शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

देशातील महिलांमधील साक्षरतेचा टक्का वाढीस; पदवीधरांची संख्या ३६ टक्क्यांहून अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 14:53 IST

देशातील साक्षरतेचा दर वाढविण्याचे विविध माध्यमातून प्रयत्न सुरू असून, महिलांचा शिक्षणाचा टक्कादेखील वाढीस लागला आहे.

ठळक मुद्देआदिवासी महिलांमधील निरक्षरतेचा टक्का चिंताजनक

योगेश पांडेनागपूर : देशातील साक्षरतेचा दर वाढविण्याचे विविध माध्यमातून प्रयत्न सुरू असून, महिलांचा शिक्षणाचा टक्कादेखील वाढीस लागला आहे. सद्यस्थितीत देशातील ७९ टक्क्यांहून अधिक महिला साक्षर झालेल्या आहेत. यातील ३६ टक्क्यांहून अधिक महिला या पदवीधारक आहेत. देशातील महिलांची सद्यस्थितीत या विषयावर पुण्यातील दृष्टी या स्वयंसेवी संस्थेतर्फे देशभरात विविध मुद्यांना घेऊन सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील आकडेवारी ही महिलांच्या शिक्षणात बदल दाखविणारी आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार देशातील महिलांचा साक्षरता दर हा ६४.६ टक्के इतका होता. संस्थेच्या देशव्यापी सर्वेक्षणानुसार आठ वर्षांत यात वाढ झाली आहे. साक्षर असलेल्यांपैकी ४६.०५ टक्के महिलांचे शिक्षण हे बारावीपर्यंत झाले आहे, तर १९.२३ टक्के महिला पदवीधारक व १४.२५ टक्के महिला या पदव्युत्तर पदवीधारक आहेत. ०.०९ टक्के महिलांनी आचार्य पदवी प्राप्त केली आहे.सीमाक्षेत्रात साक्षरतेचे प्रमाण कमीदेशाच्या सीमाक्षेत्रातदेखील सर्वेक्षण करण्यात आले. यातील आकडेवारीनुसार जम्मू-काश्मीरमधील २३.८६ टक्के महिला तर पश्चिम बंगालमधील १३.७३ टक्के महिलांनी कधीच शिक्षण घेतलेले नाही.अनुसूचित जातीतील ७० टक्के महिला साक्षर२०११ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीमधील महिलांची साक्षरतेची टक्केवारी ही ५६.५० टक्के इतकी होती, तर आदिवासी महिलांमधील टक्केवारी ही ४९.३५ टक्के इतकीच होती. देशभरात आदिवासी महिलांच्या शिक्षणासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. मात्र त्यामुळे हवा तसा बदल झाला नसल्याचेदेखील सर्वेक्षणातून समोर आले आहे. अनुसूचित जमातीच्या महिलांमधील निरक्षरतेची टक्केवारी ३६.५ टक्के, अनुसूचित जातीच्या महिलांची टक्केवारी ३०.३ टक्के इतकी तर विशेष मागास प्रवर्गातील निरक्षर महिलांची टक्केवारी २९.४ टक्के इतकी आहे.३० टक्के महिला शाळापातळीवरच सोडताहेत शिक्षणसंस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार महिलांना शिक्षण घेण्यासाठी अजूनही बराच संघर्ष करावा लागत आहे. प्रामुख्याने कुटुंबातील आर्थिक समस्या व लग्नामुळे महिलांना शिक्षण सोडावे लागते. साक्षर असलेल्यांपैकी ४९.३२ टक्के महिलांनी पदवीच्या अगोदरच शिक्षण सोडले, तर ३०.७६ टक्के महिलांना शाळापातळीवरच शिक्षण सोडावे लागले.महिलांनीच केले महिलांसाठी सर्वेक्षणदृष्टी या संस्थेतर्फे देशभरातील २९ राज्य व ५ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ७४ हजार ९५ महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले. विशेष बाब म्हणजे सर्वेक्षणाच्या प्रत्येक टप्प्यात महिलाच होत्या. देशभरात सुमारे सात हजार महिलांनीच हे सर्वेक्षण केले.५८ टक्के महिला कौशल्यविकासापासून दूरचमागील पाच वर्षांपासून देशात कौशल्यविकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र ५८.२७ टक्के महिला या कौशल्य विकासापासून दूरच आहेत. या महिलांनी कुठलेही प्रशिक्षण घेतलेले नाही. विशेषत: सीमाक्षेत्र असलेल्या जम्मू-काश्मीर (६२.४२ %), पश्चिम बंगाल (८० %) येथील प्रमाण जास्त आहे. महिलाकेंद्रित क्षेत्रातच कौशल्यविकासाचे प्रशिक्षण घेण्यावर कल दिसून आला. सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या महिलांनी शिवणकाम, फॅशन डिझायनिंगसारख्या कौशल्यविकास उपक्रमाचे प्रशिक्षण घेण्यावर भर दिला आहे. ४६.५२ टक्के महिलांमध्ये कौशल्यविकास प्रशिक्षणामुळे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्याची भावना आहे, तर २०.४७ टक्के महिलांना स्वत:ची ओळख निर्माण झाल्याचे वाटले.५८ टक्के महिला कौशल्यविकासापासून दूरचमागील पाच वर्षांपासून देशात कौशल्यविकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र ५८.२७ टक्के महिला या कौशल्य विकासापासून दूरच आहेत. या महिलांनी कुठलेही प्रशिक्षण घेतलेले नाही. विशेषत: सीमाक्षेत्र असलेल्या जम्मू-काश्मीर (६२.४२ %), पश्चिम बंगाल (८० %) येथील प्रमाण जास्त आहे. महिलाकेंद्रित क्षेत्रातच कौशल्यविकासाचे प्रशिक्षण घेण्यावर कल दिसून आला. सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या महिलांनी शिवणकाम, फॅशन डिझायनिंगसारख्या कौशल्यविकास उपक्रमाचे प्रशिक्षण घेण्यावर भर दिला आहे. ४६.५२ टक्के महिलांमध्ये कौशल्यविकास प्रशिक्षणामुळे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्याची भावना आहे, तर २०.४७ टक्के महिलांना स्वत:ची ओळख निर्माण झाल्याचे वाटले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र