शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

जातीअंताशिवाय भारत विकसित होऊ शकत नाही :राहुल वानखेडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 12:15 AM

आजही जातीयता जोपासली जात आहे. जोपर्यंत जातीयता आहे, तोपर्यंत भारत विकसित होऊच शकत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राहुल वानखेडे यांनी केले.

ठळक मुद्दे ‘भारतातील कामगारांचे भवितव्य’ यावर मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजही जातीयता जोपासली जात आहे. जोपर्यंत जातीयता आहे, तोपर्यंत भारत विकसित होऊच शकत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राहुल वानखेडे यांनी केले.महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि कामगार दिनानिमित्त कास्ट्राईब संघटनेतर्फे उद्योग भवन सिव्हील लाईन्स येथे आयोजित ‘भारतातील कामगारांचे भवितव्य’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनचे अध्यक्ष अरुण गाडे होते. तर वन कामगार संघटनेचे अध्यक्ष अजय पाटील, वनामतचे माजी अतिरिक्त संचालक राजरत्न कुंभारे, आत्माचे उपसंचालक रविकांत गौतमी, डॉ. प्रदीप आगलावे, भय्यासाहेब शेलारे, गजानन थुल प्रमुख पाहुणे होते.अरुण गाडे यांनी अध्यक्षीय भाषणात जातीवाद आणि भांडवलशाहीमुळे देश संक्रमणातून जात असल्याचे सांगितले. उच्चवर्ग व गरीब यांच्यात प्रचंड दरी निर्माण झाली आहे. सामान्य माणसाच्या प्रश्नांच्या वाव मिळत नाही. सर्वसामान्यांना न्याय प्राप्त करून द्यायचा असेल तर सर्व बहुजनांनी एकत्र येऊन आपला विकास घडवून आणावा, असे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र माणके यांनी केले. संचालन धर्मेश दुपारे यांनी तर सीताराम राठोड यांनी आभार मानले.विविध पुरस्कार प्रदानयावेळी कस्ट्राईब संघटनेतर्फे विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, साहित्यिक डॉ. सरोज आगलावे, माजी शिक्षणाधिकारी एन.ए. ठमके, सामाजिक कार्यकर्ता रमेश फुले, उपायुक्त सुधीर शंभरकर यांना कास्ट्राईब सामाजिक समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. संजय गोडघाटे व राजेश ढेंगरे यांना उत्कृष्ट कामगार, महेंद्र माणके उत्कृष्ट अधिकारी, मिलिंद कीर्ती, अमन कांबळे, शरद नागदिवे, राजेशकुमार सिंग, मनोहर चव्हाण यांना पत्रकारिता तर सिद्धार्थ उके यांना उत्कृष्ट संघटक म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला.

टॅग्स :nagpurनागपूर