शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

देशाने शस्त्रसंपन्न झालेच पाहिजे : मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 22:32 IST

आजच्या काळात जगाला शक्तीची भाषा कळते. जर आपण सशक्त असू तर अहिंसेचे तत्त्व जगासमोर मांडू शकू. त्यामुळेच आपण शस्त्रसंपन्न झालेच पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फे आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यादरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देविजय भटकर यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्काराने सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजच्या काळात जगाला शक्तीची भाषा कळते. जर आपण सशक्त असू तर अहिंसेचे तत्त्व जगासमोर मांडू शकू. त्यामुळेच आपण शस्त्रसंपन्न झालेच पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फे आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यादरम्यान ते बोलत होते.शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमादरम्यान जगविख्यात संगणकतज्ज्ञ डॉ.विजय भटकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीचे कार्याध्यक्ष शिरीष दामले, महासचिव डॉ.अजय कुळकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर नेहमी म्हणायचे की हिंदू व भारतीय समाज शक्तिसंपन्न झाला पाहिजे. मात्र त्यांची भावना कळायला स्वातंत्र्यानंतर कितीतरी वर्षे लागली आहेत. जर सावरकरांचे बोलणे त्यावेळी गंभीरतेने घेतले गेले असले तर आज इतिहास बराच वेगळा राहिला असता. देश शक्तिसंपन्न झाला तर शत्रू वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. आपली शक्तीची साधना ही कुणाला घाबरविण्यासाठी नव्हे तर जगाचे कल्याण करणारी असावी. मात्र दुष्टांना धाक निर्माण करणारी हवी, असे प्रतिपादन डॉ. मोहन भागवत यांनी केले. सावरकर यांनी देशाला आपले आयुष्य अर्पण केले होते. मात्र त्यांच्या वाट्याला नेहमी तिरस्कार व अपमानच आला. सावरकर यांचे बोलणे तेव्हादेखील खरे होते व आजदेखील त्यात तितकीच सत्यता आहे. हळूहळू त्यांच्या विचारांकडे देश जातो आहे ही चांगली बाब आहे, असेदेखील ते म्हणाले. गुणवंत घटवाई यांनी यावेळी गीताचे सादरीकरण केले. डॉ. कुळकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विवेक अलोणी यांनी संचालन केले तर मिलिंद कानडे यांनी आभार मानले.हिंदू धर्म कर्मकांडात बांधलेला नाहीसावरकर हे विज्ञाननिष्ठ हिंदू होते. हिंदू धर्मात मधल्या काळात काही अनिष्ट चालिरीती आल्या. परंतु हिंदू धर्म हा कुठल्याही कर्मकांडात बांधल्या गेलेला नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. भाषा, प्रांत, जात इत्यादी वाद सोडले पाहिजेत व सर्वांनी एकत्रित आले पाहिजे, असे मत डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले.वेद, प्राचीन ग्रंथांत विज्ञानाचे ज्ञानयावेळी डॉ.विजय भटकर यांनी वेद, पुराण, भागवतांमधील ज्ञानावर भाष्य केले. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये अतिशय सखोल ज्ञान दडले आहे. भारतीय संस्कृती व विचार हे विज्ञानाधिष्ठितच आहेत. मात्र वैज्ञानिकांनी हवा तसा संस्कृती व ग्रंथांचा अभ्यासच केला नाही. वेदांमध्ये एखादी गोष्ट सांगितली आहे असे म्हटले की कुठलाही अभ्यास न करता त्याला नाकारणे व टीका करण्याची सुरुवात होते. अलिकडे तर हे प्रमाण वाढले आहे. मात्र वैज्ञानिकांनी सर्व शक्यता पडताळल्या पाहिजेत व अभ्यास करुनच बोलले पाहिजे. पाश्चात्त्यांना आपल्या प्राचीन ग्रंथातील ज्ञान पटले आहे, मात्र आपण विरोधच करतो ही दुर्दैवी बाब असल्याचे स्पष्ट मत डॉ.भटकर यांनी व्यक्त केले. गणितात तर भारताने मौलिक योगदान दिले आहे. संस्कृत भाषा तर संगणकाचा ‘प्रोग्राम’ लिहिण्यासाठी अतिशय योग्य आहे. खऱ्या अर्थाने भारत संगणकाचा आद्यप्रवर्तक आहे, असेदेखील ते म्हणाले.

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूर