शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भारताची संरक्षण यंत्रणा चीनपेक्षा कमी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 12:56 IST

भारताची यंत्रणा अधिक सुस्थितीत असल्याचा विश्वास निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्दे वर्चस्वासाठी ड्रॅगनच्या उचापती

निशांत वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संरक्षण यंत्रणा व तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीन बलवान असल्याचे बोलले जात असले तरी भारतही काही कमी नाही. सैन्य कमी असले तरी आपणही मिसाईल, विमान व अण्वस्त्रांबाबत सक्षम आहोत. याशिवाय सियाचीन, लडाखचा भाग खडतर असला तरी परिस्थिती भारतासाठी अनुकूल आहे. कमी उंचीवरून विमाने उडवताना अधिक दारूगोळा नेता येतो, याउलट उंचावर असलेल्या चिनी सैन्याला ते अडचणीचे आहे. त्यामुळे आपली यंत्रणा अधिक सुस्थितीत असल्याचा विश्वास निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केला. कर्नल पटवर्धन हे १९७५-७६ या काळात कॅप्टन म्हणून सियाचीन भागात तैनात होते. सियाचीनकडे जाणारे बेस शोधताना त्यांच्या टीमने या भागात पॅट्रोलिंग केली. सध्या भारत आणि चीनमध्ये तणाव सुरू आहे. कर्नल पटवर्धन यांनी लोकमतशी बोलताना या भागातील परिस्थितीची माहिती दिली. पूर्व हिमालयाच्या पेंगाँग सरोवरातून गलवान नदी निघते व ती पुढे लेह, काश्मीरमार्गे सिंधू नदीला जाऊन मिळते. गलवान खोऱ्याने काराकोरम पर्वताच्या खिंडीतून कजाकिस्तान, अफगाणिस्तान व इराणमार्गे युरोपकडे जाणारा मार्ग निघतो.विशेष म्हणजे चीनचा २७ देशांमधून जाणारा बॉर्डर रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) हा अति महत्त्वाकांक्षी प्रकल्प या काराकोरम खिंडीतूनच पाकिस्तानकडे जातो. त्यामुळेच चीनची धडपड सुरू आहे. त्यांनी जर या भागावर कब्जा केला तर भारतासाठी अडचणीचे होईल, म्हणून त्यांना दूर ठेवणे हा आपला प्रयत्न आहे. ६ जूनला गलवान खोºयात ड्रॅगनच्या हालचालीमुळे तणाव झाला. त्यानंतर सेनाधिकाऱ्यांमध्ये बोलणी झाली पण १५ जूनला ही धुमश्चक्री झाली. रात्री ११ पासून पहाटे ४ वाजेपर्यंत दोन्ही बाजूंच्या ४००-५०० सैन्यात संघर्ष झाला. यात निश्चितच चिनी सैन्याचे नुकसान अधिक झाले आहे. सध्या परराष्ट्र मंत्रालय व लष्करी अधिकारी स्तरावर चर्चा सुरू आहे पण जमिनीवर सैनिकांना कारवाईची मुभा दिली आहे, ही बाब अतिशय समाधानकारक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.शरीर गोठविणारी थंडीगलवान नदीचे पात्र ५ ते ६ फूट खोल असेल; पण नदीचा वेग अधिक आहे. या खोऱ्यात १० महिने थंडी असते आणि दोनच महिने वातावरण साफ असते. मात्र जीवघेणी थंडी असते. येथील तापमान शून्य अंशाच्या खाली असते आणि या शरीर गोठविणाऱ्या थंडीत आपले जवान सीमेवर तैनात राहून शौर्याने लढत असतात. अशा कठीण परिस्थितीतही आपले सैनिक ड्रॅगनच्या कुरापतींशी लढण्यास सक्षम आहेत.

हा भारताचा जुना व्यापारी मार्गपेनोंग लेकमधून निघणारे गलवान नदीचे खोरे १५० ते २०० फुटाचे आहे आणि दोन्ही बाजूला उत्तुंग टेकड्या आहेत. जुन्या काळी हाच इतर देशांचा व्यापारी मार्ग होता. व्यापारी गलवान खोऱ्यातून येत पुढे लेह व काश्मीर मार्गे दिल्लीकडे जायचे. याच मार्गाने भारतावर आक्रमणही करण्यात आले आहे. दौलतबेग ओलडी हा मार्गाचा थांबा होता. विशेष म्हणजे नागपूर येथील एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी याच खडतर बेसवर लढाऊ विमान यशस्वीपणे उतरविले होते.

टॅग्स :chinaचीनIndian Armyभारतीय जवान