शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘मेलिओआयडोसिस’च्या रुग्णांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 10:58 IST

‘मेलिओआयडोसिस’ आजाराचे रुग्ण विशेषत: ग्रामीण भागात वाढायला लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. एका खासगी इस्पितळात मागील तीन महिन्यात १० ते १२ रुग्ण आढळल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देआता कोरोनासारख्या आजाराची धास्ती१५ ते अडीच महिने ताप आजाराचे मुख्य लक्षण

सुमेध वाघमारे

 लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले असलेतरी लोकांमध्ये दहशतीचे वातावरण कायम आहे. यातच या आजाराची लक्षणे असलेला ‘मेलिओआयडोसिस’ आजाराचे रुग्ण विशेषत: ग्रामीण भागात वाढायला लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. एका खासगी इस्पितळात मागील तीन महिन्यात १० ते १२ रुग्ण आढळल्याची माहिती आहे. या आजारात साधारण १५ ते अडीच महिन्यापर्यंत ताप राहतो. सोबतच सांधेदुखी, डोकेदुखी, दम लागणे, खोकला येणे, पायाच्या हाडांमध्ये पस जमा होणे आदी लक्षणे दिसून येतात.

‘मेलिओआयडोसिस’ या आजाराबद्दल ग्रामीण भागातील काही डॉक्टरांना विशेष माहिती नाही. यामुळे सामान्य औषधी देऊनही रुग्ण बरा होत नसल्याने त्याना नागपुरात पाठविले जात आहे. त्यांच्या लक्षणावरून व रक्ताच्या चाचण्यावरून या आजाराचे निदान होत आहे. आतापर्यंत या आजाराचे रुग्ण ब्रह्मपुरी चंद्रपूर, दिग्रस दारव्हा, अकोला, मूर्तिजापूर आणि विदर्भाच्या काही भागात आढळून आले आहेत. मागील तीन ते चार महिन्यात या आजाराचा रुग्णात वाढ झाली आहे, अशी माहिती संसर्गजन्य आजाराचे विशेषज्ञ डॉ. नितीन शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, वर्षाला या आजाराचे तीन ते पाच रुग्ण आढळून यायचे. साधारण ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात हे रुग्ण दिसून यायचे. परंतु या वर्षी रुग्णांची संख्या वाढल्याने खबरदारी घेणे आवश्यक झाले आहे.

जीवाणूमुळे पसरणारा आजार

कोरोना हा विषाणूपासून पसरतो मात्र ‘मेलिओआयडोसिस’ हा आजार जीवाणूपासून पसरतो. गढूळ पाणी, धुळीमध्ये हा टिकून राहतो. हे पाणी प्राशन केल्यास किंवा धुळीतून श्वसनाद्वारे जीवाणू शरीराच्या आत जातो. प्राण्यांमधून हा आजार मनुष्यालाही होऊ शकतो.

निदान उशिरा होण्याचे प्रमाण मोठे

या आजाराचे सर्वाधिक रुग्ण ग्रामीण भागात आढळून येतात. या भागातील फार कमी डॉक्टरांना या आजाराविषयी माहिती आहे. परिणामी, आजाराचे लवकर निदान होत नसल्याने मृत्यूचा धोका संभावतो.

१० पैकी ९ रुग्णांना मृत्यूचा धोका

‘मेलिओआयडोसिस’वर औषध उपलब्ध आहेत. परंतु लवकर निदान होणे आवश्यक आहे. उशिरा निदानामुळे १० पैकी ९ रुग्णांना मृत्यूचा धोका असतो. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी या आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे.

-डॉ. नितीन शिंदे

विशेषज्ञ, संसर्गजन्य आजार

टॅग्स :Healthआरोग्य