शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

कुलभूषण जाधव यांच्या फाशीवरील स्थगितीमुळे भारताचा मोठा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 21:40 IST

हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बुधवारी भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिल्यामुळे नागपूरमध्ये विधी क्षेत्रासह सर्वत्र आनंद साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देनागपूरच्या  विधी क्षेत्रात आनंद : आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बुधवारी भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिल्यामुळे नागपूरमध्ये विधी क्षेत्रासह सर्वत्र आनंद साजरा करण्यात आला. विधिज्ञांनी हा भारताचा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. एप्रिल-२०१७ मध्ये पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरी व दहशतवादाच्या गुन्ह्यासाठी जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताला दिलासा दिला.भारताचे दावे खरे ठरलेआंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताने मांडलेले कायदेविषयक मुद्दे खरे ठरले. जाधव यांना अटक करताना व त्यांच्याविरुद्ध खटला चालवताना पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले हे भारताने ठोस पुराव्यांसह सिद्ध करून दाखवले. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या १६ पैकी १५ न्यायमूर्तींनी भारताची बाजू योग्य ठरवली. कायद्याच्या बाबतीत हा भारताचा फार मोठा विजय आहे. वरिष्ठ अधिवक्ता आनंद जयस्वालपाकिस्तानचा खरा चेहरा उघडआंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा जगापुढे आला. पाकिस्तान नेहमीच मानवाधिकरांचे उल्लंघन करतो हे स्पष्ट झाले. जाधव यांच्या बाबतीत पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले होते. त्यांनी जाधव यांना भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याची संधीही दिली नव्हती. त्यामुळे जाधव यांना स्वत:चा बचाव करता आला नाही. आता जाधव यांना भारताकडून कायदेशीर सहकार्य मिळू शकेल.अ‍ॅड. फिरदोस मिर्झाव्हिएन्ना कराराचे उल्लंघन सिद्धजाधव यांच्या बाबतीत पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले होते हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयामुळे सिद्ध झाले. जाधव हे भारताचे हेर नसतानाही पाकिस्तानने त्यांना बळजबरीने ताब्यात घेतले. तसेच, त्यांच्याविरुद्ध खटला चालवून फाशीची शिक्षा सुनावली. पाकिस्तानने जाधव यांच्यावर केलेले सर्व आरोप निराधार आहेत. या प्रकरणात पाकिस्तान मानवाधिकार विसरून शत्रुत्वाच्या भावनेने वागला. अ‍ॅड. शशिभूषण वहाणेभारताचा मोठा विजय झालाआंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीवर स्थगिती दिल्यामुळे भारताने मोठी लढाई जिंकली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या १६ पैकी तब्बल १५ न्यायमूर्तींनी भारताच्या बाजूने निर्णय दिला. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याचे निरीक्षण निर्णयात नोंदविण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानने जाधव यांच्यावर अन्याय केल्याचे सर्व जगाला कळले आहे. यापुढे पाकिस्तानला सांभाळून वागावे लागेल.अ‍ॅड. राजेंद्र डागा

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवnagpurनागपूर