शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

शेतकरी मृत्यूंच्या चौकशीसाठी नवीन एसआयटी स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 21:13 IST

राज्यात कीटकनाशकांमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूंची चौकशी करण्यासाठी नवीन एसआयटी स्थापन करण्यात यावी व त्या एसआयटीमध्ये एका सेवानिवृत्त न्यायाधीशाचा समावेश करण्यात यावा याकरिता सामाजिक कार्यकर्ते जम्मू आनंद यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला.

ठळक मुद्देकीटकनाशकांचे बळी : हायकोर्टात अर्ज : शासनाला मागितले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात कीटकनाशकांमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूंची चौकशी करण्यासाठी नवीन एसआयटी स्थापन करण्यात यावी व त्या एसआयटीमध्ये एका सेवानिवृत्त न्यायाधीशाचा समावेश करण्यात यावा याकरिता सामाजिक कार्यकर्ते जम्मू आनंद यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला.नवीन एसआयटी स्थापन केल्यानंतर तिला चौकशी पूर्ण करण्यासाठी कालावधी निश्चित करून देण्यात यावा, चौकशीचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात यावा, चौकशीत दोषी आढळणारे शासकीय अधिकारी व कीटकनाशके उत्पादक कंपन्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मृत्यूंची थातूरमातूर चौकशी करून डोळ्यांत धूळफेक करणारा अहवाल देणाऱ्या एसआयटीमधील अमरावती विभागीय आयुक्त (अध्यक्ष) व अन्य सदस्यांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी आणि या एसआयटीचा अहवाल रद्द करण्यात यावा अशी विनंतीही जम्मू आनंद यांनी या अर्जाद्वारे न्यायालयाला केली आहे.न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांनी हा अर्ज रेकॉर्डवर घेऊन राज्य शासनाला यावर एक आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. जम्मू आनंद यांची यासंदर्भातील जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. त्यात हा अर्ज दाखल करण्यात आला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. ए. के. वाघमारे तर, शासनातर्फे वरिष्ठ वकील सुनील मनोहर यांनी बाजू मांडली.मोठ्या माशांना वाचविण्याचा प्रयत्नअमरावती विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील एसआयटीचा अहवाल शेतकरी व शेतमजुरांची थट्टा करणारा आहे. कर्तव्यात कसूर करणारे शासकीय अधिकारी व बोगस कीटकनाशके बाजारात विकणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यासंदर्भात अहवालात काहीच म्हटल्या गेले नाही. उलट, शेतकरी व शेतमजुरांवरच गुन्हे नोंदविण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यावरून या प्रकरणात मोठ्या माशांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होते असा आरोप जम्मू आनंद यांनी केला आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयFarmerशेतकरी