शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

नागपूर विभागातील जलाशयांमधील साठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:21 IST

नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये आज तारखेत (१७ जून ) रोजी ४२.२६ टक्के इतका पाणीसाठा आहे. यात पाच मोठी धरणे ५० टक्क्यांपेक्षा अधिक भरली आहेत, हे विशेष.

ठळक मुद्देविभागातील धरणात ४२.२६ टक्के साठा पाच धरणे ५० टक्के भरली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात मान्सूनला धडाक्यात सुरुवात झाली. पहिल्या दोन-तीन दिवस चांगला पाऊस झाला. परिणामी जलाशयांमधील साठेही भरू लागले आहेत. नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये आज तारखेत (१७ जून ) रोजी ४२.२६ टक्के इतका पाणीसाठा आहे. यात पाच मोठी धरणे ५० टक्क्यांपेक्षा अधिक भरली आहेत, हे विशेष.नागपूर विभागात एकूण १८ मोठी जलाशये (प्रकल्प) आहेत. याची एकूण पाणीसाठ्याची क्षमता ३५५२.८९ दलघमी इतकी आहे. यात आजच्या तारखेला (१७ जून) १५०१.३८ दलघमी म्हणजे ४२.२६ टक्के इतका पाणीसाठा आहे. जिल्हानिहाय जलसाठ्याचा विचार केला तर नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्पात ७४.७४ टक्के, कामठी खैरी ८४.६३, रामटेक (खिंडसी) १४.४५, लोअर नांद २३.३०, वडगाव ४८.५३ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह ३०.९७ टक्के, सिरपूर २०.९१ , पुजारीटोला ६५.८४, कालीसरार ००, धापेवाडा बॅरेज टप्पा-२ मध्ये २४ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा ७८.६७ टक्के, गडचिरोलीतील दिना प्रकल्पात २१.२८ टक्के, वर्धा जिल्ह्यातील बोर धरणात ४२.५० टक्के, धाम ३८.२८, पोथरा २२.६१ टक्के, लोअर वर्धा ५९.६९ टक्के, भंडारा जिल्ह्यातील बावनथडी २९.०९ टक्के आणि गोसेखुर्द प्रकल्पात ३.५४ टक्के इतका पाणीसाठा आहे.

मध्यम प्रकल्पही ३३ टक्के भरलेनागपूर विभागातील मध्यम प्रकल्पही हळूहळू भरू लागले आहेत. सध्याच्या स्थितीत मध्यम प्रकल्पांमध्ये एकूण ३३.९ टक्के इतका पाणीसाठा आहे. विभागात एकूण ४० मध्यम स्वरूपातील प्रकल्प आहेत. याची एकूण पाणीसाठा क्षमता ५३६.४७ दलघमी इतकी आहे. यात आज १७ जून रोजी १७७.५१ दलघमी इतका पाणीसाठा जमा झालेला आहे.

टॅग्स :Waterपाणी