शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

भारतात केवळ ४००० वाघांचाच निर्वाह शक्य, मर्यादा संपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 15:10 IST

एनटीसीएचे माजी सदस्य सचिव राजेश गोपाळ यांचा अभ्यास : मानव-वन्यजीव संघर्ष वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात मागील दशकभरात वाघांची संख्या दुपटीने वाढली ही अभिमानाची व समाधानाचीही बाब आहे. मात्र, या वाढीला मर्यादा घालणे आता गरजेचे झाले आहे. व्याघ्रप्रेमी एनजीओंच्या मते ही गोष्ट नकारात्मक वाटत असली तरी देशातील वनक्षेत्राची मर्यादा लक्षात घेता भारतात केवळ ४००० वाघांचाच निर्वाह आता शक्य असल्याचे एक निरीक्षण आहे. वाघांची संख्या पाहता, ही मर्यादादेखील आता संपली आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (एनटीसीए) चे माजी सदस्य सचिव डॉ. राजेश गोपाळ यांनी 'सामाजिक वहनक्षमता व वाघ व्यवस्थापन' या संकल्पनेवर केलेल्या निरीक्षणातून हे वास्तव मांडले आहे. डॉ. गोपाळ यांच्या अभ्यासानुसार भारतात संरक्षित क्षेत्रे केवळ २ ते २.४ टक्के आहेत आणि यात जास्तीत जास्त ५ टक्के क्षेत्रापर्यंतच विस्तार होण्याची शक्यता आहे. या मर्यादित अधिवासात सर्वोत्तम परिस्थितीत जास्तीत जास्त ४,००० वाघांचा निर्वाह शक्य आहे. काही संघटना, संस्था या वाघांची संख्या १०,००० पर्यंत नेण्याची चर्चा करतात, पण डॉ. गोपाळ यांच्या मते, हे 'जमिनीवरच्या वास्तवापेक्षा फारच वेगळं' ठरेल. 

काय आहे 'सामाजिक वहनक्षमता'?पर्यावरणीय दृष्टिकोनातून वहनक्षमता म्हणजे एखाद्या परिसंस्थेत किती वाघ राहू शकतात, हे ठरवणारे प्रमुख घटक म्हणजे अन्नसाखळी, नैसर्गिक अधिवास, पाण्याची उपलब्धता आदी; परंतु सामाजिक वहनक्षमता ही संकल्पना मानवी सहनशीलतेशी निगडित आहे. एखाद्या भागातील स्थानिक लोक संघर्ष न होता किती प्रमाणात वाघांचे अस्तित्व स्वीकारू शकतात? वाघांची संख्या जर अति झाली, तर ती लोकांना त्रासदायक वाटू लागते आणि संघर्षाची शक्यता वाढते. डॉ. गोपाळ यांच्या मते, जर आपण सामाजिक मर्यादेच्या पलीकडे वाघांची संख्या वाढवली, तर ते 'उत्पात करणारे प्राणी' म्हणून ओळखले जातील. सामाजिक वहनक्षमता लक्षात न घेतल्यास, ही यशोगाथा भविष्यात संघर्षकथांमध्ये रूपांतरित होऊ शकते.

जर सामाजिक मर्यादा ओलांडली, तर काय होईल?

  • मानव-वाघ संघर्ष वाढतो.
  • माणसांच्या दृष्टिकोनातून वाघ अडथळा ठरतो मग गावांमध्ये वाघ शिरले तर प्रतिकार सुरू होते.
  • प्रशासनाची अडचण वाढते. वाघ मारले जाऊ शकत नाहीत, त्यांचे स्थलांतरही करता येत नाही.
  • अनेक व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या २०१४ च्या तुलनेत अनेक पटीने पुढे गेली. त्यामुळे अधिवास ताब्यात ठेवण्यासाठी वाघांचे अंतर्गत संघर्ष वाढले.

महत्त्वाचे बिंदू देशात वाघांची संख्या - ३९८२

  • २०१४ ते २०२४ दरम्यान वाघांच्या हल्ल्यात ६६४ मानवी मृत्यू.
  • २०१४ ते २०२३ पर्यंत एकट्या महाराष्ट्रात ७०२१ पशुधनाचा मृत्यू
  • २०२२ साली मानवी मृत्यू ११० वर. त्यात महाराष्ट्रातील ७६ मानवी मृत्यू.
  • वाघांचे अस्तित्व सर्वाधिक महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक व उत्तराखंड राज्यात एकवटले आहे.
  • देशात ५८ व्याघ्र संवर्धन प्रकल्प आहेत. त्यातील काही प्रकल्पात वाघांची संख्या नगण्य आहे.

"देशात वाघांची संख्या झपाट्याने वाढत असून, महाराष्ट्रात विदर्भात ती मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. मोजक्या राज्यात भरपूर व इतर राज्यात वाघच नाहीत. त्यामुळे वाघ मानव संघर्षसुद्धा शिगेला पोहोचला आहे. वाघांची संख्या वाढली ही आनंदाची बाब असली तरी वाढता संघर्ष आणि मानव मृत्यू ही चिंतेची बाब झाली आहे."- प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी 

टॅग्स :Tigerवाघnagpurनागपूर