शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

भारतात केवळ ४००० वाघांचाच निर्वाह शक्य, मर्यादा संपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 15:10 IST

एनटीसीएचे माजी सदस्य सचिव राजेश गोपाळ यांचा अभ्यास : मानव-वन्यजीव संघर्ष वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात मागील दशकभरात वाघांची संख्या दुपटीने वाढली ही अभिमानाची व समाधानाचीही बाब आहे. मात्र, या वाढीला मर्यादा घालणे आता गरजेचे झाले आहे. व्याघ्रप्रेमी एनजीओंच्या मते ही गोष्ट नकारात्मक वाटत असली तरी देशातील वनक्षेत्राची मर्यादा लक्षात घेता भारतात केवळ ४००० वाघांचाच निर्वाह आता शक्य असल्याचे एक निरीक्षण आहे. वाघांची संख्या पाहता, ही मर्यादादेखील आता संपली आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (एनटीसीए) चे माजी सदस्य सचिव डॉ. राजेश गोपाळ यांनी 'सामाजिक वहनक्षमता व वाघ व्यवस्थापन' या संकल्पनेवर केलेल्या निरीक्षणातून हे वास्तव मांडले आहे. डॉ. गोपाळ यांच्या अभ्यासानुसार भारतात संरक्षित क्षेत्रे केवळ २ ते २.४ टक्के आहेत आणि यात जास्तीत जास्त ५ टक्के क्षेत्रापर्यंतच विस्तार होण्याची शक्यता आहे. या मर्यादित अधिवासात सर्वोत्तम परिस्थितीत जास्तीत जास्त ४,००० वाघांचा निर्वाह शक्य आहे. काही संघटना, संस्था या वाघांची संख्या १०,००० पर्यंत नेण्याची चर्चा करतात, पण डॉ. गोपाळ यांच्या मते, हे 'जमिनीवरच्या वास्तवापेक्षा फारच वेगळं' ठरेल. 

काय आहे 'सामाजिक वहनक्षमता'?पर्यावरणीय दृष्टिकोनातून वहनक्षमता म्हणजे एखाद्या परिसंस्थेत किती वाघ राहू शकतात, हे ठरवणारे प्रमुख घटक म्हणजे अन्नसाखळी, नैसर्गिक अधिवास, पाण्याची उपलब्धता आदी; परंतु सामाजिक वहनक्षमता ही संकल्पना मानवी सहनशीलतेशी निगडित आहे. एखाद्या भागातील स्थानिक लोक संघर्ष न होता किती प्रमाणात वाघांचे अस्तित्व स्वीकारू शकतात? वाघांची संख्या जर अति झाली, तर ती लोकांना त्रासदायक वाटू लागते आणि संघर्षाची शक्यता वाढते. डॉ. गोपाळ यांच्या मते, जर आपण सामाजिक मर्यादेच्या पलीकडे वाघांची संख्या वाढवली, तर ते 'उत्पात करणारे प्राणी' म्हणून ओळखले जातील. सामाजिक वहनक्षमता लक्षात न घेतल्यास, ही यशोगाथा भविष्यात संघर्षकथांमध्ये रूपांतरित होऊ शकते.

जर सामाजिक मर्यादा ओलांडली, तर काय होईल?

  • मानव-वाघ संघर्ष वाढतो.
  • माणसांच्या दृष्टिकोनातून वाघ अडथळा ठरतो मग गावांमध्ये वाघ शिरले तर प्रतिकार सुरू होते.
  • प्रशासनाची अडचण वाढते. वाघ मारले जाऊ शकत नाहीत, त्यांचे स्थलांतरही करता येत नाही.
  • अनेक व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या २०१४ च्या तुलनेत अनेक पटीने पुढे गेली. त्यामुळे अधिवास ताब्यात ठेवण्यासाठी वाघांचे अंतर्गत संघर्ष वाढले.

महत्त्वाचे बिंदू देशात वाघांची संख्या - ३९८२

  • २०१४ ते २०२४ दरम्यान वाघांच्या हल्ल्यात ६६४ मानवी मृत्यू.
  • २०१४ ते २०२३ पर्यंत एकट्या महाराष्ट्रात ७०२१ पशुधनाचा मृत्यू
  • २०२२ साली मानवी मृत्यू ११० वर. त्यात महाराष्ट्रातील ७६ मानवी मृत्यू.
  • वाघांचे अस्तित्व सर्वाधिक महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक व उत्तराखंड राज्यात एकवटले आहे.
  • देशात ५८ व्याघ्र संवर्धन प्रकल्प आहेत. त्यातील काही प्रकल्पात वाघांची संख्या नगण्य आहे.

"देशात वाघांची संख्या झपाट्याने वाढत असून, महाराष्ट्रात विदर्भात ती मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. मोजक्या राज्यात भरपूर व इतर राज्यात वाघच नाहीत. त्यामुळे वाघ मानव संघर्षसुद्धा शिगेला पोहोचला आहे. वाघांची संख्या वाढली ही आनंदाची बाब असली तरी वाढता संघर्ष आणि मानव मृत्यू ही चिंतेची बाब झाली आहे."- प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी 

टॅग्स :Tigerवाघnagpurनागपूर