शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

एमबीबीएसमध्ये खुल्या प्रवर्गासाठी जागा वाढवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 05:14 IST

एमबीबीएस अभ्यासक्रमामध्ये खुल्या प्रवर्गासाठी २५९ जागा वाढविण्यात याव्यात अशा मागणीसह परिमल बालंखे व इतर चार विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.

नागपूर : एमबीबीएस अभ्यासक्रमामध्ये खुल्या प्रवर्गासाठी २५९ जागा वाढविण्यात याव्यात अशा मागणीसह परिमल बालंखे व इतर चार विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी गुरुवारी या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर केंद्र व राज्य सरकारसह अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. गेल्यावर्षी एमबीबीएस अभ्यासक्रमामध्ये खुल्या प्रवर्गाला ११३४ जागा मिळाल्या होत्या. यावर्षी आर्थिक दुर्बल घटकांसाठी १०% व सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाकरिता १२ टक्के आरक्षण लागू झाले. त्यामुळे खुल्या प्रवर्गाच्या २५९ जागा कमी झाल्या असून त्यांच्या वाट्याला ८७५ जागा आल्या आहेत. या जागांवर आरक्षित प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांनाही प्रवेश घेण्याची मुभा आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गावर अन्याय झाल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.