शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

भारताची अर्थव्यवस्था चार वर्षात गतिशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:21 IST

गेल्या चार वर्षात देशाची अर्थव्यवस्था गतीने वाढत आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. जीडीपीमध्ये भारताचा जगात सहावा क्रमांक आहे. रशिया आणि इटली यांच्या अर्थव्यवस्थेलाही भारताने मागे टाकले आहे. वर्ल्ड बँक, एशियन डेव्हलपमेंट आऊटलूक यासांरख्या जागतिक संस्थांनी सुद्धा यावर शिक्कामोर्तब केले आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध सनदी लेखापाल व अर्थशस्त्रज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी येथे केले.

ठळक मुद्देविनायक गोविलकर : भाऊसाहेब चांद्रायण स्मृती व्याख्यान

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या चार वर्षात देशाची अर्थव्यवस्था गतीने वाढत आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. जीडीपीमध्ये भारताचा जगात सहावा क्रमांक आहे. रशिया आणि इटली यांच्या अर्थव्यवस्थेलाही भारताने मागे टाकले आहे. वर्ल्ड बँक, एशियन डेव्हलपमेंट आऊटलूक यासांरख्या जागतिक संस्थांनी सुद्धा यावर शिक्कामोर्तब केले आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध सनदी लेखापाल व अर्थशस्त्रज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी येथे केले.सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च नागपूर व दि इन्स्टिट्युट आॅफ इंजिनिअर्स इंडिया नागपूर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर अंबाझरी मार्ग येथील दि इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनियर्सच्या सभागृहात ‘भारतीय अर्थव्यवस्था : दशा व दिशा’ या विषयावर आयोजित भाऊसाहेब चांद्रायण स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अर्थशास्त्रज्ञ व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. विनायक देशपांडे होते.दि. इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनियर्स नागपूर सेंटरचे अध्यक्ष डॉ. दिलीप मसे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी डॉ. गोविलकर यांनी लिहिलेल्या ‘मोदीनॉमिक्स’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.डॉ. गोविलकर यांनी स्वातंत्र्यापासून तर २०१४ पर्यंत अर्थव्यवस्थेचे विश्लेषण केले. डॉ. मनमोहन सिंग हे जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ आहेत. ते अर्थमंत्री म्हणून यशस्वी ठरले. पण तेच पंतप्रधान म्हणून यशस्वी ठरले का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. २०१४ मध्ये नवीन सरकार आले. त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षाही खूप होत्या. त्या सर्वच पूर्ण करणे चार वर्षात शक्य नाही. परंतु धोरण तयार करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ते राबवून घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे. गेल्या चार वर्षात नरेंद्र मोदी यांनी नेमके हेच केले आहे. काम करवून घेणे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. चार वर्षात जे काही बदल दिसून येत आहे, हे त्याच्यामुळेच, असेही गोविलकर यांनी स्पष्ट केले. चार वर्षात झालेल्या कामांचा पाढाच त्यांनी यावेळी वाचून दाखवला.डॉ. विनायक देशपांडे यांनी येणाºया काळात रोजगार हे सर्वात मोठे आव्हान राहणार असल्याचे स्पष्ट केले.डॉ. कपिल चांद्रायण यांनी पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक केले. सौरभ जोशी यांनी भूमिका विषद केली. संचालन प्रज्ञा नगरनाईक यांनी केले. डॉ. मिलिंद पाठक यांनी आभार मानले.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाIndiaभारत