शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आंतरजातीय विवाहासाठी होणार स्वतंत्र कायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 21:18 IST

महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. माहितीचा अधिकार कायदा असो की, मनरेगासारखी योजना असो, महाराष्ट्राने देशाला नेहमीच दिशा देण्याचे काम केले आहे. राज्याची ही परंपरा अशीच कायम असून आता महाराष्ट्र सरकारने आंतरजातीय विवाहाबाबत स्वतंत्र कायदा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देराज्य शासनाचा पुढाकार : सी.एल. थूल यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. माहितीचा अधिकार कायदा असो की, मनरेगासारखी योजना असो, महाराष्ट्राने देशाला नेहमीच दिशा देण्याचे काम केले आहे. राज्याची ही परंपरा अशीच कायम असून आता महाराष्ट्र सरकारने आंतरजातीय विवाहाबाबत स्वतंत्र कायदा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.आंतरजातीय विवाहाबाबत स्वतंत्र कायदा तयार करण्यासाठी शासनाने राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य सी.एल. थूल यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती गठित केली आली आहे. या समितीमध्ये अध्यक्षांसह एकूण सात सदस्यांचा समावेश आहे. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे हे या समितीचे सदस्य सचिव आहेत तर विधि व न्याय विभागाचे सहसचिव अविनाश बनकर, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी अ‍ॅड. केवल उके, मुंबईतील सहयोगी प्राध्यापक प्रा. डॉ. संदेश वाघ, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा इंगळे, आणि ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.नागपूरचे कृष्णा इंगळे ह कामगार नेते असून यापूर्वी ते राज्य शासनाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध ऐतिहासिक सांस्कृतिक स्थळ संशोधन समितीमध्ये होते. त्यांनी महापुरुषांचे वास्तव्य लाभलेली महाराष्ट्रातील एकूण ४२ स्थळे शोधून शासनाला सादर केली. ती सर्व स्थळे शासनाने मंजूर केली आहेत, हे विशेष.स्वजातीत विवाह करणाऱ्या मुलींसाठी कायद्याचे संरक्षण आहे. परंतु आंतरजातीय विवाह करणाºया मुला-मुलींना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागतो. जीवन जगताना त्यांना अनेक अडचणी येतात. अनेक सामाजिक अडचणी निर्माण होतात. या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य शासनाने आंतरजातीय विवाहाबाबत स्वतंत्र कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे. मसुदा समिती यासर्व बाबींचा विचार करून एक आदर्श कायद्याच्या दृष्टीने मसुदा तयार करणार आहे. हा कायदा झाल्यास तो निश्चितच देशासाठीही एक नवी दिशा देणारा ठरेल, अशी शक्यता आहे.तीन महिन्यात अहवाल सादरराज्य शासनाने गठित केलेल्या या समितीला तीन महिन्यात आपला अहवाल सादर करावयाचा आहे. यासंबंधात गेल्या बुधवारी शासनने जी.आर. काढून तसे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक