शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

देशाचे नवे शैक्षणिक धोरण लवकरच; सत्यपाल सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 11:45 IST

शैक्षणिक धोरणाचा मसुदा येत्या ३१ मार्चपर्यंत सादर होण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय मानव संसाधन विकास, नदी विकास व गंगा शुद्धीकरण राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांनी गुरुवारी येथे सांगितले.

ठळक मुद्दे३१ मार्चपर्यंत मसुदा येण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील सध्याच्या शैक्षणिक धोरणात बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यावर काम सुरू आहे. नवीन धोरण तयार करण्यासाठी प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने तयार केलेला शैक्षणिक धोरणाचा मसुदा येत्या ३१ मार्चपर्यंत सादर होण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय मानव संसाधन विकास, नदी विकास व गंगा शुद्धीकरण राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांनी गुरुवारी येथे सांगितले.सेंट्रल इंडिया ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटतर्फे गांधीसागर महाल येथील रजवाडा पॅलेस येथे आयोजित एक दिवसीय सेमिनारच्या समारोपपसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी माजी मंंत्री व संस्थेचे अध्यक्ष अनिस अहमद, माजी खासदार गेव्ह आवारी, ग्रामीण आजीविका मिशनच्या सीईओ आर. विमला, नगरसेवक जुल्फीकार भुट्टो आणि अतुल कोटेचा प्रामुख्याने उपस्थित होते.डॉ. सत्यपाल सिंग म्हणाले, शिक्षणाचा सर्वात मोठा उद्देश म्हणजे मुलांचा समग्र विकास होय. त्यांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने देशाचे वातावरण बदलेल. मुलांना मूल्यात्मक शिक्षण शिकवण्याची गरज आहे. नवीन शैक्षणिक धोरणात यासर्व गोष्टींचा समावेश करण्याचा विचार आहे. यासोबतच स्थानिक भाषेला मजबूत करणे, देशातील शैक्षणिक सुविधा वाढवणे, गरीब मुलही शिकू शकतील, अशी व्यवस्था निर्माण करणे, अकाऊंटिबिलीटी वाढवणे , स्कील मॅन पॉवर तयार करणे याशिवाय नवीन अत्याधुनिक शिक्षणावरही भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अनिस अहमद यांनी प्रास्ताविक केले. संचालन डॉ. अब्दुल आहत यांनी केले. इकरा खान यांनी आभार मानले.

फार्मसीच्या अभ्यासक्रमात असावी सर्व पॅथीच्या औषधांची माहितीफार्मसीच्या अभ्यासक्रमात अ‍ॅलोपॅथीसोबतच आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी आदी औषधांंच्या माहितीचाही समावेश व्हावा. याबाबत आपण मंत्रालयातील अधिकाºयांनाही सूचना करणार असल्याचे डॉ. सिंग यांनी सांगितले.देशभरातील तरुण अभियंत्यांशी साधणार संवादयेत्या ३० मार्च रोजी देशभरातील तरुण अभियंत्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. यात देशातील १ लाख अभियंते सहभागी होणार आहेत. ते देशातील सध्याची समस्या व त्यावर उपाय सुचवणार आहेत.

नवीन धोरणात आरएसएसच्या प्रस्तावाचीही दखलराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत बोली व मातृभाषेच्या संरक्षणाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. संघाच्या या प्रस्तावाची दखल नवीन शैक्षणिक धोरणात घेण्यात येणार असल्याचे डॉ. सत्यपाल सिंग यांनी यावेळी मान्य केले. भारतीय भाषा आणि मातृभाषेवर जोर दिला जाईल, असे स्पष्ट करीत भारतातील प्राचीन परंपरा, संस्कृती, ज्ञान टिकवून ठेवणे आणि जीवन मूल्यावरही नवीन धोरणात भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Satyapal Singhसत्यपाल सिंगEducation Sectorशिक्षण क्षेत्र