शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

प्रेरणावाट : अवयवदान जनजागृतीसाठी १० हजार किलोमीटरचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 00:19 IST

वय वर्षे ६७. व्यवसायाने शेतकरी. शिक्षण ११ वी नापास. परंतु समाजासाठी काही तरी करण्याची जिद्द. याच जिद्दीतून अवयवदान जनजागृतीला घेऊन प्रमोद महाजन शंभर दिवसांच्या दहा हजार किलोमीटरच्या प्रवासाला बाईकने निघाले आहेत. सैन्यातील एका जवानाला मूत्रपिंड दान (किडनी) करून त्यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. ‘भारत आॅर्गन यात्रा’च्या निमित्ताने ते मंगळवारी नागपुरात पोहचले. येथे मेडिकलचे बधिरीकरण विभागाचे प्रमुख डॉ. नरेंद्र तिरपुडे यांनी त्यांचे स्वागत केले.

ठळक मुद्दे६७ वर्षीय महाजन पोहचले नागपुरात : स्वत:च्या किडनी दानातून हाती घेतली मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वय वर्षे ६७. व्यवसायाने शेतकरी. शिक्षण ११ वी नापास. परंतु समाजासाठी काही तरी करण्याची जिद्द. याच जिद्दीतून अवयवदान जनजागृतीला घेऊन प्रमोद महाजन शंभर दिवसांच्या दहा हजार किलोमीटरच्या प्रवासाला बाईकने निघाले आहेत. सैन्यातील एका जवानाला मूत्रपिंड दान (किडनी) करून त्यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. ‘भारत आॅर्गन यात्रा’च्या निमित्ताने ते मंगळवारी नागपुरात पोहचले. येथे मेडिकलचे बधिरीकरण विभागाचे प्रमुख डॉ. नरेंद्र तिरपुडे यांनी त्यांचे स्वागत केले.जिल्हा सांगली, ता. वाळवा येथील गवळी गावचे प्रमोद महाजन यांनी आपल्या ‘भारत आॅर्गन यात्रे’ला शनिवारवाडा पुणे येथून २१ आॅक्टोबर २०१८ पासून सुरुवात केली. तेथून मुंबई, राजस्थान, गुजरात, हरियाणा, दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड होत महाराष्ट्रात प्रवेश करून नागपुरात पोहचले. आपण समाजाला काही देणे लागतो, हाच उद्देश ठेवून महाजन यांनी २००९ मध्ये ‘एड्स’ जनजागृतीसाठी साडेसात हजार किलोमीटर बाईकने प्रवास केला. त्यांनी त्यांच्या नातीच्या जन्माचे स्वागत म्हणून निराधार महिलांना स्वखर्चाने साड्यांचे वाटप केले. ‘रिबर्थ फाऊंडेशन’ने महाजन यांची दुचाकी मोहीम आयोजिली आहे. मोहन फाऊंडेशन, झेडटीसीसी, बीव्हीजी, जीवनसार्थकी, रोटोसोटो, डोनेटलाईफ, मायलेज मंचर्स या स्वयंसेवी संस्थांनीदेखील या मोहिमेला पाठिंबा दर्शविला आहे.‘लोकमत’शी बोलताना महाजन म्हणाले, अवयवदान एक आशेचा किरण आहे. एक ‘मेंदूमृत’ अवयवदाता १० जणांना जीवनदान देतो, तर ३५ लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यास मदत करतो. एका मृतदेहामुळे सुमारे ४२ लोकांना आपले आयुष्य पूर्ववत जगण्यास मदत होते. परंतु आजही हव्या त्या प्रमाणात अवयवदान होत नाही. हजारो रुग्ण आज नाही तर उद्या अवयव मिळेल, या आशेने मृत्यूशी झुंज देत आहेत. एका अभ्यासानुसार अवयवाच्या विकाराने किंवा निकामी झाल्याने भारतात दरवर्षी सुमारे पाच लाख रुग्णांचा मृत्यू होतो. हे थांबावे एवढीच इच्छा या मोहिमेच्यानिमित्ताने आहे.

 

टॅग्स :Organ donationअवयव दानnagpurनागपूर