शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

महाविकास आघाडीत अस्थिरता; राष्ट्रवादी सेटल होत नाही तोवर जागावाटप शक्य नाही

By कमलेश वानखेडे | Updated: May 19, 2023 18:24 IST

Nagpur News जोवर राष्ट्रवादी सेटल होत नाही, तोवर महाविकास आघाडीचे जागावाटप शक्य नाही. आताच्या परिस्थितीत महाविकास आघाडीत अस्थितरता दिसते, असे निरीक्षण वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नोंदविले.

कमलेश वानखेडे 

नागपूर : ईडी व नाबार्डच्या चौकशीखाली असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी भाजप राजकारण करेल. तेथे काय गेम होतो ते खूप महत्वाचे आहे. राष्ट्रवादीचे काही लोक स्वेच्छानिवृत्ती घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. जोवर राष्ट्रवादी सेटल होत नाही, तोवर महाविकास आघाडीचे जागावाटप शक्य नाही. दुसरीकडे कर्नाटकच्या निकालानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा सुरू केली आहे. त्यामुळे आताच्या परिस्थितीत महाविकास आघाडीत अस्थितरता दिसते, असे निरीक्षण वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नोंदविले.

ॲड. आंबेडकर म्हणाले, शालिनीताई पाटील यांनी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनवर ईडीची चौकसी सुरू असून ते जेल की स्वातंत्र्य निवडतात, यावर बरेच काही अवलंबून आहे असे वक्तव्य केले आहे. स्वातंत्र्य निवडले तर राष्ट्रवादी कमजोर होईल. दुसरीकडे शिवसेना पक्ष आता उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही. त्यांना गट म्हणून लढता येईल. पण ते पक्ष नोंदणी करायला गेले तर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या पक्षाचा व्हीप चालेल, असे जे मान्य केले आहे त्यात नुकसान होईल. शेवटी शिवसेनेला नवे चिन्ह घेऊन लढावे लागेल. या सर्व परिस्थितीत राष्ट्रवादीमुळे शिवसेनेला फायदा होताना दिसत नाही. एकूणच एकीत बिघाडी करण्याचे भाजपचे राजकारण सुरू आहे, असा आरोपही ॲड. आंबेडकर यांनी केला.

सीमावर्ती भागात बीआरएसला प्रतिसाद

- तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) महाराष्ट्रात पाऊल टाकले आहे. सीमावर्ती भागात त्यांना चांगला प्रतिसाद आहे. पुढे इतर भागात त्यांना कसा प्रतिसाद मिळतो हे पहावे लागेल. मात्र, काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षाला बीआरएसमुळे नुकसान होईल, असा दावा आंबेडकर यांनी केला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वराज्य पक्षानेही राजकीय वाटचाल सुरू केली आहे. त्यांच्याही प्रभाव वाढत आहे. एकूणच नवनवे राजकीय पर्याय समोर येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी अमेरिका दौऱ्यावर खुलासा करावा

- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जुलैमध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. युनोमध्ये काही बैठक असेल तर त्यासाठी अमेरिकेची परवानगी मागण्याची गरज पडत नाही. युनोत जुलैमध्ये कुठलिही बैठक नाही. मग अमेरिककेकडून काही निमंत्रण आले आहे का ? भारताकडे असलेल्या ‘कॉल मनी’ मध्ये मोठा वाटा अमेरिकेचा आहे. तो अमेरिका काढून घेत आहे का व या संदर्भात पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा आहे का, याचा खुलासा केंद्र सरकारने करण्याची मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. जुलैनंतर ‘कॉल मनी’ विड्रॉल होण्यास सुरुवात झाली तर मात्र देशात महागाई वाढेल. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी हा मुद्दा उचलावा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर