शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

इंडिया आघाडी महाराष्ट्रात ४० तर देशात ३०० जागा जिंकेल

By कमलेश वानखेडे | Updated: June 1, 2024 14:13 IST

नाना पटोले यांचा दावा : ४ जून नंतर एकनाथ शिंदे आणि पवार गट राहील की नाही हा प्रश्न !

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा उतरला आहे. राहुल गांधी यांनी जी भूमिका जनतेसमोर मांडली, पदयात्रा केली, जनतेचा आवाज काँग्रेस सोबत होता.लोकांचा प्रतिसाद होता..मोठया प्रमाणात देशात समर्थन केले, ते निकालातून दिसेल. इंडिया आघाडी महाराष्ट्रात ४० तर देशात तीनशेवर जागा जिंकेल असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले,इंडिया आघाडी लोकांच्या आशीर्वादाने बहुमत मिळेल. तातडीने सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण होईल, यावर आज चर्चा नाही. ४ जून नंतर एकनाथ शिंदे आणि पवार गट राहील की नाही हा प्रश्न आहे. तटकरे कुठे आहे, मला त्यावर चर्चा करायची नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात दुष्काळ आहे, पिण्याचे पाणी नाही, शेती पीक नष्ट झाले. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू सत्तेतील लोकांना का दिसत नाही. जनावरांना चारा नाही त्याची काळजी का नाही, दुधाचा भाव घसरला आहे. असे असताना मुख्यमंत्री सुट्टीवर आहेत, असा टोला त्यांनी लगावला. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याने सत्ताधारी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

नागपूरात सुद्धा अशीच घटना घडली, जळगाव मध्ये त्यापेक्षा मोठी घटना झाली. गर्भश्रीमंत साठी वेगळा न्याय आणि गरिबांसाठी वेगळा न्याय आहे. जनतेचा जीव सुरक्षित नाही. अग्रवाल बिल्डरला वाचविण्यासाठी कुणी प्रयत्न केले याचे पुरावे आहे. योग्य वेळी खुलासे करू,सरकार लपावा छपवी करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान कोनीही सहन करु शकत नाही, पण मनुस्मृती अभ्यासक्रमात आणण्याचा प्रयत्न होत आहे त्या भाजपचा विरोध आहे, असेही पटोले म्हणाले. बियाने विक्रीत काळाबाजार होत आहे, त्याला सरकार मधील मंत्र्यांचा सहभाग असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आहे.शेतकरी उन्हात उभे राहून बियान्यासाठी रांगा लावत आहे, याकडे सरकारचे लक्ष नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त के

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीSharad Pawarशरद पवार