शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘मेलिओआयडोसिस’च्या रुग्णांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 10:58 IST

‘मेलिओआयडोसिस’ आजाराचे रुग्ण विशेषत: ग्रामीण भागात वाढायला लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. एका खासगी इस्पितळात मागील तीन महिन्यात १० ते १२ रुग्ण आढळल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देआता कोरोनासारख्या आजाराची धास्ती१५ ते अडीच महिने ताप आजाराचे मुख्य लक्षण

सुमेध वाघमारे

 लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले असलेतरी लोकांमध्ये दहशतीचे वातावरण कायम आहे. यातच या आजाराची लक्षणे असलेला ‘मेलिओआयडोसिस’ आजाराचे रुग्ण विशेषत: ग्रामीण भागात वाढायला लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. एका खासगी इस्पितळात मागील तीन महिन्यात १० ते १२ रुग्ण आढळल्याची माहिती आहे. या आजारात साधारण १५ ते अडीच महिन्यापर्यंत ताप राहतो. सोबतच सांधेदुखी, डोकेदुखी, दम लागणे, खोकला येणे, पायाच्या हाडांमध्ये पस जमा होणे आदी लक्षणे दिसून येतात.

‘मेलिओआयडोसिस’ या आजाराबद्दल ग्रामीण भागातील काही डॉक्टरांना विशेष माहिती नाही. यामुळे सामान्य औषधी देऊनही रुग्ण बरा होत नसल्याने त्याना नागपुरात पाठविले जात आहे. त्यांच्या लक्षणावरून व रक्ताच्या चाचण्यावरून या आजाराचे निदान होत आहे. आतापर्यंत या आजाराचे रुग्ण ब्रह्मपुरी चंद्रपूर, दिग्रस दारव्हा, अकोला, मूर्तिजापूर आणि विदर्भाच्या काही भागात आढळून आले आहेत. मागील तीन ते चार महिन्यात या आजाराचा रुग्णात वाढ झाली आहे, अशी माहिती संसर्गजन्य आजाराचे विशेषज्ञ डॉ. नितीन शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, वर्षाला या आजाराचे तीन ते पाच रुग्ण आढळून यायचे. साधारण ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात हे रुग्ण दिसून यायचे. परंतु या वर्षी रुग्णांची संख्या वाढल्याने खबरदारी घेणे आवश्यक झाले आहे.

जीवाणूमुळे पसरणारा आजार

कोरोना हा विषाणूपासून पसरतो मात्र ‘मेलिओआयडोसिस’ हा आजार जीवाणूपासून पसरतो. गढूळ पाणी, धुळीमध्ये हा टिकून राहतो. हे पाणी प्राशन केल्यास किंवा धुळीतून श्वसनाद्वारे जीवाणू शरीराच्या आत जातो. प्राण्यांमधून हा आजार मनुष्यालाही होऊ शकतो.

निदान उशिरा होण्याचे प्रमाण मोठे

या आजाराचे सर्वाधिक रुग्ण ग्रामीण भागात आढळून येतात. या भागातील फार कमी डॉक्टरांना या आजाराविषयी माहिती आहे. परिणामी, आजाराचे लवकर निदान होत नसल्याने मृत्यूचा धोका संभावतो.

१० पैकी ९ रुग्णांना मृत्यूचा धोका

‘मेलिओआयडोसिस’वर औषध उपलब्ध आहेत. परंतु लवकर निदान होणे आवश्यक आहे. उशिरा निदानामुळे १० पैकी ९ रुग्णांना मृत्यूचा धोका असतो. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी या आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे.

-डॉ. नितीन शिंदे

विशेषज्ञ, संसर्गजन्य आजार

टॅग्स :Healthआरोग्य