शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
3
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
4
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
5
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
6
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
7
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
8
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
9
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
10
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
11
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
13
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
14
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
15
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
16
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
17
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
19
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
20
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

प्रेरणावाट : अवयवदान जनजागृतीसाठी १० हजार किलोमीटरचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 00:19 IST

वय वर्षे ६७. व्यवसायाने शेतकरी. शिक्षण ११ वी नापास. परंतु समाजासाठी काही तरी करण्याची जिद्द. याच जिद्दीतून अवयवदान जनजागृतीला घेऊन प्रमोद महाजन शंभर दिवसांच्या दहा हजार किलोमीटरच्या प्रवासाला बाईकने निघाले आहेत. सैन्यातील एका जवानाला मूत्रपिंड दान (किडनी) करून त्यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. ‘भारत आॅर्गन यात्रा’च्या निमित्ताने ते मंगळवारी नागपुरात पोहचले. येथे मेडिकलचे बधिरीकरण विभागाचे प्रमुख डॉ. नरेंद्र तिरपुडे यांनी त्यांचे स्वागत केले.

ठळक मुद्दे६७ वर्षीय महाजन पोहचले नागपुरात : स्वत:च्या किडनी दानातून हाती घेतली मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वय वर्षे ६७. व्यवसायाने शेतकरी. शिक्षण ११ वी नापास. परंतु समाजासाठी काही तरी करण्याची जिद्द. याच जिद्दीतून अवयवदान जनजागृतीला घेऊन प्रमोद महाजन शंभर दिवसांच्या दहा हजार किलोमीटरच्या प्रवासाला बाईकने निघाले आहेत. सैन्यातील एका जवानाला मूत्रपिंड दान (किडनी) करून त्यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. ‘भारत आॅर्गन यात्रा’च्या निमित्ताने ते मंगळवारी नागपुरात पोहचले. येथे मेडिकलचे बधिरीकरण विभागाचे प्रमुख डॉ. नरेंद्र तिरपुडे यांनी त्यांचे स्वागत केले.जिल्हा सांगली, ता. वाळवा येथील गवळी गावचे प्रमोद महाजन यांनी आपल्या ‘भारत आॅर्गन यात्रे’ला शनिवारवाडा पुणे येथून २१ आॅक्टोबर २०१८ पासून सुरुवात केली. तेथून मुंबई, राजस्थान, गुजरात, हरियाणा, दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड होत महाराष्ट्रात प्रवेश करून नागपुरात पोहचले. आपण समाजाला काही देणे लागतो, हाच उद्देश ठेवून महाजन यांनी २००९ मध्ये ‘एड्स’ जनजागृतीसाठी साडेसात हजार किलोमीटर बाईकने प्रवास केला. त्यांनी त्यांच्या नातीच्या जन्माचे स्वागत म्हणून निराधार महिलांना स्वखर्चाने साड्यांचे वाटप केले. ‘रिबर्थ फाऊंडेशन’ने महाजन यांची दुचाकी मोहीम आयोजिली आहे. मोहन फाऊंडेशन, झेडटीसीसी, बीव्हीजी, जीवनसार्थकी, रोटोसोटो, डोनेटलाईफ, मायलेज मंचर्स या स्वयंसेवी संस्थांनीदेखील या मोहिमेला पाठिंबा दर्शविला आहे.‘लोकमत’शी बोलताना महाजन म्हणाले, अवयवदान एक आशेचा किरण आहे. एक ‘मेंदूमृत’ अवयवदाता १० जणांना जीवनदान देतो, तर ३५ लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यास मदत करतो. एका मृतदेहामुळे सुमारे ४२ लोकांना आपले आयुष्य पूर्ववत जगण्यास मदत होते. परंतु आजही हव्या त्या प्रमाणात अवयवदान होत नाही. हजारो रुग्ण आज नाही तर उद्या अवयव मिळेल, या आशेने मृत्यूशी झुंज देत आहेत. एका अभ्यासानुसार अवयवाच्या विकाराने किंवा निकामी झाल्याने भारतात दरवर्षी सुमारे पाच लाख रुग्णांचा मृत्यू होतो. हे थांबावे एवढीच इच्छा या मोहिमेच्यानिमित्ताने आहे.

 

टॅग्स :Organ donationअवयव दानnagpurनागपूर