शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

भरतवनच्या संरक्षणासाठी एकवटल्या संघटना : बुधवारी मानव शृंखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 22:11 IST

फुटाळा तलावाच्या सौंदर्यीकरणांतर्गत प्रस्तावित भरतनगर ते तेलंगखेडी हनुमान मंदिरापर्यंतच्या रस्त्याला आता सर्वच स्तरातून विरोध होत आहे. या प्रस्तावित मार्गासाठी शेकडो वृक्षांच्या तोडीविरोधात ५० च्यावर संघटना एकवटल्या आहेत. याअंतर्गत बुधवारी सकाळी भरतवन व फुटाळा तलाव परिसरात मानव शृंखला आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला वनराईनेही पाठिंबा दर्शविला असून पर्यावरणाच्या प्रश्नावर जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

ठळक मुद्देवनराईने दर्शविला पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फुटाळा तलावाच्या सौंदर्यीकरणांतर्गत प्रस्तावित भरतनगर ते तेलंगखेडी हनुमान मंदिरापर्यंतच्या रस्त्याला आता सर्वच स्तरातून विरोध होत आहे. या प्रस्तावित मार्गासाठी शेकडो वृक्षांच्या तोडीविरोधात ५० च्यावर संघटना एकवटल्या आहेत. याअंतर्गत बुधवारी सकाळी भरतवन व फुटाळा तलाव परिसरात मानव शृंखला आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला वनराईनेही पाठिंबा दर्शविला असून पर्यावरणाच्या प्रश्नावर जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.फुटाळा तलावाचे सौंदर्यीकरण आणि म्युझिकल फाऊंटेन तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी अ‍ॅप्रोच म्हणून भरतनगर, अमरावती रोड ते तेलंगखेडी हनुमान मंदिर हा नवीन रोड तयार करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. धक्कादायक म्हणजे हा प्रस्तावित मार्ग भरतवन या वनपरिसरातून होत जाणार आहे. त्यासाठी वनपरिसरातील शेकडो झाडांची कटाई केली जाणार असून अशी झाडे चिन्हांकित करण्यात आली आहेत. वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांनी या प्रस्तावाबाबत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, चिन्हांकित करण्यात आलेली १५० च्यावर वृक्ष १०० ते १५० वर्षे जुने आहेत. या पुरातन झाडांसह लहानमोठी १५०० च्या जवळपास वृक्षांना मार्गासाठी तोडण्यात येणार आहे. हा प्रकल्प पर्यावरणाची मोठी हानी करणारा आहे. भरतवनच्या अधिवासात जवळपास १२० प्रजातींचे पक्षी आणि २२ मोरांचे वास्तव्य आहे. प्रस्तावाच्या एका निर्णयाने जैवविविधतेला हानी पोहचणार असल्याचे ते म्हणाले. तलावाचा प्रश्न विचारात घेतल्यास सौंदर्यीकरणाऐवजी तलावाची खोली वाढविणे, तलाव स्वच्छ करणे, बंद पडलेले पाण्याचे स्रोत जिवंत करणे या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण विकासाच्या नावावर पर्यावरणाची हानी पोहचविणारा प्रकल्प भविष्यात संकट निर्माण करणारा आहे. सौंदर्यीकरणाला प्राधान्य देण्यापेक्षा पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असून असा दुराग्रही प्रयत्न नागरिकांनी हाणून पाडावा, असे मत त्यांनी मांडले. १ मे रोजी सकाळी ७ वाजता होणाऱ्या मानव शृंखला आंदोलनात लोकांनी स्वयंस्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. पत्रपरिषदेत वनराईचे अजय पाटील, ज्येष्ठ सदस्य बाबा देशपांडे, सचिव नीलेश खांडेकर उपस्थित होते.नव्या रस्त्याची गरज काय?यावेळी माहिती देताना वनराईचे सचिव नीलेश खांडेकर यांनी सांगितले की, तलावाला लागून एक मोठा रस्ता आहे. रविनगर चौक, सिव्हील लाईन्स व सेमिनरी हिल्सकडूनही रस्ता आहे. वनराईच्या सदस्यांनी सतत २१ दिवस या मार्गांवरील वाहतुकीचे निरीक्षण केले. कुठल्याही रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होताना आढळला नाही. शहरात आधीच सिमेंटचे जंगल पसरले आहे. जे काही वृक्ष व वनपरिसर राहिला आहे, तो टिकविणे आवश्यक आहे. असे असताना शेकडो वृक्षांची कत्तल करून नवीन मार्ग निर्माण करण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :agitationआंदोलनnagpurनागपूर