शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

 ‘अनुसूचित जाती वर्गीकरण अभ्यास समिती’वर असमानतेचा आक्षेप; विशिष्ट जातीलाच प्राधान्य दिल्याचा आरोप

By निशांत वानखेडे | Updated: December 23, 2023 19:20 IST

अनुसूचित जातीमधील उपजाती विकासात मागे पडल्याचे कारण देत राज्य सरकारने ‘अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अभ्यास समिती’ची स्थापना केली आहे.

नागपूर : अनुसूचित जातीमधील उपजाती विकासात मागे पडल्याचे कारण देत राज्य सरकारने ‘अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अभ्यास समिती’ची स्थापना केली आहे. मात्र या समितीत विशिष्ट वर्गाला प्राधान्य देण्यात आले असून असमानतेचा आरोप करीत समितीच्या स्थापनेवरच आक्षेप घेतला जात आहे. काही सामाजिक संघटनांकडून अनुसूचित जातीचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांच्या अध्यक्षतेत २० जुलै व ४ ऑक्टोबर २०२३ ला बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणासह अभ्यासासाठी ४ डिसेंबरला समिती गठीत करण्यात आली. या समितीवरच आक्षेप घेतला जात आहे. या समितीत सदस्य म्हणून विशिष्ठ वर्गाच्या प्रतिनिधींना प्राधान्य देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. उल्लेखनीय म्हणजे अनुसूचित जातीमध्ये ५९ प्रवर्गाचा समावेश आहे. मात्र त्यातील ५८ जातींना वगळून केवळ एका जातीच्या सदस्यांचा समावेश करणे अनुचित असल्याचे बोलले जात आहे. वर्गीकरणासह अभ्यास करायचा असल्यास सर्व जातींच्या परिस्थितीचा अभ्यास होणे आवश्यक आहे, पण तसे न करता झालेली प्रतिनिधींची निवड ही असमानता दर्शविणारी असून एकाच जातीच्या वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये ध्रुवीकरण करण्यासारखे असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

अहवालापूर्वीच वर्गीकरणासह बार्टीची जाहीरातराज्य सरकारने ४ डिसेंबरला एससी प्रवर्गाच्या अनुसूचित जाती वर्गीकरण अभ्यास समितीची घोषणा केली. या समितीचे कामही सुरू झालेले नाही. समिती अभ्यास करणार, त्यानंतर अहवाल तयार करून तो राज्य शासनाला पाठविणार व नंतर राज्य सरकार हा अहवाल केंद्र सरकारला पाठविणार. केंद्राच्या निर्देशानंतर काय तो निर्णय होईल. असे असताना बार्टीने ८ डिसेंबर २०२३ ला स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत निवासी प्रशिक्षणाची जाहीरात प्रसिद्ध केली. प्रशिक्षणाची व्यवस्था जातीच्या वर्गीकरणासह करून काही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. बार्टीला निर्णयापूर्वी ही घाई कशी आली, असा सवाल उपस्थित होत आहे.

बेंचमार्क सर्वेचे काय झाले?अनुसूचित जातीच्या ५९ प्रवर्गाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी धम्मज्योती गजभिये यांच्या नेतृत्वात बेंचमार्क सर्वे सुरू करण्यात आला होता. हा सर्वे पूर्ण झाला असात तर योग्य परिस्थिती समोर आली असती. मात्र अभ्यास होण्यापूर्वीच त्याचे काम गुंडाळण्यात आले. त्यामुळे सरकारची मानसिकता दिसून येत असल्याचा आरोप केला जात आहे.

अनुसूचित जातीच्या उपवर्गिकर्णाकरिता अनुसूचित जाती अभ्यास वर्गीकरण अभ्यास समिती स्थापन करून जातीय ध्रुवीकरण हे सरकार करत आहे. समितीत विशिष्ट जातीच्या प्रतिनिधींना प्राधान्य देण्यात आले आहे. ही असमानता आहे. अनुसूचित जातीच्या वर्गात ५९ जातींचा समावेश आहे, मग इतर जातींच्या प्रगतीसाठी काय योजना आहे? बार्टी च्या माध्यमातून या समाजाचा शैक्षणिक आर्थिक व राजकीय विकास का झाला नाही, हाही प्रश्न आहे. केवळ जातीय ध्रुवीकरण करण्याचा हा प्रकार होय. - अतुल खोब्रागडे, युवा ग्रॅज्युएट फोरम 

टॅग्स :nagpurनागपूर