शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

कुलभूषण जाधव यांच्या फाशीवरील स्थगितीमुळे भारताचा मोठा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 21:40 IST

हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बुधवारी भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिल्यामुळे नागपूरमध्ये विधी क्षेत्रासह सर्वत्र आनंद साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देनागपूरच्या  विधी क्षेत्रात आनंद : आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बुधवारी भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिल्यामुळे नागपूरमध्ये विधी क्षेत्रासह सर्वत्र आनंद साजरा करण्यात आला. विधिज्ञांनी हा भारताचा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. एप्रिल-२०१७ मध्ये पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरी व दहशतवादाच्या गुन्ह्यासाठी जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताला दिलासा दिला.भारताचे दावे खरे ठरलेआंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताने मांडलेले कायदेविषयक मुद्दे खरे ठरले. जाधव यांना अटक करताना व त्यांच्याविरुद्ध खटला चालवताना पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले हे भारताने ठोस पुराव्यांसह सिद्ध करून दाखवले. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या १६ पैकी १५ न्यायमूर्तींनी भारताची बाजू योग्य ठरवली. कायद्याच्या बाबतीत हा भारताचा फार मोठा विजय आहे. वरिष्ठ अधिवक्ता आनंद जयस्वालपाकिस्तानचा खरा चेहरा उघडआंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा जगापुढे आला. पाकिस्तान नेहमीच मानवाधिकरांचे उल्लंघन करतो हे स्पष्ट झाले. जाधव यांच्या बाबतीत पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले होते. त्यांनी जाधव यांना भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याची संधीही दिली नव्हती. त्यामुळे जाधव यांना स्वत:चा बचाव करता आला नाही. आता जाधव यांना भारताकडून कायदेशीर सहकार्य मिळू शकेल.अ‍ॅड. फिरदोस मिर्झाव्हिएन्ना कराराचे उल्लंघन सिद्धजाधव यांच्या बाबतीत पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले होते हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयामुळे सिद्ध झाले. जाधव हे भारताचे हेर नसतानाही पाकिस्तानने त्यांना बळजबरीने ताब्यात घेतले. तसेच, त्यांच्याविरुद्ध खटला चालवून फाशीची शिक्षा सुनावली. पाकिस्तानने जाधव यांच्यावर केलेले सर्व आरोप निराधार आहेत. या प्रकरणात पाकिस्तान मानवाधिकार विसरून शत्रुत्वाच्या भावनेने वागला. अ‍ॅड. शशिभूषण वहाणेभारताचा मोठा विजय झालाआंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीवर स्थगिती दिल्यामुळे भारताने मोठी लढाई जिंकली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या १६ पैकी तब्बल १५ न्यायमूर्तींनी भारताच्या बाजूने निर्णय दिला. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याचे निरीक्षण निर्णयात नोंदविण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानने जाधव यांच्यावर अन्याय केल्याचे सर्व जगाला कळले आहे. यापुढे पाकिस्तानला सांभाळून वागावे लागेल.अ‍ॅड. राजेंद्र डागा

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवnagpurनागपूर