शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ सायकलवर निघालाय भारत भ्रमणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 10:51 IST

हरियाणा येथील चंद्रप्रकाश यादव हा २२ वर्षीय तरुण एका ध्येयाने प्रेरित होऊन सायकलवर भारत भ्रमणाला निघाला आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत ६००० किमीचा केला प्रवास देशाचे ऐक्य, बंधूभावाचा संदेश

सैयद मोबीन।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणाव्या तशा प्रत्येकाला एखाद्या गोष्टीचे पॅशन असते. मग असे ध्येयवेडे लोक येणाऱ्या कुठल्याही अडचणींची पर्वा न करता आपल्या मनातील ध्येयपूर्ती करण्याच्या प्रयत्नाला लागतात. हरियाणा येथील चंद्रप्रकाश यादव हा २२ वर्षीय तरुण एका ध्येयाने प्रेरित होऊन सायकलवर भारत भ्रमणाला निघाला आहे. देशात एकता, शांतता व बंधुभाव नांदावा, हा संदेश घेऊन हा तरुण सायकलवर हरियाणा ते कन्याकुमारी ते दिल्ली या प्रवासाला निघाला आहे.हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील निगानी यवास या गावचा चंद्रप्रकाश जयपाल यादव हा तरुण १ फेब्रुवारीला आपल्या गावावरून निघाला. हरियाणा-कन्याकुमारी ते दिल्ली हे एकूण अंतर ७००० किलोमीटर आहे. आता हा तरुण परतीच्या प्रवासाला लागला असून यादरम्यान नागपूरला आलेल्या चंद्रप्रकाशने लोकमतशी संवाद साधला. हरियाणापासून सुरू झालेल्या या प्रवासात चंद्रप्रकाशने राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा ही राज्ये पादाक्रांत केली व गुरुवारी नागपूर गाठले. यामध्ये त्याने ६००० किलोमीटरचे अंतर पूर्ण केले आहे. यानंतर येत्या १५ दिवसात मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश होत दिल्लीला हे अभियान संपविणार आहे. या संपूर्ण यात्रेदरम्यान विविध राज्यातील नागरिकांकडून प्रचंड सहकार्य मिळाल्याचे त्याने सांगितले. ही सायकल यात्रा पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना समर्पित असल्याची भावना त्याने व्यक्त केली. देशात एकता, शांतता व बंधुभाव नांदावा, मुलींना वाचवा-मुलींना शिकवा हा संदेशही प्रवासात देत असल्याचे त्याने सांगितले.दररोज १०० किमी प्रवासचंद्रप्रकाश यांनी सांगितले, दररोज ८० ते १०० किमीचे अंतर कापण्याचे निश्चित केले आहे. सकाळी ६ वाजता प्रवास सुरू करून १२ वाजतापर्यंत चालायचे. त्यानंतर कुठेतरी थांबून काही तास आराम करायचा आणि पुन्हा प्रवास सुरू करायचा. रात्री आराम करून सकाळी पुन्हा नव्या उत्साहाने पुढच्या प्रवासाला लागायचे, असा हा नित्यक्रम. आतापर्यंत ६००० किमीचे अंतर पूर्ण केले असून उरलेल्या १००० किमीचा प्रवास येत्या १५ दिवसात पूर्ण करणार आहेत.आईला यात्रेबाबत फोनवर सांगितलेचंद्रप्रकाश शेतकऱ्याचा मुलगा असून बी.एस्सी. द्वितीय वर्षाचा अभ्यास करीत आहे. भारत यात्रेला निघाला तेव्हा आईला सांगण्याची हिंमत नव्हती. आई काळजीपोटी मनाई करेल, अशी भीती होती. त्यामुळे कुणाला न सांगता घरून निघालो व २०० किमीचा प्रवास करून राजस्थानला पोहचल्यानंतर आईला फोन करून प्रवासाबाबत कळविल्याचे चंद्रप्रकाशने सांगितले. हे एकताच आई रडायला लागली व परत येण्याचा आग्रह केला. मात्र आपण निर्धार केला होता. त्यामुळे परत फिरण्यापेक्षा पुढच्या प्रवासाला लागल्याचे त्याने स्पष्ट केले.

टॅग्स :Socialसामाजिक