शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

इंडिया आघाडी महाराष्ट्रात ४० तर देशात ३०० जागा जिंकेल

By कमलेश वानखेडे | Updated: June 1, 2024 14:13 IST

नाना पटोले यांचा दावा : ४ जून नंतर एकनाथ शिंदे आणि पवार गट राहील की नाही हा प्रश्न !

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा उतरला आहे. राहुल गांधी यांनी जी भूमिका जनतेसमोर मांडली, पदयात्रा केली, जनतेचा आवाज काँग्रेस सोबत होता.लोकांचा प्रतिसाद होता..मोठया प्रमाणात देशात समर्थन केले, ते निकालातून दिसेल. इंडिया आघाडी महाराष्ट्रात ४० तर देशात तीनशेवर जागा जिंकेल असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले,इंडिया आघाडी लोकांच्या आशीर्वादाने बहुमत मिळेल. तातडीने सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण होईल, यावर आज चर्चा नाही. ४ जून नंतर एकनाथ शिंदे आणि पवार गट राहील की नाही हा प्रश्न आहे. तटकरे कुठे आहे, मला त्यावर चर्चा करायची नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात दुष्काळ आहे, पिण्याचे पाणी नाही, शेती पीक नष्ट झाले. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू सत्तेतील लोकांना का दिसत नाही. जनावरांना चारा नाही त्याची काळजी का नाही, दुधाचा भाव घसरला आहे. असे असताना मुख्यमंत्री सुट्टीवर आहेत, असा टोला त्यांनी लगावला. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याने सत्ताधारी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

नागपूरात सुद्धा अशीच घटना घडली, जळगाव मध्ये त्यापेक्षा मोठी घटना झाली. गर्भश्रीमंत साठी वेगळा न्याय आणि गरिबांसाठी वेगळा न्याय आहे. जनतेचा जीव सुरक्षित नाही. अग्रवाल बिल्डरला वाचविण्यासाठी कुणी प्रयत्न केले याचे पुरावे आहे. योग्य वेळी खुलासे करू,सरकार लपावा छपवी करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान कोनीही सहन करु शकत नाही, पण मनुस्मृती अभ्यासक्रमात आणण्याचा प्रयत्न होत आहे त्या भाजपचा विरोध आहे, असेही पटोले म्हणाले. बियाने विक्रीत काळाबाजार होत आहे, त्याला सरकार मधील मंत्र्यांचा सहभाग असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आहे.शेतकरी उन्हात उभे राहून बियान्यासाठी रांगा लावत आहे, याकडे सरकारचे लक्ष नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त के

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीSharad Pawarशरद पवार