शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रेरणावाट : अवयवदान जनजागृतीसाठी १० हजार किलोमीटरचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 00:19 IST

वय वर्षे ६७. व्यवसायाने शेतकरी. शिक्षण ११ वी नापास. परंतु समाजासाठी काही तरी करण्याची जिद्द. याच जिद्दीतून अवयवदान जनजागृतीला घेऊन प्रमोद महाजन शंभर दिवसांच्या दहा हजार किलोमीटरच्या प्रवासाला बाईकने निघाले आहेत. सैन्यातील एका जवानाला मूत्रपिंड दान (किडनी) करून त्यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. ‘भारत आॅर्गन यात्रा’च्या निमित्ताने ते मंगळवारी नागपुरात पोहचले. येथे मेडिकलचे बधिरीकरण विभागाचे प्रमुख डॉ. नरेंद्र तिरपुडे यांनी त्यांचे स्वागत केले.

ठळक मुद्दे६७ वर्षीय महाजन पोहचले नागपुरात : स्वत:च्या किडनी दानातून हाती घेतली मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वय वर्षे ६७. व्यवसायाने शेतकरी. शिक्षण ११ वी नापास. परंतु समाजासाठी काही तरी करण्याची जिद्द. याच जिद्दीतून अवयवदान जनजागृतीला घेऊन प्रमोद महाजन शंभर दिवसांच्या दहा हजार किलोमीटरच्या प्रवासाला बाईकने निघाले आहेत. सैन्यातील एका जवानाला मूत्रपिंड दान (किडनी) करून त्यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. ‘भारत आॅर्गन यात्रा’च्या निमित्ताने ते मंगळवारी नागपुरात पोहचले. येथे मेडिकलचे बधिरीकरण विभागाचे प्रमुख डॉ. नरेंद्र तिरपुडे यांनी त्यांचे स्वागत केले.जिल्हा सांगली, ता. वाळवा येथील गवळी गावचे प्रमोद महाजन यांनी आपल्या ‘भारत आॅर्गन यात्रे’ला शनिवारवाडा पुणे येथून २१ आॅक्टोबर २०१८ पासून सुरुवात केली. तेथून मुंबई, राजस्थान, गुजरात, हरियाणा, दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड होत महाराष्ट्रात प्रवेश करून नागपुरात पोहचले. आपण समाजाला काही देणे लागतो, हाच उद्देश ठेवून महाजन यांनी २००९ मध्ये ‘एड्स’ जनजागृतीसाठी साडेसात हजार किलोमीटर बाईकने प्रवास केला. त्यांनी त्यांच्या नातीच्या जन्माचे स्वागत म्हणून निराधार महिलांना स्वखर्चाने साड्यांचे वाटप केले. ‘रिबर्थ फाऊंडेशन’ने महाजन यांची दुचाकी मोहीम आयोजिली आहे. मोहन फाऊंडेशन, झेडटीसीसी, बीव्हीजी, जीवनसार्थकी, रोटोसोटो, डोनेटलाईफ, मायलेज मंचर्स या स्वयंसेवी संस्थांनीदेखील या मोहिमेला पाठिंबा दर्शविला आहे.‘लोकमत’शी बोलताना महाजन म्हणाले, अवयवदान एक आशेचा किरण आहे. एक ‘मेंदूमृत’ अवयवदाता १० जणांना जीवनदान देतो, तर ३५ लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यास मदत करतो. एका मृतदेहामुळे सुमारे ४२ लोकांना आपले आयुष्य पूर्ववत जगण्यास मदत होते. परंतु आजही हव्या त्या प्रमाणात अवयवदान होत नाही. हजारो रुग्ण आज नाही तर उद्या अवयव मिळेल, या आशेने मृत्यूशी झुंज देत आहेत. एका अभ्यासानुसार अवयवाच्या विकाराने किंवा निकामी झाल्याने भारतात दरवर्षी सुमारे पाच लाख रुग्णांचा मृत्यू होतो. हे थांबावे एवढीच इच्छा या मोहिमेच्यानिमित्ताने आहे.

 

टॅग्स :Organ donationअवयव दानnagpurनागपूर