शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील उद्योगांची आकस्मिक तपासणी करणार : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:00 IST

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. याबाबत शासनाने निर्देशित केलेल्या विविध उपाययोजनांची योग्य अंमलबजावणी होते किंवा नाही याची अधिकाऱ्यांचे पथक तपासणी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

ठळक मुद्देउद्योग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. याबाबत शासनाने निर्देशित केलेल्या विविध उपाययोजनांची योग्य अंमलबजावणी होते किंवा नाही याची अधिकाऱ्यांचे पथक तपासणी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. बचत भवन सभागृहात मंगळवारी अधिकारी व उद्योग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश राठी, हिंगणा एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर शेगांवकर, उपाध्यक्ष शेखर पटवर्धन, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे सचिव शशिकांत कोठारकर व नितीन लोणकर उपस्थित होते. कामाच्या ठिकाणी कामगारांचे स्क्रिनिंग, उद्योगाचे निर्जंर्तकीकरण, सुरक्षित अंतर तसेच कामगारांची आरोग्य तपासणी इत्यादी संदर्भात आकस्मिक भेटीदरम्यान पाहणी करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकारी व उद्योग क्षेत्रातील पदाधिकारी या पथकात समाविष्ट असतील. गुरुवारपासून हिंगणा एमआयडीसीमधून या भेटी सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योग समूहाने शिफारस केल्यास कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या सर्व कामगारांच्या घशातील स्रावाचे नमुने तपासण्याची व्यवस्था केली जाईल. कामाच्या ठिकाणी सुरक्षित अंतर पाळणे अनिवार्य असून कामाच्या व जेवणाच्या टेबलवर जास्त कर्मचारी असणार नाहीत. याची दक्षता उद्योगाने घ्यावी. आपल्या कारखान्यात येणाऱ्या प्रत्येक कामगाराची व अभ्यागतांची संपूर्ण माहिती उद्योगाने ठेवावी, असेदेखील रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीnagpurनागपूर