शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राखीपासून दिवाळीपर्यंत सण ठरणार भारतीय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 21:12 IST

ऑगस्टपासून नोव्हेंबर महिन्यात येणारे राखीपासून दिवाळीपर्यंतचे सण भारतीय संस्कृतीनुसार साजरे करण्यात येणार आहेत. यंदा केवळ भारतीय वस्तूंची विक्री करून चिनी उत्पादकांना झटका देण्याचा विक्रेत्यांचा संकल्प आहे. त्यामुळे विविध बाजारात भारतीय वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध राहणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑगस्टपासून नोव्हेंबर महिन्यात येणारे राखीपासूनदिवाळीपर्यंतचे सण भारतीय संस्कृतीनुसार साजरे करण्यात येणार आहेत. यंदा केवळ भारतीय वस्तूंची विक्री करून चिनी उत्पादकांना झटका देण्याचा विक्रेत्यांचा संकल्प आहे. त्यामुळे विविध बाजारात भारतीय वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध राहणार आहेत.गेल्यावर्षी तीन महिन्यांच्या या सणांमध्ये २० हजार कोटी रुपयांच्या वस्तू देशात आयात झाल्या होत्या. व्यापाऱ्यांच्या संकल्पामुळे आता हा व्यवसाय भारतीयांना मिळणार आहे.देशातील रिटेल व्यापाऱ्यांची आघाडीची संघटना कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स (कॅट) सध्या देशात चिनी वस्तूंच्या बहिष्काराची राष्ट्रीय मोहीम राबवीत आहे. ३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या राखी सणापासून ते २५ नोव्हेंबरला होणाऱ्या तुळशी विवाहापर्यंतच्या सर्व सणांमध्ये लागणाऱ्या वस्तू भारतीय बनावटीच्या असाव्यात, असे आवाहन सर्व व्यापारी संघटनांना केले आहे. सणांच्या तीन महिन्यात राखी, जन्माष्टमी, गणेशोत्सव, नवरात्र, दुर्गापूजा, धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज, तुळशी विवाह आदी सण येणार आहेत. प्रत्येक सणात भारतीय वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी कॅटने एक व्यापक योजना तयार केली असून, सर्व वस्तूंची यादी तयार करीत आहे. ती ११ जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे.कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया म्हणाले, सणांशी संबंधित भारतीय वस्तू तयार करणारे निर्माता, कारागीर, लघु उद्योग, कुंभार, महिला उद्योजिका, स्वयंउद्योजक, स्टार्टअप आदींशी संपर्क साधून त्यांना किती प्रमाणात वस्तू तयार करायच्या आहेत, याची माहिती गोळा करण्याचा सल्ला कॅटची राज्यस्तरीय चमू आणि अन्य प्रमुख व्यापारी संघटनांना दिला आहे. दुसरीकडे त्यांच्या राज्यात उपरोक्त वस्तूंची किती विक्री आहे, याचीही माहिती एकत्र करण्यास म्हटले आहे. ही माहिती १५ जुलैपर्यंत तयार होणार आहे.एकत्रित केलेला डेटा कॅटच्या दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयात गोळा होईल आणि दोन्ही डेटाच्या आधारावर कोणत्या राज्यात किती वस्तू तयार होत आहेत आणि त्यांची राज्यात किती विक्री आहे, हे वगळता उर्वरित वस्तू कोणत्या राज्यात पाठविल्या पाहिजेत, याची विस्तृत माहिती गोळा होईल. त्यामुळे देशात मागणी आणि पुरवठ्याचा ताळमेळ साधला जाईल, तसेच देशात भारतीय वस्तूचा तुटवडा जाणवणार नाही. या वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देशातील वाहतूकदारांची आघाडीची संघटना ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशन किफायत दरात करणार आहे.भरतीया म्हणाले, भारतीय सणांच्या मोहिमेत कॅटच्या संबंधित राज्यातील महिला चमूची विशेष भूमिका राहणार असून, उद्योजिका आणि महिला गृह उद्योगांना प्रोत्साहन देणार आहे. राखी व राखी धागा, मिठाई, नमकीन महिला तयार करतील आणि त्याच्या विक्रीची व्यवस्था कॅट करणार आहे. सणांमध्ये लहान-मोठ्या उद्योगातून २० हजार कोटींचा व्यवसाय होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Indian Festivalsभारतीय सणRakhiराखीDiwaliदिवाळी