शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

पूर्व नियोजनाअभावी शाळा सुरू करण्याचा अट्टहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 00:23 IST

Starting school without prior planning दोन दिवसांनी शाळा सुरू होत असताना, विद्यार्थ्यांचा प्रवास कसा, ऑनलाइन शिक्षण किती झाले, याचे अहवाल ऐनवेळी मागण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षकांची पळापळ सुरू झाली आहे. कुठलेही पूर्व नियोजन नसताना प्रशासन शाळा सुरू करण्याचा अट्टहास करीत आहे.

ठळक मुद्देऐनवेळी शिक्षकांची पळापळ : पालक कसे सोडतील मुलांना

 लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : दोन दिवसांनी शाळा सुरू होत असताना, विद्यार्थ्यांचा प्रवास कसा, ऑनलाइन शिक्षण किती झाले, याचे अहवाल ऐनवेळी मागण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षकांची पळापळ सुरू झाली आहे. कुठलेही पूर्व नियोजन नसताना प्रशासन शाळा सुरू करण्याचा अट्टहास करीत आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात बसने प्रवास करून शाळेत येतात. सोमवारी सायंकाळी ग्रामीण भागातील अशा विद्यार्थ्यांची माहिती शाळेकडून प्रशासनाने मागितली. विशेष म्हणजे सत्र सुरू झाल्यानंतर एकही दिवस विद्यार्थ्यांची शाळा भरली नाही. त्यामुळे किती विद्यार्थी यंदा बस किंवा इतर वाहनाने शाळेत येणार याची कल्पना शिक्षकांना नाही, तरीही शिक्षकांनी धावपळ करून प्रशासनाला माहिती पुरविली. त्यातच दुसरी माहिती मागविण्यात आली की, ऑनलाईनद्वारा किती विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला याची टक्केवारी आणि किती विद्यार्थ्यांकडे ऑनलाईनची सुविधा नाही. गेल्या दोन दिवसांपासून अशा वेगवेगळ्या माहितींचे संकलन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यात मुख्याध्यापक, शिक्षक चांगलेच भरडले जात आहेत.

कसे येणार विद्यार्थी शाळेत...

सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. दुर्गम भाग व छोट्या गावातील बसेस बंद आहेत. बहुतांश ग्रामीण भागातील शाळेत १० ते १५ किलोमीटरचा प्रवास करून शाळेत येतात. पालकांना शेतीचा हंगाम असल्यामुळे ने-आण करणे कठीण आहे. त्यामुळे बस सुरू करण्याची मागणी गावकरी करीत आहेत. बस सुरू झाल्यास संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 कोरोना चाचणी करून शिक्षकांनी संकलित केले संमतिपत्र

१९ ते २२ नोव्हेंबर दरम्यान शिक्षकाना कोरोनाची चाचणी करण्याचे निर्देश दिले होते. लगेच पालकांचे संमतिपत्र गोळा करण्यासही सांगितले होते. अशात शिक्षकांनी कोरोनाच्या चाचण्या करून, पालकांच्या दारोदारी जाऊन संमतिपत्र गोळा केले. विशेष म्हणजे यातील काही शिक्षक पॉझिटिव्हदेखील आले.

टॅग्स :Schoolशाळाnagpurनागपूर