शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
2
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
3
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
4
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
5
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
6
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
7
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
8
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
9
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
10
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
11
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
12
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
13
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
14
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
15
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
16
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
17
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
18
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
19
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
20
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत

भारतात केवळ ४००० वाघांचाच निर्वाह शक्य, मर्यादा संपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 15:10 IST

एनटीसीएचे माजी सदस्य सचिव राजेश गोपाळ यांचा अभ्यास : मानव-वन्यजीव संघर्ष वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात मागील दशकभरात वाघांची संख्या दुपटीने वाढली ही अभिमानाची व समाधानाचीही बाब आहे. मात्र, या वाढीला मर्यादा घालणे आता गरजेचे झाले आहे. व्याघ्रप्रेमी एनजीओंच्या मते ही गोष्ट नकारात्मक वाटत असली तरी देशातील वनक्षेत्राची मर्यादा लक्षात घेता भारतात केवळ ४००० वाघांचाच निर्वाह आता शक्य असल्याचे एक निरीक्षण आहे. वाघांची संख्या पाहता, ही मर्यादादेखील आता संपली आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (एनटीसीए) चे माजी सदस्य सचिव डॉ. राजेश गोपाळ यांनी 'सामाजिक वहनक्षमता व वाघ व्यवस्थापन' या संकल्पनेवर केलेल्या निरीक्षणातून हे वास्तव मांडले आहे. डॉ. गोपाळ यांच्या अभ्यासानुसार भारतात संरक्षित क्षेत्रे केवळ २ ते २.४ टक्के आहेत आणि यात जास्तीत जास्त ५ टक्के क्षेत्रापर्यंतच विस्तार होण्याची शक्यता आहे. या मर्यादित अधिवासात सर्वोत्तम परिस्थितीत जास्तीत जास्त ४,००० वाघांचा निर्वाह शक्य आहे. काही संघटना, संस्था या वाघांची संख्या १०,००० पर्यंत नेण्याची चर्चा करतात, पण डॉ. गोपाळ यांच्या मते, हे 'जमिनीवरच्या वास्तवापेक्षा फारच वेगळं' ठरेल. 

काय आहे 'सामाजिक वहनक्षमता'?पर्यावरणीय दृष्टिकोनातून वहनक्षमता म्हणजे एखाद्या परिसंस्थेत किती वाघ राहू शकतात, हे ठरवणारे प्रमुख घटक म्हणजे अन्नसाखळी, नैसर्गिक अधिवास, पाण्याची उपलब्धता आदी; परंतु सामाजिक वहनक्षमता ही संकल्पना मानवी सहनशीलतेशी निगडित आहे. एखाद्या भागातील स्थानिक लोक संघर्ष न होता किती प्रमाणात वाघांचे अस्तित्व स्वीकारू शकतात? वाघांची संख्या जर अति झाली, तर ती लोकांना त्रासदायक वाटू लागते आणि संघर्षाची शक्यता वाढते. डॉ. गोपाळ यांच्या मते, जर आपण सामाजिक मर्यादेच्या पलीकडे वाघांची संख्या वाढवली, तर ते 'उत्पात करणारे प्राणी' म्हणून ओळखले जातील. सामाजिक वहनक्षमता लक्षात न घेतल्यास, ही यशोगाथा भविष्यात संघर्षकथांमध्ये रूपांतरित होऊ शकते.

जर सामाजिक मर्यादा ओलांडली, तर काय होईल?

  • मानव-वाघ संघर्ष वाढतो.
  • माणसांच्या दृष्टिकोनातून वाघ अडथळा ठरतो मग गावांमध्ये वाघ शिरले तर प्रतिकार सुरू होते.
  • प्रशासनाची अडचण वाढते. वाघ मारले जाऊ शकत नाहीत, त्यांचे स्थलांतरही करता येत नाही.
  • अनेक व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या २०१४ च्या तुलनेत अनेक पटीने पुढे गेली. त्यामुळे अधिवास ताब्यात ठेवण्यासाठी वाघांचे अंतर्गत संघर्ष वाढले.

महत्त्वाचे बिंदू देशात वाघांची संख्या - ३९८२

  • २०१४ ते २०२४ दरम्यान वाघांच्या हल्ल्यात ६६४ मानवी मृत्यू.
  • २०१४ ते २०२३ पर्यंत एकट्या महाराष्ट्रात ७०२१ पशुधनाचा मृत्यू
  • २०२२ साली मानवी मृत्यू ११० वर. त्यात महाराष्ट्रातील ७६ मानवी मृत्यू.
  • वाघांचे अस्तित्व सर्वाधिक महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक व उत्तराखंड राज्यात एकवटले आहे.
  • देशात ५८ व्याघ्र संवर्धन प्रकल्प आहेत. त्यातील काही प्रकल्पात वाघांची संख्या नगण्य आहे.

"देशात वाघांची संख्या झपाट्याने वाढत असून, महाराष्ट्रात विदर्भात ती मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. मोजक्या राज्यात भरपूर व इतर राज्यात वाघच नाहीत. त्यामुळे वाघ मानव संघर्षसुद्धा शिगेला पोहोचला आहे. वाघांची संख्या वाढली ही आनंदाची बाब असली तरी वाढता संघर्ष आणि मानव मृत्यू ही चिंतेची बाब झाली आहे."- प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी 

टॅग्स :Tigerवाघnagpurनागपूर