शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षणाचा कोटा वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:27 IST

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेद्वारे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीचे प्रशिक्षण देण्यात येते. २०१४ मध्ये शासनाने हा निर्णय घेतला होता. पण त्याची अंमलबजावणी २०१८ मध्ये झाली. विद्यापीठनिहाय २५ विद्यार्थी या प्रशिक्षणासाठी निवडले जातात. पण चार वर्षात केवळ २२५ विद्यार्थीच प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शक ले. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने या प्रशिक्षणासाठी जाहिरात काढली आहे. त्यात विद्यापीठनिहाय २५ विद्यार्थ्यांचा कोटा कायम ठेवण्यात आला आहे. हा कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघटनेने केली आहे.

ठळक मुद्देचार वर्षात केवळ २२५ विद्यार्थ्यांना मिळाले प्रशिक्षण : आदिवासी संघटनांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेद्वारे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीचे प्रशिक्षण देण्यात येते. २०१४ मध्ये शासनाने हा निर्णय घेतला होता. पण त्याची अंमलबजावणी २०१८ मध्ये झाली. विद्यापीठनिहाय २५ विद्यार्थी या प्रशिक्षणासाठी निवडले जातात. पण चार वर्षात केवळ २२५ विद्यार्थीच प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शक ले. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने या प्रशिक्षणासाठी जाहिरात काढली आहे. त्यात विद्यापीठनिहाय २५ विद्यार्थ्यांचा कोटा कायम ठेवण्यात आला आहे. हा कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघटनेने केली आहे.केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये राज्यातील इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प आहे. पैशाचा अभाव आणि इतर कारणामुळे आदिवासी विद्यार्थी या परीक्षेकरिता असणारे महागडे खासगी शिकवणी वर्ग लावू शकत नाही, त्यामुळे महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग अंतर्गत असलेल्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे द्वारा त्यांना स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय १५ जुलै २०१४ ला घेण्यात आला. त्याकरिता १ कोटी ८३ लाख २७ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली. राज्यातील ९ विद्यापीठामार्फत २२५ आदिवासी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे प्रस्तावित होते. मात्र तीन वर्ष योजनेची अंमलबजावणी झालीच नाही. आदिवासी विकास परिषदेने केलेल्या पाठपुराव्यामुळे जुलै २०१८ ला प्रशिक्षण सुरू झाले. प्रशिक्षणाची पहिली २२५ विद्यार्थ्यांची बॅच संपली आहे. सन २०१४ चा निर्णय २०१८ ला अमलात आणल्यामुळे ९०० आदिवासी विद्यार्थी प्रशिक्षणपासून मुकले. एका जिल्ह्यातून केवळ सहा विद्यार्थ्यांना संधीमहाराष्ट्र शासनाने २०१९ करीता प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत पूर्वीचीच विद्यार्थी संख्या कायम ठेवली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची कार्य कक्षा चार जिल्ह्यात आहे. म्हणजे एका जिल्ह्यातून फक्त सहा आदिवासी विद्यार्थ्यांनाच संधी मिळेल. संपूर्ण राज्याचा विचार केल्यास अशीच परिस्थिती आहे. आदिवासींची लोकसंख्या बघता प्रत्येक विद्यापीठात विद्यार्थी संख्या १०० करण्यात यावी, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण लाभ घेता यावा यासाठी हे प्रशिक्षण अनिवासी न ठेवता निवासी ठेवावे.दिनेश शेराम, उपाध्यक्ष, आदिवासी विकास परिषद

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगStudentविद्यार्थी