शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

पुरवणी परीक्षांचे निकालात नागपूर विभागात दहावीत ४३, बारावीत ४४ टक्के उत्तीर्ण

By निशांत वानखेडे | Updated: July 29, 2025 17:55 IST

पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर : मुलींपेक्षा मुलांचे यश अधिक

नागपूर : राज्य शिक्षण मंडळातर्फे जुन-जुैल काळात घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचे निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आले. यात नागपूर विभागाने समाधानकारक कामगिरी केली आहे. विभागातून दहावीच्या ४३.६६ टक्के आणि बारावीतील ४४.७९ टक्के विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. या उत्तीर्णांचा याचवर्षी अकरावी प्रवेशाचा मार्ग माेकळा झाला आहे. विशेष म्हणजे दहावीच्या परीक्षेमध्ये मुलींपेक्षा मुले व बारावीत मुलांपेक्षा मुलींना अधिक यश मिळविले आहे.

नागपूर विभागात दहावीच्या पुरवणी परीक्षेत नाेंदणी केलेल्या ४,७१५ पैकी ४,६२२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील २०१८ विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. यामध्ये १२६४ मुले आणि ७५४ मुली उत्तीर्ण झाल्या. गडचिराेली जिल्ह्यातील एकमेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत आहे. ५ विद्यार्थी प्रथम श्रेणी आणि ८९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले. पुरवणी परीक्षेत गाेंदिया जिल्ह्यात सर्वाेत्तम (७८.०९) कामगिरी केली, तर नागपूर जिल्हा सर्वात खाली (२७.०१) राहिला.

बारावीच्या परीक्षेत नाेंदणी केलेल्या ८,२७३ पैकी ८,११७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापाैकी ३,६३६ विद्यार्थी (४४.७९ टक्के) उत्तीर्ण झाले. यामध्ये परीक्षा देणाऱ्या २९७० मुलींपैकी १४२९ (४८.११ टक्के) मुली यशस्वी झाल्या, तर ५,१४७ मुलांपैकी २२०७ (४२.८७ टक्के) मुले यशस्वी ठरले. बारावीत पुरवणी परीक्षा देणारे १४५ विद्यार्थी गुणवत्तेत उत्तीर्ण झाले, तर ५११ प्रथम श्रेणी व ६२२ द्वितीय श्रेणीत पास झाले.

दहावीत गाेंदिया सर्वाेत्तम, नागपूर सर्वात खालीजिल्हा            परीक्षार्थी   उत्तीर्ण झाले     टक्केगाेंदिया             २१०           १६४           ७८.०९गडचिराेली        ६९३          ३८१            ५४.९७चंद्रपूर              १०३९         ५४९            ५२.८३भंडारा              ६५१           ३०७            ४७.१५वर्धा                  ६६७         २४९             ३७.३३नागपूर             १३६२         ३६८             २७.०१

बारावीत विज्ञान शाखेचा निकाल सर्वाेत्तमशाखा      परीक्षार्थी     उत्तीर्ण      टक्केविज्ञान      २७४५        १९६३     ७१.५१कला        ३९५४        १२४८      ३१.५६वाणिज्य   १०२५         ३०८         ३०.०४व्हाेकेशनल  ३५८        १०१          २८.२१

अकरावी प्रवेशाचा मार्ग माेकळाफेब्रुवारी-मार्चच्या परीक्षेत अनुत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जावू नये म्हणून जुन-जुलैच्या काळात पुरवणी परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेचा विद्यार्थ्यांना लाभ झाला. त्यामुळे दहावीतील २०१८ विद्यार्थी आता अकरावीत प्रवेश घेऊ शकतील. नागपूर जिल्ह्यातील ३६८ विद्यार्थ्यांची अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत भर पडेल. दुसरीकडे बारावीचे ३६३६ विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतील.

टॅग्स :nagpurनागपूरexamपरीक्षाEducationशिक्षण