शहरं
Join us  
Trending Stories
1
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
2
BMC Election 2026: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा EXIT POLL
3
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
4
Maharashtra BMC Exit Poll Result 2026 LIVE: पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाची सत्ता, अजित पवार विरोधी बाकावर
5
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
6
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
7
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
8
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
9
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
10
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
11
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
12
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
13
Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)
14
दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
15
ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद
16
कंटेनरची Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला
17
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
18
धक्कादायक! दिल्लीत ५ दिवसांत दुसरी मोठी सायबर फसवणूक; 'डिजिटल अरेस्ट' करुन महिलेची ७ कोटी रुपयांना फसवणूक
19
Anil Parab: "ही शाई नाही, मार्कर आहे!" अनिल परबांचा महापालिका निवडणुकीत मोठ्या गडबडीचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

भारताची संरक्षण यंत्रणा चीनपेक्षा कमी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 12:56 IST

भारताची यंत्रणा अधिक सुस्थितीत असल्याचा विश्वास निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्दे वर्चस्वासाठी ड्रॅगनच्या उचापती

निशांत वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संरक्षण यंत्रणा व तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीन बलवान असल्याचे बोलले जात असले तरी भारतही काही कमी नाही. सैन्य कमी असले तरी आपणही मिसाईल, विमान व अण्वस्त्रांबाबत सक्षम आहोत. याशिवाय सियाचीन, लडाखचा भाग खडतर असला तरी परिस्थिती भारतासाठी अनुकूल आहे. कमी उंचीवरून विमाने उडवताना अधिक दारूगोळा नेता येतो, याउलट उंचावर असलेल्या चिनी सैन्याला ते अडचणीचे आहे. त्यामुळे आपली यंत्रणा अधिक सुस्थितीत असल्याचा विश्वास निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केला. कर्नल पटवर्धन हे १९७५-७६ या काळात कॅप्टन म्हणून सियाचीन भागात तैनात होते. सियाचीनकडे जाणारे बेस शोधताना त्यांच्या टीमने या भागात पॅट्रोलिंग केली. सध्या भारत आणि चीनमध्ये तणाव सुरू आहे. कर्नल पटवर्धन यांनी लोकमतशी बोलताना या भागातील परिस्थितीची माहिती दिली. पूर्व हिमालयाच्या पेंगाँग सरोवरातून गलवान नदी निघते व ती पुढे लेह, काश्मीरमार्गे सिंधू नदीला जाऊन मिळते. गलवान खोऱ्याने काराकोरम पर्वताच्या खिंडीतून कजाकिस्तान, अफगाणिस्तान व इराणमार्गे युरोपकडे जाणारा मार्ग निघतो.विशेष म्हणजे चीनचा २७ देशांमधून जाणारा बॉर्डर रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) हा अति महत्त्वाकांक्षी प्रकल्प या काराकोरम खिंडीतूनच पाकिस्तानकडे जातो. त्यामुळेच चीनची धडपड सुरू आहे. त्यांनी जर या भागावर कब्जा केला तर भारतासाठी अडचणीचे होईल, म्हणून त्यांना दूर ठेवणे हा आपला प्रयत्न आहे. ६ जूनला गलवान खोºयात ड्रॅगनच्या हालचालीमुळे तणाव झाला. त्यानंतर सेनाधिकाऱ्यांमध्ये बोलणी झाली पण १५ जूनला ही धुमश्चक्री झाली. रात्री ११ पासून पहाटे ४ वाजेपर्यंत दोन्ही बाजूंच्या ४००-५०० सैन्यात संघर्ष झाला. यात निश्चितच चिनी सैन्याचे नुकसान अधिक झाले आहे. सध्या परराष्ट्र मंत्रालय व लष्करी अधिकारी स्तरावर चर्चा सुरू आहे पण जमिनीवर सैनिकांना कारवाईची मुभा दिली आहे, ही बाब अतिशय समाधानकारक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.शरीर गोठविणारी थंडीगलवान नदीचे पात्र ५ ते ६ फूट खोल असेल; पण नदीचा वेग अधिक आहे. या खोऱ्यात १० महिने थंडी असते आणि दोनच महिने वातावरण साफ असते. मात्र जीवघेणी थंडी असते. येथील तापमान शून्य अंशाच्या खाली असते आणि या शरीर गोठविणाऱ्या थंडीत आपले जवान सीमेवर तैनात राहून शौर्याने लढत असतात. अशा कठीण परिस्थितीतही आपले सैनिक ड्रॅगनच्या कुरापतींशी लढण्यास सक्षम आहेत.

हा भारताचा जुना व्यापारी मार्गपेनोंग लेकमधून निघणारे गलवान नदीचे खोरे १५० ते २०० फुटाचे आहे आणि दोन्ही बाजूला उत्तुंग टेकड्या आहेत. जुन्या काळी हाच इतर देशांचा व्यापारी मार्ग होता. व्यापारी गलवान खोऱ्यातून येत पुढे लेह व काश्मीर मार्गे दिल्लीकडे जायचे. याच मार्गाने भारतावर आक्रमणही करण्यात आले आहे. दौलतबेग ओलडी हा मार्गाचा थांबा होता. विशेष म्हणजे नागपूर येथील एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी याच खडतर बेसवर लढाऊ विमान यशस्वीपणे उतरविले होते.

टॅग्स :chinaचीनIndian Armyभारतीय जवान