शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

स्थलांतरित श्रमिकांसाठी केल्या गेलेल्या उपाययोजना अपुऱ्या : हायकोर्टाचे निरीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 00:55 IST

स्थलांतरित श्रमिकांसाठी प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत, पण त्या अपुऱ्या आहेत. त्यामुळे आजही हजारो श्रमिक आपापल्या घरी जाण्याकरिता अन्नपाण्याविना शेकडो किलोमीटर पायी प्रवास करीत आहेत, असे परखड निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी संबंधित प्रकरणातील आदेशात नोंदवले.

ठळक मुद्देविविध सुविधा पुरविण्याचे दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्थलांतरित श्रमिकांसाठी प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत, पण त्या अपुऱ्या आहेत. त्यामुळे आजही हजारो श्रमिक आपापल्या घरी जाण्याकरिता अन्नपाण्याविना शेकडो किलोमीटर पायी प्रवास करीत आहेत, असे परखड निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी संबंधित प्रकरणातील आदेशात नोंदवले. तसेच, स्थलांतरित श्रमिकांना विविध आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.लॉकडाऊनमुळे स्थलांतरित श्रमिकांनी रोजगार गमावला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी, ते कुटुंबीयांना घेऊन आपापल्या घरी जाण्यासाठी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करीत आहेत. मिळेल त्या साधनाने पुढे जात आहेत. दरम्यान, त्यांचे अन्नपाण्यापासून हाल होत आहेत. या स्थलांतरितांमध्ये लहान मुले, वृद्ध व गर्भवती महिलांचाही समावेश आहे. ही परिस्थिती संपूर्ण भारतात आहे. स्थलांतरित श्रमिकांच्या मानवाधिकाराचे सर्वत्र उल्लंघन होत आहे, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले.तत्पूर्वी, न्यायालयाने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त नीलेश भरणे व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून दिलेल्या माहितीचा उल्लेख केला. त्यानुसार, ८ मेपर्यंत जिल्ह्यातील १,५३९ श्रमिकांना ४८ बसेसद्वारे मध्य प्रदेश, ९० श्रमिकांना ३ बसेसमधून राजस्थान, १२० श्रमिकांना ३ बसेसमधून छत्तीसगड तर, ६७१ श्रमिकांना १५ बसेसमधून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत पाठविण्यात आले. तसेच, २५० श्रमिकांना रेल्वेद्वारे उत्तर प्रदेशमध्ये पाठविण्यात आले. त्यांच्यासाठी अन्न, पाणी व औषधांची व्यवस्था करण्यात आली. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. एसटी बसेसमधून राज्यातील ५००० नागरिकांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत पोहचवून देण्यात आले तर, परतीच्या प्रवासात बाहेर राज्यातील ३००० महाराष्ट्रीयन नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यांमध्ये सोडून देण्यात आले आहे.सूचनांची अंमलबजावणी करण्याची ग्वाहीप्रकरणावरील सुनावणीदरम्यान करण्यात आलेल्या विविध सूचनांची अंमलबजावणी करण्याची व त्यासंदर्भात १५ मेपर्यंत उत्तर सादर करण्याची ग्वाही राज्य सरकारने न्यायालयाला दिली आहे.रेल्वेला प्रतिवादी केलेस्थलांतरित श्रमिकांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये सोडून देण्यात रेल्वेची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे या प्रकरणात रेल्वेला प्रतिवादी करण्यात आले. न्यायालयाने रेल्वेला नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMigrationस्थलांतरण