या पुरातन झाडांसह लहानमोठी १५०० च्या जवळपास वृक्षांना मार्गासाठी तोडण्यात येणार आहे. हा प्रकल्प पर्यावरणाची मोठी हानी करणारा आहे. भरतवनच्या अधिवासात जवळपास १२० प्रजातींचे पक्षी आणि २२ मोरांचे वास्तव्य आहे. प्रस्तावाच्या एका निर्णयाने जैवविविधतेला हानी पोहचणार असल्याचे ते म्हणाले. तलावाचा प्रश्न विचारात घेतल्यास सौंदर्यीकरणाऐवजी तलावाची खोली वाढविणे, तलाव स्वच्छ करणे, बंद पडलेले पाण्याचे स्रोत जिवंत करणे या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण विकासाच्या नावावर पर्यावरणाची हानी पोहचविणारा प्रकल्प भविष्यात संकट निर्माण करणारा आहे. सौंदर्यीकरणाला प्राधान्य देण्यापेक्षा पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असून असा दुराग्रही प्रयत्न नागरिकांनी हाणून पाडावा, असे मत त्यांनी मांडले. १ मे रोजी सकाळी ७ वाजता होणाऱ्या मानव शृंखला आंदोलनात लोकांनी स्वयंस्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. पत्रपरिषदेत वनराईचे अजय पाटील, ज्येष्ठ सदस्य बाबा देशपांडे, सचिव नीलेश खांडेकर उपस्थित होते.नव्या रस्त्याची गरज काय?यावेळी माहिती देताना वनराईचे सचिव नीलेश खांडेकर यांनी सांगितले की, तलावाला लागून एक मोठा रस्ता आहे. रविनगर चौक, सिव्हील लाईन्स व सेमिनरी हिल्सकडूनही रस्ता आहे. वनराईच्या सदस्यांनी सतत २१ दिवस या मार्गांवरील वाहतुकीचे निरीक्षण केले. कुठल्याही रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होताना आढळला नाही. शहरात आधीच सिमेंटचे जंगल पसरले आहे. जे काही वृक्ष व वनपरिसर राहिला आहे, तो टिकविणे आवश्यक आहे. असे असताना शेकडो वृक्षांची कत्तल करून नवीन मार्ग निर्माण करण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :agitationआंदोलनnagpurनागपूर