शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राज्यातील वृक्षलागवड मोहिमेचा कालावधी वाढण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 11:12 IST

पावसाच्या विलंबामुळे वृक्ष लागवड मोहिमेचा कालावधी वाढविला जाऊ शकतो, असे संकेत प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) साईप्रकाश यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिले.

ठळक मुद्देगडचिरोली पाचव्या क्रमांकावर पावसाच्या विलंबाने लागवडीचा वेग मंदावला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण राज्यात वृक्ष लागवडीचे ३८.३९ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. पावसाच्या विलंबामुळे मोहीम प्रभावित झाली असून ही परिस्थिती अशीच राहिल्यास वृक्ष लागवड मोहिमेचा कालावधी वाढविला जाऊ शकतो, असे संकेत प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) साईप्रकाश यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिले.राज्यात अपुऱ्या पावसामुळे या मोहिमेमध्ये वृक्ष लागवडीचा वेग मंदावल्याचे कारण सांगितले जात आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या मोहिमेतील प्रगतीचा आढावा बुधवारी मुंबईत घेणार आहेत. या मोहिमेमध्ये समाविष्ट असलेल्या ५८ विविध एजन्सींच्या कामाचा आढावा ते या बैठकीत घेणार आहेत. मोहिमेतील उद्दिष्टाशिवाय २० टक्के अतिरिक्त रोपट्यांची तरतूद करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस नसल्याने मोहीम तूर्तास थांबविली आहे. अन्य ठिकाणीही अशी परिस्थिती उद्भवल्यास निर्णय घेतला जाऊ शकतो, असे प्रधान मुख्य वनसंरक्षक साईप्रकाश यांनी सांगितले.वनभवनामध्ये झालेल्या पत्रकारपरिषदेला प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) साईप्रकाश यांच्यासह प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन, व्यवस्थापन) प्रवीण श्रीवास्तव आणि नागपूर सामाजिक वनिकरण विभागाचे वनसंरक्षक अशोक गिºहीपुंजे उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हा पहिल्या स्थानावरवनविभागाने जालना, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अहमदनगर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये ९९ टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याचा दावा साईप्रकाश यांनी केला. सामाजिक वनीकरण विभागातही सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर असून ८८ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. पालघर आणि धुळे जिल्ह्याने ८५टक्के, तर ठाणे जिल्ह्याने ७९ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. सर्व एजन्सी मिळून जुलै महिन्याच्या तिसºया आठवड्याअखेर सिंधुदुर्ग जिल्हा पहिल्या स्थानावर आहे. या जिल्ह्याने मोहिमेमध्ये ७५ टक्के उद्दिष्ट साधले असून त्या पाठोपाठ कोल्हापूर जिल्हा ७१ टक्के, ठाणे जिल्हा ७० टक्के रत्नागिरी जिल्हा ६४ टक्के तर गडचिरोली जिल्ह्याने ६० टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे.

टँकरने पाणी पुरवठ्यावरून अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमलागवड केलेली रोपटी पाण्याअभावी सुकत असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले असता साईप्रकाश म्हणाले, अद्यापही जमिनीत ओलावा असल्याने अशी स्थिती दिसल्याचा अहवाल नाही. तसेच टँकरने रोपट्यांना पाणी घालण्याची तरतूदही नाही. मिहान प्रकल्प क्षेत्रातील रोपटी सुकल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर, रोपट्यांना जगविण्यासाठी नागपूर सामाजिक वनिकरण विभागाने दोन टँकरची व्यवस्था केल्याचे सामाजिक वनिकरण विभागाचे वनसंरक्षक अशोक गिºहीपुंजे यांनी सांगितले. यामुळे टँकरने रोपट्यांना पाणी देण्याच्या मुद्यावर अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये दिसले. यानंतर मात्र अधिकाऱ्यांनी सावरासावर केली. नांदेडमधूनही या संदर्भात मागणी आली असून आकस्मिक खर्चातून अशी व्यवस्था करण्याची तरतूद असल्याचे प्रवीण श्रीवास्तव यांनी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊस