शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

राज्याच्या तुलनेत नागपुरात कोरोना मृत्यूच्या प्रमाणात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 07:00 IST

राज्यात ८ ऑगस्टपर्यंत १७,३६७ रुग्णांचे मृत्यू झाले. मृतांचे प्रमाण ३.४५ टक्के आहे. त्यातुलनेत नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ८,४०६ झाली असून, मृतांची संख्या २९२ वर पोहचली आहे.

ठळक मुद्देराज्यात ३.४५ टक्के, नागपुरात ३.४७ टक्के ४१ ते ५० वयोगटात सर्वाधिक मृत्यू एप्रिल ते जुलै महिन्यात १२४ तर आठ दिवसात १६८ रुग्णांचा गेला जीव

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधितांच्या मृत्यूसंख्येची भयावह आकडेवारी समोर येत आहे. राज्यात ८ ऑगस्टपर्यंत १७,३६७ रुग्णांचे मृत्यू झाले. मृतांचे प्रमाण ३.४५ टक्के आहे. त्यातुलनेत नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ८,४०६ झाली असून, मृतांची संख्या २९२ वर पोहचली आहे. मृतांचे प्रमाण ३.४७ टक्क्यांवर गेले आहे. राज्याच्या तुलनेत ही किंचित वाढ असली तरी आरोग्य यंत्रणेने सामोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. धक्कादायक म्हणजे, एप्रिल ते जुलै महिन्यात १२४ मृत्यू झाले, तर मागील आठ दिवसात तब्बल १६८ रुग्णांचा जीव गेला आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या जुने विक्रम मोडित काढत आहे. परिणामी, आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे. नागपूर जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली. या महिन्यात संख्या केवळ १६ होती. त्यानंतर एप्रिल महिन्यात १२२ रुग्णांची भर पडून बाधितांची संख्या १३८ झाली. मे महिन्यात ४०३ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या ५४१ झाली. जून महिन्यात ९४१ रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या १५०५ वर पोहचली. जुलै महिन्यात ३,८८७ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने, रुग्णांची संख्या ५,३९२ झाली. तर ऑगस्ट महिन्याच्या ८ तारखेपर्यंत ३,०१४ रुग्णांची भर पडल्याने, रुग्णांची संख्या ८,४०६ वर पोहचली आहे. नागपुरात एप्रिल महिन्यात मृत्यूचा दर १.४४ टक्के होता, मे महिन्यात तो २.०३ टक्क्यावर गेला, जून महिन्यात तो पुन्हा खाली येऊन ०.९९ टक्क्यावर आला. जुलै महिन्यात यात वाढ होऊन १.७८ टक्के तर आता मृत्यूचा दर हा ३.४७ टक्क्यावर पोहचला आहे.तरुण वयात मृत्यूचे प्रमाण अधिक२८ जुलैपर्यंतच्या उपलब्ध माहितीनुसार १ ते १० या वयोगटात १, २१ ते ३० वयोगटात ३, ३१ ते ४० वयोगटात ७, ४१ ते ५० वयोगटात २५, ५१ ते ६० वयोगटात २२, ६१ ते ७० वयोगटात २३, ७१ ते ८० वयोगटात १५ तर ८१ ते ९० वयोगटात ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू ४१ ते ५० वयोगटात झाले आहेत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस