शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

कुलभूषण जाधव यांच्या फाशीवरील स्थगितीमुळे भारताचा मोठा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 21:40 IST

हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बुधवारी भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिल्यामुळे नागपूरमध्ये विधी क्षेत्रासह सर्वत्र आनंद साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देनागपूरच्या  विधी क्षेत्रात आनंद : आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बुधवारी भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिल्यामुळे नागपूरमध्ये विधी क्षेत्रासह सर्वत्र आनंद साजरा करण्यात आला. विधिज्ञांनी हा भारताचा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. एप्रिल-२०१७ मध्ये पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरी व दहशतवादाच्या गुन्ह्यासाठी जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताला दिलासा दिला.भारताचे दावे खरे ठरलेआंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताने मांडलेले कायदेविषयक मुद्दे खरे ठरले. जाधव यांना अटक करताना व त्यांच्याविरुद्ध खटला चालवताना पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले हे भारताने ठोस पुराव्यांसह सिद्ध करून दाखवले. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या १६ पैकी १५ न्यायमूर्तींनी भारताची बाजू योग्य ठरवली. कायद्याच्या बाबतीत हा भारताचा फार मोठा विजय आहे. वरिष्ठ अधिवक्ता आनंद जयस्वालपाकिस्तानचा खरा चेहरा उघडआंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा जगापुढे आला. पाकिस्तान नेहमीच मानवाधिकरांचे उल्लंघन करतो हे स्पष्ट झाले. जाधव यांच्या बाबतीत पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले होते. त्यांनी जाधव यांना भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याची संधीही दिली नव्हती. त्यामुळे जाधव यांना स्वत:चा बचाव करता आला नाही. आता जाधव यांना भारताकडून कायदेशीर सहकार्य मिळू शकेल.अ‍ॅड. फिरदोस मिर्झाव्हिएन्ना कराराचे उल्लंघन सिद्धजाधव यांच्या बाबतीत पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले होते हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयामुळे सिद्ध झाले. जाधव हे भारताचे हेर नसतानाही पाकिस्तानने त्यांना बळजबरीने ताब्यात घेतले. तसेच, त्यांच्याविरुद्ध खटला चालवून फाशीची शिक्षा सुनावली. पाकिस्तानने जाधव यांच्यावर केलेले सर्व आरोप निराधार आहेत. या प्रकरणात पाकिस्तान मानवाधिकार विसरून शत्रुत्वाच्या भावनेने वागला. अ‍ॅड. शशिभूषण वहाणेभारताचा मोठा विजय झालाआंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीवर स्थगिती दिल्यामुळे भारताने मोठी लढाई जिंकली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या १६ पैकी तब्बल १५ न्यायमूर्तींनी भारताच्या बाजूने निर्णय दिला. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याचे निरीक्षण निर्णयात नोंदविण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानने जाधव यांच्यावर अन्याय केल्याचे सर्व जगाला कळले आहे. यापुढे पाकिस्तानला सांभाळून वागावे लागेल.अ‍ॅड. राजेंद्र डागा

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवnagpurनागपूर