शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

इंडिगोचे मुंबई-नागपूर विमान हैदराबादला वळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 01:16 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे एका कार्यक्रमासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी १० पासून विमानांचे उड्डाण व लॅण्डिंग बंद करण्यात आले होते. त्याचा फटाका प्रवाशांना बसला.

ठळक मुद्दे विमानतळावर व्हीआयपींची रेलचेल : प्रवाशांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे एका कार्यक्रमासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी १० पासून विमानांचे उड्डाण व लॅण्डिंग बंद करण्यात आले होते. त्याचा फटाका प्रवाशांना बसला.इंडिगोचे ६ई४८२ हे विमान निर्धारित वेळेनुसार सकाळी ८.३० वाजता मुंबईहून रवाना झाले आणि नागपुरात १० वाजता उतरणार होते. पण विमानतळावर व्हीआयपी रेलचेल असल्यामुळे विमानाने काही वेळ आकाशात घिरट्या घातल्या. अखेर हैदराबाद येथे सकाळी १०.३० वाजता उतरविण्यात आले. जवळपास दीड तास विमानतळावर थांबविण्यात आले. विमानात इंधन भरल्यानंतर विमानाने हैदराबाद येथून दुपारी १२ वाजता उड्डाण भरले आणि १२.५० वाजता नागपूर विमातळावर पोहोचले. विमान वळविल्याची बातमी विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्यांना नव्हती, हे विशेष.विमानतळाच्या फ्लाईट स्टेटस चार्टमध्ये इंडिगोचे ६ई४८२ हे विमान नागपुरात १०.४३ वाजता उतरल्याची नोंद आहे. प्रत्यक्ष माहितीनुसार हे विमान नागपुरातून हैदराबाद येथे वळविल्यानंतर तेथून १२.५० वाजता नागपुरात पोहोचले.अन्य विमानांना उशीरशनिवारी इंडिगोचे ६ई ७१३७ नागपूर-हैदराबाद विमानाचे उड्डाण सकाळी ७.३० ऐवजी ७.४६ वाजता झाले. तर जेटचे नागपूर-अलाहाबाद ९डब्ल्यू ३५५३ विमान ४५ मिनिटे विलंबासह सकाळी ८.५५ ऐवजी ९.५५ वाजता रवाना झाले.

टॅग्स :IndigoइंडिगोDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर