शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

भारतीय किसान संघ ‘भावांतर’साठी आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 11:34 IST

एकीकडे शेतकरी समस्यांच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातीलच संघटना असलेल्या भारतीय किसान संघानेदेखील आपल्या मागण्या समोर केल्या आहेत.

ठळक मुद्देमध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यातदेखील योजना लागू करण्याची मागणीजनसमर्थन मोहीम राबविणार

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे शेतकरी समस्यांच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातीलच संघटना असलेल्या भारतीय किसान संघानेदेखील आपल्या मागण्या समोर केल्या आहेत. मध्य प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातदेखील शेतकऱ्यांसाठी ‘भावांतर’ योजना सुरू करावी, ही किसान संघाची प्रमुख मागणी असून राजस्थानप्रमाणे राज्यातदेखील यासाठी जनसमर्थन मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.शेतकऱ्यांना आर्थिक चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी किमान आधारभूत किंमत निश्चित झाली पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्पष्ट केली आहे. सरसंघचालकांनी विजयादशमीच्या भाषणात याचा स्पष्टपणे उल्लेखदेखील केला होता. मध्य प्रदेश शासनाने शेतकऱ्यांसाठी ‘भावांतर’ योजना सुरू केली होती. यामुळे किमान आधारभूत किमतीहून कमी भावात माल विकावा लागला तरी शासनाकडून हमी भावाची रक्कम मिळण्याची शाश्वती होती. महाराष्ट्रातदेखील ही योजना लागू करावी, असा किसान संघाचा आग्रह आहे. यासाठी शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर राज्यभरात जनसमर्थन व शेतकरी जनजागृती मोहीम सुरू करण्यात येणार आहे.राजस्थानमध्ये ‘भावांतर’साठीच किसान संघाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात गावपातळीवर ही मोहीम राबविण्याची तयारी सुरू आहे. ग्रामसमितीमध्ये हा विषय मांडण्यात येणार असून जास्तीत जास्त जनसमर्थन मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.रस्त्यावर उतरणे हा उपाय नाहीयासंदर्भात भारतीय किसान संघाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष नाना आखरे यांना संपर्क केला असता ‘भावांतर’ योजना राज्यात लागू करण्याची मागणी आम्ही लावून धरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इतर शेतकरी संघटनांप्रमाणे आम्ही रस्त्यांवर उतरणार नाही. मात्र गावपातळीवर पोहोचून जनसमर्थन नक्कीच मिळवू. शेतकऱ्यांना अनेक पिकांची विक्री हमी भावापेक्षा कमी किमतीत करावी लागत आहे. त्यांचा नफा व्हावा यासाठी कापूस, धान, तूर, हरबरा, गहू यासारख्या प्रमुख पिकांना सरकारने ‘भावांतर’ योजना लागू करावी. यासाठी आम्ही गावागावांमध्ये जागृती करु व राज्यभरात व्यापक मोहीम राबवू, असेदेखील त्यांनी सांगितले.

निर्यात शुल्कात कपातीची मागणीभारतीय किसान संघातर्फे राज्य सरकारला पत्रच लिहिण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांच्या शासनकाळात सिंचन क्षेत्रात अपेक्षित वाढ झाली नसून अनुशेष पूर्ण झालेला नाही. पांदण रस्त्यांबाबत प्रशासनाची अद्यापही उदासीनताच आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. कृषी मालाची निर्यात वाढविण्यासाठी राज्य शासनाने केंद्रावर दबाव निर्माण करावा तसेच निर्यात शुल्कात कपात करावी, अशी अपेक्षादेखील व्यक्त किसान संघाने व्यक्त केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी