शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

भरतवनच्या संरक्षणासाठी एकवटल्या संघटना : बुधवारी मानव शृंखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 22:11 IST

फुटाळा तलावाच्या सौंदर्यीकरणांतर्गत प्रस्तावित भरतनगर ते तेलंगखेडी हनुमान मंदिरापर्यंतच्या रस्त्याला आता सर्वच स्तरातून विरोध होत आहे. या प्रस्तावित मार्गासाठी शेकडो वृक्षांच्या तोडीविरोधात ५० च्यावर संघटना एकवटल्या आहेत. याअंतर्गत बुधवारी सकाळी भरतवन व फुटाळा तलाव परिसरात मानव शृंखला आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला वनराईनेही पाठिंबा दर्शविला असून पर्यावरणाच्या प्रश्नावर जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

ठळक मुद्देवनराईने दर्शविला पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फुटाळा तलावाच्या सौंदर्यीकरणांतर्गत प्रस्तावित भरतनगर ते तेलंगखेडी हनुमान मंदिरापर्यंतच्या रस्त्याला आता सर्वच स्तरातून विरोध होत आहे. या प्रस्तावित मार्गासाठी शेकडो वृक्षांच्या तोडीविरोधात ५० च्यावर संघटना एकवटल्या आहेत. याअंतर्गत बुधवारी सकाळी भरतवन व फुटाळा तलाव परिसरात मानव शृंखला आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला वनराईनेही पाठिंबा दर्शविला असून पर्यावरणाच्या प्रश्नावर जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.फुटाळा तलावाचे सौंदर्यीकरण आणि म्युझिकल फाऊंटेन तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी अ‍ॅप्रोच म्हणून भरतनगर, अमरावती रोड ते तेलंगखेडी हनुमान मंदिर हा नवीन रोड तयार करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. धक्कादायक म्हणजे हा प्रस्तावित मार्ग भरतवन या वनपरिसरातून होत जाणार आहे. त्यासाठी वनपरिसरातील शेकडो झाडांची कटाई केली जाणार असून अशी झाडे चिन्हांकित करण्यात आली आहेत. वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांनी या प्रस्तावाबाबत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, चिन्हांकित करण्यात आलेली १५० च्यावर वृक्ष १०० ते १५० वर्षे जुने आहेत. या पुरातन झाडांसह लहानमोठी १५०० च्या जवळपास वृक्षांना मार्गासाठी तोडण्यात येणार आहे. हा प्रकल्प पर्यावरणाची मोठी हानी करणारा आहे. भरतवनच्या अधिवासात जवळपास १२० प्रजातींचे पक्षी आणि २२ मोरांचे वास्तव्य आहे. प्रस्तावाच्या एका निर्णयाने जैवविविधतेला हानी पोहचणार असल्याचे ते म्हणाले. तलावाचा प्रश्न विचारात घेतल्यास सौंदर्यीकरणाऐवजी तलावाची खोली वाढविणे, तलाव स्वच्छ करणे, बंद पडलेले पाण्याचे स्रोत जिवंत करणे या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण विकासाच्या नावावर पर्यावरणाची हानी पोहचविणारा प्रकल्प भविष्यात संकट निर्माण करणारा आहे. सौंदर्यीकरणाला प्राधान्य देण्यापेक्षा पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असून असा दुराग्रही प्रयत्न नागरिकांनी हाणून पाडावा, असे मत त्यांनी मांडले. १ मे रोजी सकाळी ७ वाजता होणाऱ्या मानव शृंखला आंदोलनात लोकांनी स्वयंस्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. पत्रपरिषदेत वनराईचे अजय पाटील, ज्येष्ठ सदस्य बाबा देशपांडे, सचिव नीलेश खांडेकर उपस्थित होते.नव्या रस्त्याची गरज काय?यावेळी माहिती देताना वनराईचे सचिव नीलेश खांडेकर यांनी सांगितले की, तलावाला लागून एक मोठा रस्ता आहे. रविनगर चौक, सिव्हील लाईन्स व सेमिनरी हिल्सकडूनही रस्ता आहे. वनराईच्या सदस्यांनी सतत २१ दिवस या मार्गांवरील वाहतुकीचे निरीक्षण केले. कुठल्याही रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होताना आढळला नाही. शहरात आधीच सिमेंटचे जंगल पसरले आहे. जे काही वृक्ष व वनपरिसर राहिला आहे, तो टिकविणे आवश्यक आहे. असे असताना शेकडो वृक्षांची कत्तल करून नवीन मार्ग निर्माण करण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :agitationआंदोलनnagpurनागपूर