शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘मेलिओआयडोसिस’च्या रुग्णांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 10:58 IST

‘मेलिओआयडोसिस’ आजाराचे रुग्ण विशेषत: ग्रामीण भागात वाढायला लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. एका खासगी इस्पितळात मागील तीन महिन्यात १० ते १२ रुग्ण आढळल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देआता कोरोनासारख्या आजाराची धास्ती१५ ते अडीच महिने ताप आजाराचे मुख्य लक्षण

सुमेध वाघमारे

 लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले असलेतरी लोकांमध्ये दहशतीचे वातावरण कायम आहे. यातच या आजाराची लक्षणे असलेला ‘मेलिओआयडोसिस’ आजाराचे रुग्ण विशेषत: ग्रामीण भागात वाढायला लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. एका खासगी इस्पितळात मागील तीन महिन्यात १० ते १२ रुग्ण आढळल्याची माहिती आहे. या आजारात साधारण १५ ते अडीच महिन्यापर्यंत ताप राहतो. सोबतच सांधेदुखी, डोकेदुखी, दम लागणे, खोकला येणे, पायाच्या हाडांमध्ये पस जमा होणे आदी लक्षणे दिसून येतात.

‘मेलिओआयडोसिस’ या आजाराबद्दल ग्रामीण भागातील काही डॉक्टरांना विशेष माहिती नाही. यामुळे सामान्य औषधी देऊनही रुग्ण बरा होत नसल्याने त्याना नागपुरात पाठविले जात आहे. त्यांच्या लक्षणावरून व रक्ताच्या चाचण्यावरून या आजाराचे निदान होत आहे. आतापर्यंत या आजाराचे रुग्ण ब्रह्मपुरी चंद्रपूर, दिग्रस दारव्हा, अकोला, मूर्तिजापूर आणि विदर्भाच्या काही भागात आढळून आले आहेत. मागील तीन ते चार महिन्यात या आजाराचा रुग्णात वाढ झाली आहे, अशी माहिती संसर्गजन्य आजाराचे विशेषज्ञ डॉ. नितीन शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, वर्षाला या आजाराचे तीन ते पाच रुग्ण आढळून यायचे. साधारण ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात हे रुग्ण दिसून यायचे. परंतु या वर्षी रुग्णांची संख्या वाढल्याने खबरदारी घेणे आवश्यक झाले आहे.

जीवाणूमुळे पसरणारा आजार

कोरोना हा विषाणूपासून पसरतो मात्र ‘मेलिओआयडोसिस’ हा आजार जीवाणूपासून पसरतो. गढूळ पाणी, धुळीमध्ये हा टिकून राहतो. हे पाणी प्राशन केल्यास किंवा धुळीतून श्वसनाद्वारे जीवाणू शरीराच्या आत जातो. प्राण्यांमधून हा आजार मनुष्यालाही होऊ शकतो.

निदान उशिरा होण्याचे प्रमाण मोठे

या आजाराचे सर्वाधिक रुग्ण ग्रामीण भागात आढळून येतात. या भागातील फार कमी डॉक्टरांना या आजाराविषयी माहिती आहे. परिणामी, आजाराचे लवकर निदान होत नसल्याने मृत्यूचा धोका संभावतो.

१० पैकी ९ रुग्णांना मृत्यूचा धोका

‘मेलिओआयडोसिस’वर औषध उपलब्ध आहेत. परंतु लवकर निदान होणे आवश्यक आहे. उशिरा निदानामुळे १० पैकी ९ रुग्णांना मृत्यूचा धोका असतो. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी या आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे.

-डॉ. नितीन शिंदे

विशेषज्ञ, संसर्गजन्य आजार

टॅग्स :Healthआरोग्य