शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

भारताची अर्थव्यवस्था चार वर्षात गतिशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:21 IST

गेल्या चार वर्षात देशाची अर्थव्यवस्था गतीने वाढत आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. जीडीपीमध्ये भारताचा जगात सहावा क्रमांक आहे. रशिया आणि इटली यांच्या अर्थव्यवस्थेलाही भारताने मागे टाकले आहे. वर्ल्ड बँक, एशियन डेव्हलपमेंट आऊटलूक यासांरख्या जागतिक संस्थांनी सुद्धा यावर शिक्कामोर्तब केले आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध सनदी लेखापाल व अर्थशस्त्रज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी येथे केले.

ठळक मुद्देविनायक गोविलकर : भाऊसाहेब चांद्रायण स्मृती व्याख्यान

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या चार वर्षात देशाची अर्थव्यवस्था गतीने वाढत आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. जीडीपीमध्ये भारताचा जगात सहावा क्रमांक आहे. रशिया आणि इटली यांच्या अर्थव्यवस्थेलाही भारताने मागे टाकले आहे. वर्ल्ड बँक, एशियन डेव्हलपमेंट आऊटलूक यासांरख्या जागतिक संस्थांनी सुद्धा यावर शिक्कामोर्तब केले आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध सनदी लेखापाल व अर्थशस्त्रज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी येथे केले.सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च नागपूर व दि इन्स्टिट्युट आॅफ इंजिनिअर्स इंडिया नागपूर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर अंबाझरी मार्ग येथील दि इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनियर्सच्या सभागृहात ‘भारतीय अर्थव्यवस्था : दशा व दिशा’ या विषयावर आयोजित भाऊसाहेब चांद्रायण स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अर्थशास्त्रज्ञ व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. विनायक देशपांडे होते.दि. इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनियर्स नागपूर सेंटरचे अध्यक्ष डॉ. दिलीप मसे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी डॉ. गोविलकर यांनी लिहिलेल्या ‘मोदीनॉमिक्स’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.डॉ. गोविलकर यांनी स्वातंत्र्यापासून तर २०१४ पर्यंत अर्थव्यवस्थेचे विश्लेषण केले. डॉ. मनमोहन सिंग हे जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ आहेत. ते अर्थमंत्री म्हणून यशस्वी ठरले. पण तेच पंतप्रधान म्हणून यशस्वी ठरले का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. २०१४ मध्ये नवीन सरकार आले. त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षाही खूप होत्या. त्या सर्वच पूर्ण करणे चार वर्षात शक्य नाही. परंतु धोरण तयार करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ते राबवून घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे. गेल्या चार वर्षात नरेंद्र मोदी यांनी नेमके हेच केले आहे. काम करवून घेणे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. चार वर्षात जे काही बदल दिसून येत आहे, हे त्याच्यामुळेच, असेही गोविलकर यांनी स्पष्ट केले. चार वर्षात झालेल्या कामांचा पाढाच त्यांनी यावेळी वाचून दाखवला.डॉ. विनायक देशपांडे यांनी येणाºया काळात रोजगार हे सर्वात मोठे आव्हान राहणार असल्याचे स्पष्ट केले.डॉ. कपिल चांद्रायण यांनी पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक केले. सौरभ जोशी यांनी भूमिका विषद केली. संचालन प्रज्ञा नगरनाईक यांनी केले. डॉ. मिलिंद पाठक यांनी आभार मानले.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाIndiaभारत