शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

राज्यातील वृक्षलागवड मोहिमेचा कालावधी वाढण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 11:12 IST

पावसाच्या विलंबामुळे वृक्ष लागवड मोहिमेचा कालावधी वाढविला जाऊ शकतो, असे संकेत प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) साईप्रकाश यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिले.

ठळक मुद्देगडचिरोली पाचव्या क्रमांकावर पावसाच्या विलंबाने लागवडीचा वेग मंदावला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण राज्यात वृक्ष लागवडीचे ३८.३९ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. पावसाच्या विलंबामुळे मोहीम प्रभावित झाली असून ही परिस्थिती अशीच राहिल्यास वृक्ष लागवड मोहिमेचा कालावधी वाढविला जाऊ शकतो, असे संकेत प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) साईप्रकाश यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिले.राज्यात अपुऱ्या पावसामुळे या मोहिमेमध्ये वृक्ष लागवडीचा वेग मंदावल्याचे कारण सांगितले जात आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या मोहिमेतील प्रगतीचा आढावा बुधवारी मुंबईत घेणार आहेत. या मोहिमेमध्ये समाविष्ट असलेल्या ५८ विविध एजन्सींच्या कामाचा आढावा ते या बैठकीत घेणार आहेत. मोहिमेतील उद्दिष्टाशिवाय २० टक्के अतिरिक्त रोपट्यांची तरतूद करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस नसल्याने मोहीम तूर्तास थांबविली आहे. अन्य ठिकाणीही अशी परिस्थिती उद्भवल्यास निर्णय घेतला जाऊ शकतो, असे प्रधान मुख्य वनसंरक्षक साईप्रकाश यांनी सांगितले.वनभवनामध्ये झालेल्या पत्रकारपरिषदेला प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) साईप्रकाश यांच्यासह प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन, व्यवस्थापन) प्रवीण श्रीवास्तव आणि नागपूर सामाजिक वनिकरण विभागाचे वनसंरक्षक अशोक गिºहीपुंजे उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हा पहिल्या स्थानावरवनविभागाने जालना, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अहमदनगर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये ९९ टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याचा दावा साईप्रकाश यांनी केला. सामाजिक वनीकरण विभागातही सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर असून ८८ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. पालघर आणि धुळे जिल्ह्याने ८५टक्के, तर ठाणे जिल्ह्याने ७९ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. सर्व एजन्सी मिळून जुलै महिन्याच्या तिसºया आठवड्याअखेर सिंधुदुर्ग जिल्हा पहिल्या स्थानावर आहे. या जिल्ह्याने मोहिमेमध्ये ७५ टक्के उद्दिष्ट साधले असून त्या पाठोपाठ कोल्हापूर जिल्हा ७१ टक्के, ठाणे जिल्हा ७० टक्के रत्नागिरी जिल्हा ६४ टक्के तर गडचिरोली जिल्ह्याने ६० टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे.

टँकरने पाणी पुरवठ्यावरून अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमलागवड केलेली रोपटी पाण्याअभावी सुकत असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले असता साईप्रकाश म्हणाले, अद्यापही जमिनीत ओलावा असल्याने अशी स्थिती दिसल्याचा अहवाल नाही. तसेच टँकरने रोपट्यांना पाणी घालण्याची तरतूदही नाही. मिहान प्रकल्प क्षेत्रातील रोपटी सुकल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर, रोपट्यांना जगविण्यासाठी नागपूर सामाजिक वनिकरण विभागाने दोन टँकरची व्यवस्था केल्याचे सामाजिक वनिकरण विभागाचे वनसंरक्षक अशोक गिºहीपुंजे यांनी सांगितले. यामुळे टँकरने रोपट्यांना पाणी देण्याच्या मुद्यावर अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये दिसले. यानंतर मात्र अधिकाऱ्यांनी सावरासावर केली. नांदेडमधूनही या संदर्भात मागणी आली असून आकस्मिक खर्चातून अशी व्यवस्था करण्याची तरतूद असल्याचे प्रवीण श्रीवास्तव यांनी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊस