शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

भारतीय किसान संघ ‘भावांतर’साठी आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 11:34 IST

एकीकडे शेतकरी समस्यांच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातीलच संघटना असलेल्या भारतीय किसान संघानेदेखील आपल्या मागण्या समोर केल्या आहेत.

ठळक मुद्देमध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यातदेखील योजना लागू करण्याची मागणीजनसमर्थन मोहीम राबविणार

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे शेतकरी समस्यांच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातीलच संघटना असलेल्या भारतीय किसान संघानेदेखील आपल्या मागण्या समोर केल्या आहेत. मध्य प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातदेखील शेतकऱ्यांसाठी ‘भावांतर’ योजना सुरू करावी, ही किसान संघाची प्रमुख मागणी असून राजस्थानप्रमाणे राज्यातदेखील यासाठी जनसमर्थन मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.शेतकऱ्यांना आर्थिक चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी किमान आधारभूत किंमत निश्चित झाली पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्पष्ट केली आहे. सरसंघचालकांनी विजयादशमीच्या भाषणात याचा स्पष्टपणे उल्लेखदेखील केला होता. मध्य प्रदेश शासनाने शेतकऱ्यांसाठी ‘भावांतर’ योजना सुरू केली होती. यामुळे किमान आधारभूत किमतीहून कमी भावात माल विकावा लागला तरी शासनाकडून हमी भावाची रक्कम मिळण्याची शाश्वती होती. महाराष्ट्रातदेखील ही योजना लागू करावी, असा किसान संघाचा आग्रह आहे. यासाठी शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर राज्यभरात जनसमर्थन व शेतकरी जनजागृती मोहीम सुरू करण्यात येणार आहे.राजस्थानमध्ये ‘भावांतर’साठीच किसान संघाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात गावपातळीवर ही मोहीम राबविण्याची तयारी सुरू आहे. ग्रामसमितीमध्ये हा विषय मांडण्यात येणार असून जास्तीत जास्त जनसमर्थन मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.रस्त्यावर उतरणे हा उपाय नाहीयासंदर्भात भारतीय किसान संघाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष नाना आखरे यांना संपर्क केला असता ‘भावांतर’ योजना राज्यात लागू करण्याची मागणी आम्ही लावून धरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इतर शेतकरी संघटनांप्रमाणे आम्ही रस्त्यांवर उतरणार नाही. मात्र गावपातळीवर पोहोचून जनसमर्थन नक्कीच मिळवू. शेतकऱ्यांना अनेक पिकांची विक्री हमी भावापेक्षा कमी किमतीत करावी लागत आहे. त्यांचा नफा व्हावा यासाठी कापूस, धान, तूर, हरबरा, गहू यासारख्या प्रमुख पिकांना सरकारने ‘भावांतर’ योजना लागू करावी. यासाठी आम्ही गावागावांमध्ये जागृती करु व राज्यभरात व्यापक मोहीम राबवू, असेदेखील त्यांनी सांगितले.

निर्यात शुल्कात कपातीची मागणीभारतीय किसान संघातर्फे राज्य सरकारला पत्रच लिहिण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांच्या शासनकाळात सिंचन क्षेत्रात अपेक्षित वाढ झाली नसून अनुशेष पूर्ण झालेला नाही. पांदण रस्त्यांबाबत प्रशासनाची अद्यापही उदासीनताच आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. कृषी मालाची निर्यात वाढविण्यासाठी राज्य शासनाने केंद्रावर दबाव निर्माण करावा तसेच निर्यात शुल्कात कपात करावी, अशी अपेक्षादेखील व्यक्त किसान संघाने व्यक्त केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी