शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अध्यात्माच्या ताकदीवरच भारत पुन्हा विश्वगुरू होणार; सय्यद सलमान चिश्ती अजमेर शरीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2021 06:30 IST

Nagpur News देशाला पुन्हा एकदा आपल्या अध्यात्माची ताकद निर्माण करावी लागेल. या अध्यात्माच्या ताकदीवरच भारत देश पुन्हा एकदा विश्वगुरू होईल, जगाचे मार्गदर्शन करेल, असा विश्वास अजमेर शरीफ दर्गाचे गद्दीनशीन हाजी सय्यद सलमान चिश्ती यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.

नागपूर : भारत हा विश्वगुरू होता, तो केवळ आपल्या अध्यात्माच्या ताकदीवरच. आजच्या काळात खऱ्या अर्थाने अध्यात्माची गरज आहे. त्यामुळे देशाला पुन्हा एकदा आपल्या अध्यात्माची ताकद निर्माण करावी लागेल. या अध्यात्माच्या ताकदीवरच भारत देश पुन्हा एकदा विश्वगुरू होईल, जगाचे मार्गदर्शन करेल, असा विश्वास अजमेर शरीफ दर्गाचे गद्दीनशीन हाजी सय्यद सलमान चिश्ती यांनी शनिवारी येथे व्यक्त केला. (India will become a world leader again only on the strength of spirituality; Syed Salman Chishti Ajmer Sharif)

लोकमततर्फे आयोजित राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेसाठी ते नागपुरात आले असता लोकमतशी चर्चा करीत होते. हाजी सय्यद सलमान चिश्ती यांचे कुटुंबीय गेल्या ८०० वर्षांपासून अजमेर शरीफ दर्गाची सेवा करीत आहेत. सध्या सेवा करणारी त्यांची पिढी ही २६ वी आहे. गेल्या ८०० वर्षांपासून अजमेर शरीफ येथे दररोज हजारो लोकांना लंगर सेवा पुरवली जाते. यात सर्वधर्मीयांचा समावेश असल्याने शुद्ध शाकाहारी जेवण तयार केले जाते. कोविडकाळातही लोकांची मोठ्या प्रमाणावर सेवा करण्यात आली. यासोबतच आरोग्य व शिक्षणाच्या क्षेत्रातही काम केले जाते.

यावेळी हाजी सय्यद सलमान चिश्ती म्हणाले, आजवर मी अनेक धार्मिक परिषदा पाहिल्या. त्यात सहभागीसुद्धा झालो. परंतु, देशातील एक प्रमुख मीडिया हाउस असलेल्या लोकमतने आयोजित केलेली ही आंतरधर्मीय परिषद अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण, आज अशा परिषदांची खऱ्या अर्थाने गरज आहे. तेव्हा इतर मीडिया हाउसेसनेही यातून शिकण्याची गरज आहे.

टॅग्स :National Inter-Religious Conferenceराष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदLokmat Eventलोकमत इव्हेंट