शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘मेलिओआयडोसिस’च्या रुग्णांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 10:58 IST

‘मेलिओआयडोसिस’ आजाराचे रुग्ण विशेषत: ग्रामीण भागात वाढायला लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. एका खासगी इस्पितळात मागील तीन महिन्यात १० ते १२ रुग्ण आढळल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देआता कोरोनासारख्या आजाराची धास्ती१५ ते अडीच महिने ताप आजाराचे मुख्य लक्षण

सुमेध वाघमारे

 लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले असलेतरी लोकांमध्ये दहशतीचे वातावरण कायम आहे. यातच या आजाराची लक्षणे असलेला ‘मेलिओआयडोसिस’ आजाराचे रुग्ण विशेषत: ग्रामीण भागात वाढायला लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. एका खासगी इस्पितळात मागील तीन महिन्यात १० ते १२ रुग्ण आढळल्याची माहिती आहे. या आजारात साधारण १५ ते अडीच महिन्यापर्यंत ताप राहतो. सोबतच सांधेदुखी, डोकेदुखी, दम लागणे, खोकला येणे, पायाच्या हाडांमध्ये पस जमा होणे आदी लक्षणे दिसून येतात.

‘मेलिओआयडोसिस’ या आजाराबद्दल ग्रामीण भागातील काही डॉक्टरांना विशेष माहिती नाही. यामुळे सामान्य औषधी देऊनही रुग्ण बरा होत नसल्याने त्याना नागपुरात पाठविले जात आहे. त्यांच्या लक्षणावरून व रक्ताच्या चाचण्यावरून या आजाराचे निदान होत आहे. आतापर्यंत या आजाराचे रुग्ण ब्रह्मपुरी चंद्रपूर, दिग्रस दारव्हा, अकोला, मूर्तिजापूर आणि विदर्भाच्या काही भागात आढळून आले आहेत. मागील तीन ते चार महिन्यात या आजाराचा रुग्णात वाढ झाली आहे, अशी माहिती संसर्गजन्य आजाराचे विशेषज्ञ डॉ. नितीन शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, वर्षाला या आजाराचे तीन ते पाच रुग्ण आढळून यायचे. साधारण ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात हे रुग्ण दिसून यायचे. परंतु या वर्षी रुग्णांची संख्या वाढल्याने खबरदारी घेणे आवश्यक झाले आहे.

जीवाणूमुळे पसरणारा आजार

कोरोना हा विषाणूपासून पसरतो मात्र ‘मेलिओआयडोसिस’ हा आजार जीवाणूपासून पसरतो. गढूळ पाणी, धुळीमध्ये हा टिकून राहतो. हे पाणी प्राशन केल्यास किंवा धुळीतून श्वसनाद्वारे जीवाणू शरीराच्या आत जातो. प्राण्यांमधून हा आजार मनुष्यालाही होऊ शकतो.

निदान उशिरा होण्याचे प्रमाण मोठे

या आजाराचे सर्वाधिक रुग्ण ग्रामीण भागात आढळून येतात. या भागातील फार कमी डॉक्टरांना या आजाराविषयी माहिती आहे. परिणामी, आजाराचे लवकर निदान होत नसल्याने मृत्यूचा धोका संभावतो.

१० पैकी ९ रुग्णांना मृत्यूचा धोका

‘मेलिओआयडोसिस’वर औषध उपलब्ध आहेत. परंतु लवकर निदान होणे आवश्यक आहे. उशिरा निदानामुळे १० पैकी ९ रुग्णांना मृत्यूचा धोका असतो. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी या आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे.

-डॉ. नितीन शिंदे

विशेषज्ञ, संसर्गजन्य आजार

टॅग्स :Healthआरोग्य