शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील वृक्षलागवड मोहिमेचा कालावधी वाढण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 11:12 IST

पावसाच्या विलंबामुळे वृक्ष लागवड मोहिमेचा कालावधी वाढविला जाऊ शकतो, असे संकेत प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) साईप्रकाश यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिले.

ठळक मुद्देगडचिरोली पाचव्या क्रमांकावर पावसाच्या विलंबाने लागवडीचा वेग मंदावला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण राज्यात वृक्ष लागवडीचे ३८.३९ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. पावसाच्या विलंबामुळे मोहीम प्रभावित झाली असून ही परिस्थिती अशीच राहिल्यास वृक्ष लागवड मोहिमेचा कालावधी वाढविला जाऊ शकतो, असे संकेत प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) साईप्रकाश यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिले.राज्यात अपुऱ्या पावसामुळे या मोहिमेमध्ये वृक्ष लागवडीचा वेग मंदावल्याचे कारण सांगितले जात आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या मोहिमेतील प्रगतीचा आढावा बुधवारी मुंबईत घेणार आहेत. या मोहिमेमध्ये समाविष्ट असलेल्या ५८ विविध एजन्सींच्या कामाचा आढावा ते या बैठकीत घेणार आहेत. मोहिमेतील उद्दिष्टाशिवाय २० टक्के अतिरिक्त रोपट्यांची तरतूद करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस नसल्याने मोहीम तूर्तास थांबविली आहे. अन्य ठिकाणीही अशी परिस्थिती उद्भवल्यास निर्णय घेतला जाऊ शकतो, असे प्रधान मुख्य वनसंरक्षक साईप्रकाश यांनी सांगितले.वनभवनामध्ये झालेल्या पत्रकारपरिषदेला प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) साईप्रकाश यांच्यासह प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन, व्यवस्थापन) प्रवीण श्रीवास्तव आणि नागपूर सामाजिक वनिकरण विभागाचे वनसंरक्षक अशोक गिºहीपुंजे उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हा पहिल्या स्थानावरवनविभागाने जालना, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अहमदनगर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये ९९ टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याचा दावा साईप्रकाश यांनी केला. सामाजिक वनीकरण विभागातही सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर असून ८८ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. पालघर आणि धुळे जिल्ह्याने ८५टक्के, तर ठाणे जिल्ह्याने ७९ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. सर्व एजन्सी मिळून जुलै महिन्याच्या तिसºया आठवड्याअखेर सिंधुदुर्ग जिल्हा पहिल्या स्थानावर आहे. या जिल्ह्याने मोहिमेमध्ये ७५ टक्के उद्दिष्ट साधले असून त्या पाठोपाठ कोल्हापूर जिल्हा ७१ टक्के, ठाणे जिल्हा ७० टक्के रत्नागिरी जिल्हा ६४ टक्के तर गडचिरोली जिल्ह्याने ६० टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे.

टँकरने पाणी पुरवठ्यावरून अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमलागवड केलेली रोपटी पाण्याअभावी सुकत असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले असता साईप्रकाश म्हणाले, अद्यापही जमिनीत ओलावा असल्याने अशी स्थिती दिसल्याचा अहवाल नाही. तसेच टँकरने रोपट्यांना पाणी घालण्याची तरतूदही नाही. मिहान प्रकल्प क्षेत्रातील रोपटी सुकल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर, रोपट्यांना जगविण्यासाठी नागपूर सामाजिक वनिकरण विभागाने दोन टँकरची व्यवस्था केल्याचे सामाजिक वनिकरण विभागाचे वनसंरक्षक अशोक गिºहीपुंजे यांनी सांगितले. यामुळे टँकरने रोपट्यांना पाणी देण्याच्या मुद्यावर अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये दिसले. यानंतर मात्र अधिकाऱ्यांनी सावरासावर केली. नांदेडमधूनही या संदर्भात मागणी आली असून आकस्मिक खर्चातून अशी व्यवस्था करण्याची तरतूद असल्याचे प्रवीण श्रीवास्तव यांनी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊस