शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

क्षणार्धात राखमिश्रीत पाण्याची लाट शिरली आणि घरांची ‘राखरांगाेळी’ झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2022 21:55 IST

Nagpur News काेराडी वीज केंद्रातील राख साचविलेल्या तलावाचा बंधारा फुटल्यामुळे पाच-सहा किलाेमीटरच्या परिसरात त्याचे भीषण परिणाम झाले. म्हसाळा टाेलीवासीयांना राखमिश्रीत पुराचा तडाखा बसला.

ठळक मुद्देम्हसाळा टाेलीवासीयांच्या वेदनाकपडेलत्ते, अन्नधान्य सारे वाहून गेलेकाेराडी वीज केंद्रातून आलेली आपत्ती

 निशांत वानखेडे/मेहा शर्मा

नागपूर : वस्तीतील कर्ते पुरुष मंडळी कामावर गेली हाेती, घरी केवळ बायाबापडे अन् चिल्लेपिल्ले तेवढे राहिले हाेते. दुपारी ३ वाजेची वेळ असेल. लागून असलेल्या नाल्यातील पाण्याचा माेठा लाेंढा वस्तीत शिरला आणि काही कळण्याच्या आत सारं काही उद्ध्वस्त करून गेला. घरात कमरेभर साचलेल्या पाण्यात अन्नधान्य, तेलमीठ, कपडेलत्ते, अंथरून-पांघरून, भांडीकुंडी सारं काही तरंगत हाेते. कुणाला सावरण्याचा वेळच मिळाला नाही. बायाबापडे चिमुकल्यांना घेऊन जीव मुठीत घेऊन सैरभैर धावत सुटले. जगदंबानगर, म्हसाळा टाेलीत राहणाऱ्या नागरिकांनी अनुभवलेली १६ जुलैची ती घटना सांगताना आजही त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला.

काेराडी वीज केंद्रातील राख साचविलेल्या तलावाचा बंधारा फुटल्यामुळे पाच-सहा किलाेमीटरच्या परिसरात त्याचे भीषण परिणाम झाले. म्हसाळा टाेलीवासीयांना राखमिश्रीत पुराचा तडाखा बसला. या वस्तीत रेल्वे रुळाला लागून दीडशेच्यावर कुटुंब राहतात. बहुतेक लाेक हातमजुरी व घरकाम करणारे आहेत. यातील १३ कुटुंबाचे संसारच पुराने उद्ध्वस्त केले. दुपारी ३ वाजता पुराचे पाणी वस्तीत शिरले तेव्हा लाेकांना सावरण्यालाही वेळ मिळाला नाही. घरात कमरेएवढे पाणी भरले हाेते. घरातील सर्व सामान पाण्यावर तरंगत नाल्यामध्ये वाहून गेले. घरात असलेल्या महिला व माणसे लहान मुलांना घेऊन जीव वाचवित उंचावरील रेल्वे रुळाकडे धावले.

पाणी ओसरेपर्यंत तब्बल पाच-सहा तास लाेक रेल्वे रुळाच्या कडेला बसून हाेते. शाळेत गेलेली मुले नाल्याच्या दुसऱ्या बाजूला बसून हाेती. अन्नधान्य, कपडेलत्ते वाहून गेल्याने पाेटात खायलाही काही उरले नाही. काही लाेक मुलांना घेऊन नातलगांकडे गेले तर काहींनी उपाशीपाेटी जागूनच रात्र काढली. दुसऱ्या दिवशी सकाळीच घरी जाता आले. मात्र पाणी ओसरल्यानंतरही घरांमध्ये राखेचा दीड फूट गाळ साचला हाेता. हा चिखल काढतच संपूर्ण दिवस गेला. या राखमिश्रीत पुरात सर्वस्व गमावलेल्या सुजाता साेनटक्के, माेहम्मद गुलजार, इंदिरा अशाेक भाेयर, मुरलीधर ठवकर, नैना संताेष समुद्रे, शांती तामसिंग मडावी, राजेश विश्वकर्मा, संताेष परते, नुरजहां खातून, कांता भाऊराव पाटील यांनी डाेळ्यातील पाणी पुसत लाेकमतजवळ व्यथा मांडली.

चार दिवसांनंतरही राखेचा गाळ

चार दिवस लाेटल्यानंतरही वस्तीत पुराचा चिखल आणि घरात राखेचा गाळ साचला आहे. या पुरामुळे घर पडलेल्या प्रल्हाद बडगुजर यांच्या घरात अजूनही राखेचा गाळ पसरलेला आहे. हा चिखल तुडवित, दुर्गंधी सहन करीतच दिवस काढावा लागताे आहे.

लाेक आले, मदत नाही

पुराच्या तिसऱ्या दिवशी म्हसाळा ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी व काही अधिकाऱ्यांनी येऊन सर्वेक्षण केले. मात्र अद्याप काेणतीही मदत मिळाली नाही. उसनवारी करूनच लाेक माेडलेला संसार उभा करीत आहेत.

टॅग्स :floodपूर