शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

स्वदेशी गाेवंशाच्या आयव्हीएफ तंत्रज्ञानाने कृषी क्षेत्रात क्रांती हाेईल

By निशांत वानखेडे | Updated: March 4, 2025 18:30 IST

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन : ‘माफसू’चा १२ वा दीक्षांत समारंभ समारंभ थाटात

निशांत वानखेडे, नागपूरलोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्वदेशी गाेवंशाच्या उत्पादकतेत वाढ करण्यासाठी माफसूद्वारे उपयाेग हाेत असलेले इन विट्रो फर्टिलाइजेशन (आईवीएफ) आणि भ्रूण प्रत्यारोपण (ईटीटी) या तंत्रज्ञानाने कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडेल, असा विश्वास राज्याचे राज्यपाल व विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा १२ वा दीक्षांत समारंभाचे मंगळवारी आयाेजन करण्यात आले. याप्रसंगी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, हाेमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती पद्मविभूषण डाॅ. अनिल काकाेडकर, माफसूचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, पशुपालन, डेयरी व मत्स्यपालन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., राज्यपालाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे व कुलसचिव मोना ठाकूर उपस्थित हाेते.माफसूमध्ये २०२१ पासून आयव्हीएफ तंत्रज्ञानाने ४७ वासरे जन्मली आहेत आणि भ्रूण प्रत्याराेपण तंत्राद्वारे ९७ गायींची गर्भधारणा करण्यात यश आले आहे. हे यश नवाेन्मेषी संशाेधनाची ठाेस पावती असल्याचे राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले. माफसूने शिक्षण आणि संशाेधनाच्या क्षेत्रातील बदलत्या प्रवाहाशी समन्वय करण्याचे आवाहन त्यांनी केले. नवीन शिक्षण धाेरणाने कृषी शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडेल, असा दावा त्यांनी केला. हे धाेरण बहुविषय व सर्वसमावेशक शिक्षणाला प्राधान्य देत असल्याचे ते म्हणाले. राज्यपालांनी यावेळी सहकारी दुध संघ व संस्थांचे महत्त्व अधाेरेखित केले. राज्यातील दीड लाखाहून अधिक दुग्ध सहकारी संस्थांमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना आधार मिळाल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या संशाेधन व नवकल्पनांनी दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता, सुरक्षितता व कार्यक्षमता सुधारण्यास मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. यासह मत्स्य व्यवसायालाही आधुनिक तंत्रज्ञानाशी जाेडून महाराष्ट्र व भारताला मत्स्य उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

हवामान बदल प्रतिराेधक पशुधनाचा विकास आवश्यक : डाॅ. काकाेडकर

वाढते तापमान, अनियमित पर्जन्यमान आणि दुष्काळ अशा हवामान बदलाचे दुष्परिणाम मानवांसह पशुधनावर हाेताना दिसत आहे. या बदलासाठी पशुपालन क्षेत्राला प्रतिकारक्षम बदनविण्याचे आवाहन आपल्यासमाेर आहे. तेव्हा पशुधनाच्या हवामान बदल प्रतिराेधक प्रजाती विकसित करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पद्मविभूषण डाॅ. अनिल काकाेडकर यांनी केले. पशु आराेग्याचा थेट संबंध मानवी कल्याणाशी आहे, हे काेराेना काळात समजून चुकले आहे. त्यामुळे चांगल्या पशु आराेग्य सेवा, राेग नियंत्रण प्रणाली आणि शाश्वत पशुपालन पद्धती विकसित करणे गरजेचे आहे. गगनचुंबी इमारती, साॅफ्टवेअरचा विकास व औद्याेगिक वाढ हे प्रगतीचे मानक नाही, तर प्रत्येक नागरिकाचे व ग्रामीण भागातील लाेकांचे जीवनमान किती उंचावले, यावर अवलंबून आहे. शाश्वत उपजिविका, आर्थिक स्वावलंबन व प्रत्येक कुटुंबाला सकस पाेषण आहार व सन्मानजनक जीवन मिळणे समृद्धीचे लक्षण हाेय. त्यामुळे विज्ञान आणि पशुपालन यांचा समन्वय भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी क्रांतिकारी ठरेल, असा विश्वास डाॅ. काकाेडकर यांनी व्यक्त केला.

पशु व मत्स्य उत्पादन वाढीसाठी सरकार कटिबद्ध : पंकजा मुंडेविद्यापीठ पशु आणि मत्स्य विज्ञानात जागतिक आघाडीवर राहील यासाठी पायाभूत सुविधा, संशोधन आणि सामुदायिक कार्यक्रमांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही पंकजा मुंडे यांनी दिली. संबंधित क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी अधिक संधी निर्माण करणाऱ्या उपक्रमांना सरकार सदैव पाठिंबा देत राहील. पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन क्षेत्राला प्रगत करून तरुण व्यावसायिक सफल होऊ शकतील आणि नवनिर्मिती करू शकतील, अशी परिसंस्था निर्माण करण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

७०३ विद्यार्थ्यांना पदवीदान, साहिल अव्वल

माफसूच्या दीक्षांत समारंभात ७०३ विद्यार्थ्यांना पदवीदान करण्यात आले. यात पशुवैद्यक विज्ञान पदवीचे ३८०, मत्स्य विज्ञान पदवीचे ५७, दुग्ध तंत्रज्ञानचे ५३, पदव्युत्तर पशुवैद्यक विज्ञानचे २०५, पदव्युत्तर दुग्ध तंत्रज्ञानचा १ आणि पीएचडीचे ७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याशिवाय ३० सुवर्ण, ८ रजत व राेख पुरस्कारही प्रदान करण्यात आले. नागपूरच्या पशुवैद्यक महाविद्यालयाचा विद्यार्थी साहील हा ६ सुवर्ण व ३ रजत पदकासह अव्वल ठरला. मुंबईची आस्था मेहताने २ सुवर्ण व राेख पारिताेषिक, तर क्रांती सिन्हा या विद्यार्थिनीने २ सुवर्ण पदक पटकावले.

टॅग्स :nagpurनागपूरtechnologyतंत्रज्ञान