शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

नागपुरात गॅस्ट्रोच्या रुग्णांत वाढ : आयसोलेशनमध्ये ९२ रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 01:03 IST

दूषित अन्न व पाण्यामुळे होणाऱ्या गॅस्ट्रो रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या आजारासाठी राखीव असलेला महानगरपालिकेचा आयसोलेशन दवाखान्यामध्ये सोमवारी ९२ रुग्णांनी उपचार घेतले. मेयो, मेडिकलमध्येही या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देमेयो, मेडिकलमध्येही रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दूषित अन्न व पाण्यामुळे होणाऱ्या गॅस्ट्रो रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या आजारासाठी राखीव असलेलामहानगरपालिकेचा आयसोलेशन दवाखान्यामध्ये सोमवारी ९२ रुग्णांनी उपचार घेतले. मेयो, मेडिकलमध्येही या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याची माहिती आहे.उन्हाच्या तडाख्याने उष्माघात, साथरोगाची शक्यता अधिक असते. याच दिवसात पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याने पाण्याच्या शुद्धतेकडे विशेष लक्ष दिले जात नाही. दूषित पाण्यातून पसरणाऱ्या आजारांचा फैलाव वाढतो. यामध्ये गॅस्ट्रो हा आजार प्रामुख्याने दिसून येतो. विषाणू, जीवाणू, बुरशी, परजीवी यांच्या संसर्गामुळे गॅस्ट्रो हा आजार होतो. दूषित पाण्यासोबतच शिळे, अस्वच्छ ठिकाणी तयार केलेले अन्न, उघड्यावर ठेवलेले पदार्थ यावाटे हा संसर्ग होऊ शकतो. उलटी-जुलाब ही रोगाची प्रमुख लक्षणे आहेत. या आजारातून रुग्णांना आजाराच्या सुरुवातीच्या काळात पोटात मुरडा येतो, उलटी आणि जुलाब होतात. दूषित पाणी वा अस्वच्छ अन्न पोटात गेल्यानंतर पुढील १२ ते ७२ तासांमध्येच हा त्रास सुरू होतो. काही रुग्णांमध्ये याची लक्षणे तीव्र असतात. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात मनपाच्या आयसोलेशन दवाखान्याच्या बाह्यरुग्ण विभागात गॅस्ट्रोच्या सुमारे दीड हजार रुग्णांनी तर आंतररुग्ण विभागात ४० रुग्णांनी उपचार घेतल्याची माहिती आहे. एप्रिल महिन्यात रुग्णांची संख्या वाढली असून, सोमवारी ८ एप्रिल रोजी ९२ रुग्णांनी उपचार घेतले.पाण्याच्या शुद्धतेकडे लक्ष द्या-डॉ. गावंडेडॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले, घराबाहेर जाताना पाण्याची बाटली सोबत बाळगा. रस्त्याकडील हातठेल्यांवरील थंडपेय, बर्फाचा गोळा खाऊ नका. अस्वच्छ परिसरातील अन्नपदार्थ खाणे टाळा. पाणीपुरी किंवा तत्सम पदार्थ खाताना विक्रेत्याचे हात स्वच्छ आहेत की नाही, याची खात्री करून घ्या. मधुमेह, रक्तदाब यासारखे आजार असलेले रुग्ण किंवा रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या रुग्णांनी बाहेरील पाणी कटाक्षाने टाळावे. गॅस्ट्रोमध्ये उलटी व जुलाब होतात. ही लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याशिवाय साखर आणि लिंबू घातलेले घरी तयार केलेले सरबत, इलेक्ट्रॉल किंवा ‘ओआरएस’ घेता येईल. या आजारात पचनक्रिया मंदावते. त्यामुळे पचावयास हलके अन्नपदार्थ खावेत. काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर