शहरं
Join us  
Trending Stories
1
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
2
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
3
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
4
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
5
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
6
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
7
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
8
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
9
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
10
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
11
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
12
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
13
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
14
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
15
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
16
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
17
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
18
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
19
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अंतराळातील उपग्रहांचा कचरा दूर करण्यात भारताची दमदार कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2023 20:46 IST

Nagpur News संपूर्ण देशातील लाेक मंगळवारी धुळवडीचा आनंद घेत असताना भारतीय अंतराळ संशाेधन संस्था-इस्राेने दमदार कामगिरी करीत जगाचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देइस्राेने प्रशांत महासागरात सुरक्षित पाडला ‘मेघा ट्राॅपिक्स-१’ भविष्यातील धाेके दूर करणारी कामगिरीचीनला नाही जमले ते भारताने केले

 

नागपूर : संपूर्ण देशातील लाेक मंगळवारी धुळवडीचा आनंद घेत असताना भारतीय अंतराळ संशाेधन संस्था-इस्राेने दमदार कामगिरी करीत जगाचे लक्ष वेधले. इस्राेच्या वैज्ञानिकांनी पृथ्वीच्या कक्षेतील ‘मेघा ट्राॅपिक्स-१’ या कालबाह्य झालेल्या उपग्रहाला सुरक्षित आणि नियंत्रितपणे प्रशांत महासागरात पाडले. अंतराळात फिरत असलेला मृत उपग्रहांचा कचरा दूर करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

उष्णकटिबंधीय हवामान आणि पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी इस्राेने फ्रेंच अंतराळ संशाेधन संस्था सीएनईसीच्या सहकार्याने ‘मेघा ट्राॅपिक्स-१’ हे उपग्रह १२ ऑक्टाेबर २०११ राेजी पृथ्वीच्या कमी कक्षेत यशस्वीपणे धाडले हाेते. हे उपग्रह तीन वर्षांच्या मर्यादित कालावधीसाठी प्रक्षेपित केले हाेते. मात्र, उपग्रहाने २०२१ पर्यंत यशस्वीपणे कार्य बजावले. त्यानंतर कालबाह्य झालेले हे उपग्रह पाडण्यासाठी इस्राेची २०२२ पासून प्रक्रिया सुरू केली हाेती. युनायटेड नेशन्स इंटर-एजेन्सी स्पेस ड्रब्रीस काे-आर्डिनेशन कमिटीने याबाबत वेळ आणि काळ निर्धारित करून उपग्रह पाडण्याची परवानगी दिली. विशेष म्हणजे, १०२१ किलाे वजनाच्या या उपग्रहामध्ये १२५ किलाे इंधन असल्याने पाडताना धाेका हाेण्याची भीती व्यक्त केली जात हाेती. शिवाय पृथ्वीच्या वातावरणात येताच ते भरकटण्याची शक्यताही हाेती. चिनी उपग्रह अनेकदा कक्षेबाहेर जाऊन पृथ्वीच्या वातावरणात पडल्याच्या अनेक घटना आपल्याला माहिती आहेत. गेल्याच वर्षी चंद्रपूरकरांनी याचा अनुभव घेतला आहे. मात्र, इस्राेच्या वैज्ञानिकांनी काैशल्य पणाला लावून उपग्रह नियंत्रितपणे प्रशांत महासागरात पाडले.

तज्ज्ञांच्या मते अनेक देशांनी हजाराे उपग्रह मागील ५० वर्षांपासून अंतराळात पाठविले असून कालबाह्य झालेल्या उपग्रहांच्या लाखाे सुट्या भागांचा कचरा अंतराळात सैरभैर फिरत आहे. यातील काही कमी कक्षेत, मध्यम कक्षेत आणि उच्च कक्षेत आहेत. हे उपग्रह कधी कधी भरकटत पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने खाली पडतात. हे सुटे भाग खाली पडताना माेठा विमान अपघात हाेण्याची भीती वाढली आहे. शिवाय कधी मानवी यान अंतराळात पाठविताना अंतराळात फिरणाऱ्या या कचऱ्यामुळे माेठा अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इस्राेची ही कामगिरी महत्त्वपूर्ण असल्याचे मानले जात आहे.

टॅग्स :isroइस्रो