शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पबाधितांचे जीवनमान उंचावणार

By admin | Updated: July 22, 2014 00:55 IST

गोसेखुर्द प्रकल्पबाधित कुटुंबीयांची आर्थिक-सामाजिक परिस्थिती जाणून घेतानाच त्याचे जीवनमान उचांवण्यासाठी उपाययोजना सुचविण्याचे काम सर्वेक्षणात करण्यात येणार आहे. यानिमित्ताने प्रकल्बपाधितांसाठी

गोसेखुर्द : सर्वेक्षणात शासकीय सुविधांचे होणार मूल्यमापनचंद्रशेखर बोबडे - नागपूरगोसेखुर्द प्रकल्पबाधित कुटुंबीयांची आर्थिक-सामाजिक परिस्थिती जाणून घेतानाच त्याचे जीवनमान उचांवण्यासाठी उपाययोजना सुचविण्याचे काम सर्वेक्षणात करण्यात येणार आहे. यानिमित्ताने प्रकल्बपाधितांसाठी शासनाने आतापर्यंत केलेल्या सोयी सुविधांचे मूल्यमापनही होणार आहे.गोसेखुर्द प्रकल्पबाधित कुटुंबीयांच्या सर्वेक्षणासाठी अलीकडेच विभागीय आयुक्त कार्यालयाने नागपूरच्या इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स या संस्थेशी करार केला. हे सर्वेक्षण कोणत्या मुद्यावर आधारित असणार यासंदर्भात संस्थेचे प्राचार्य डॉ. जॉन मेन्चेरी यांच्याशी ‘लोकमत’ने चर्चा केली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.नागपूर जिल्ह्यातील ५१ आणि भंडारा जिल्ह्यातील ३४ गावे गोसीखुर्द प्रकल्पामुळे विस्थापित होणार असून सरासरी १५०० कुटुंबांना याचा फटका बसणार आहे. पुनर्वसनाचा तिढा सोडवायचाच या उद्देशानेच सरकारने दुसऱ्यांदा पॅकेज (११९९ कोटी रुपयांचे) घोषित केल्यानंतरही या कामाने अद्याप गती घेतली नाही. प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने सकारात्मक प्रतिसाद देऊनही स्थलांतरणाचा प्रश्न कायम आहे. त्यामुळेच योग्य पुनर्वसनासाठी या सर्वेक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीचा उपयोग होणार आहे. सर्वेक्षणाच्या कामाला प्रत्यक्षात आॅगस्टपासून सुरुवात होईल. त्यासाठी ४० ते ५० विद्यार्थ्यांची चमू तयार केली जाईल. ही चमू दोन्ही जिल्ह्यातील गावांना भेटी देऊन आवश्यक ती माहिती गोळा करेल. हा सॅम्पल सर्वे (नमुना सर्वेक्षण) असेल. प्रत्येक गावातील सरासरी २० टक्के कुटुंबांची त्यासाठी निवड करण्यात येईल. यात शेतकरी, शेतमजूर, स्वंयरोजगार करणारे तसेच गावातील सर्व समाज घटकांना यात प्रतिनिधित्व दिले जाईल. एकही कुटुंब यातून सुटणार नाही, याची काळजी घेतली जाईल. सुरुवातीला ‘डेटा’ एकत्रित केल्यानंतर घरोघरी भेटी देऊन माहिती संकलित केली जाईल. या कामात शासनाचा अधिकारी व कर्मचाऱ्याचा समावेश नसेल, असे डॉ. जॉन मेन्चेरी म्हणाले. प्रकल्पग्रस्तांना आवश्यक त्या नागरी सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यांचे नवीन गावात जीवनमान उंचावण्यावर प्रशासनाचा भर आहे. त्यादृष्टीनेही हे सर्वेक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी काही पर्याय सुचविण्यात येणार आहे. गावात राहूनच उत्पन्नात भर पाडू शकणारे उद्योग सुरू करता येईल का हा पर्यायही तपासून पाहण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने गृहउद्योग, मत्सव्यवसाय, शेतीपूरक जोड धंदे आणि रेशीम उद्योगाचा समावेश आहे, असे डॉ. जॉन मेन्चेरी म्हणाले.