शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

महाविकास आघाडीत अस्थिरता; राष्ट्रवादी सेटल होत नाही तोवर जागावाटप शक्य नाही

By कमलेश वानखेडे | Updated: May 19, 2023 18:24 IST

Nagpur News जोवर राष्ट्रवादी सेटल होत नाही, तोवर महाविकास आघाडीचे जागावाटप शक्य नाही. आताच्या परिस्थितीत महाविकास आघाडीत अस्थितरता दिसते, असे निरीक्षण वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नोंदविले.

कमलेश वानखेडे 

नागपूर : ईडी व नाबार्डच्या चौकशीखाली असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी भाजप राजकारण करेल. तेथे काय गेम होतो ते खूप महत्वाचे आहे. राष्ट्रवादीचे काही लोक स्वेच्छानिवृत्ती घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. जोवर राष्ट्रवादी सेटल होत नाही, तोवर महाविकास आघाडीचे जागावाटप शक्य नाही. दुसरीकडे कर्नाटकच्या निकालानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा सुरू केली आहे. त्यामुळे आताच्या परिस्थितीत महाविकास आघाडीत अस्थितरता दिसते, असे निरीक्षण वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नोंदविले.

ॲड. आंबेडकर म्हणाले, शालिनीताई पाटील यांनी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनवर ईडीची चौकसी सुरू असून ते जेल की स्वातंत्र्य निवडतात, यावर बरेच काही अवलंबून आहे असे वक्तव्य केले आहे. स्वातंत्र्य निवडले तर राष्ट्रवादी कमजोर होईल. दुसरीकडे शिवसेना पक्ष आता उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही. त्यांना गट म्हणून लढता येईल. पण ते पक्ष नोंदणी करायला गेले तर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या पक्षाचा व्हीप चालेल, असे जे मान्य केले आहे त्यात नुकसान होईल. शेवटी शिवसेनेला नवे चिन्ह घेऊन लढावे लागेल. या सर्व परिस्थितीत राष्ट्रवादीमुळे शिवसेनेला फायदा होताना दिसत नाही. एकूणच एकीत बिघाडी करण्याचे भाजपचे राजकारण सुरू आहे, असा आरोपही ॲड. आंबेडकर यांनी केला.

सीमावर्ती भागात बीआरएसला प्रतिसाद

- तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) महाराष्ट्रात पाऊल टाकले आहे. सीमावर्ती भागात त्यांना चांगला प्रतिसाद आहे. पुढे इतर भागात त्यांना कसा प्रतिसाद मिळतो हे पहावे लागेल. मात्र, काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षाला बीआरएसमुळे नुकसान होईल, असा दावा आंबेडकर यांनी केला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वराज्य पक्षानेही राजकीय वाटचाल सुरू केली आहे. त्यांच्याही प्रभाव वाढत आहे. एकूणच नवनवे राजकीय पर्याय समोर येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी अमेरिका दौऱ्यावर खुलासा करावा

- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जुलैमध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. युनोमध्ये काही बैठक असेल तर त्यासाठी अमेरिकेची परवानगी मागण्याची गरज पडत नाही. युनोत जुलैमध्ये कुठलिही बैठक नाही. मग अमेरिककेकडून काही निमंत्रण आले आहे का ? भारताकडे असलेल्या ‘कॉल मनी’ मध्ये मोठा वाटा अमेरिकेचा आहे. तो अमेरिका काढून घेत आहे का व या संदर्भात पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा आहे का, याचा खुलासा केंद्र सरकारने करण्याची मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. जुलैनंतर ‘कॉल मनी’ विड्रॉल होण्यास सुरुवात झाली तर मात्र देशात महागाई वाढेल. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी हा मुद्दा उचलावा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर