शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

क्षणार्धात राखमिश्रीत पाण्याची लाट शिरली आणि घरांची ‘राखरांगाेळी’ झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2022 21:55 IST

Nagpur News काेराडी वीज केंद्रातील राख साचविलेल्या तलावाचा बंधारा फुटल्यामुळे पाच-सहा किलाेमीटरच्या परिसरात त्याचे भीषण परिणाम झाले. म्हसाळा टाेलीवासीयांना राखमिश्रीत पुराचा तडाखा बसला.

ठळक मुद्देम्हसाळा टाेलीवासीयांच्या वेदनाकपडेलत्ते, अन्नधान्य सारे वाहून गेलेकाेराडी वीज केंद्रातून आलेली आपत्ती

 निशांत वानखेडे/मेहा शर्मा

नागपूर : वस्तीतील कर्ते पुरुष मंडळी कामावर गेली हाेती, घरी केवळ बायाबापडे अन् चिल्लेपिल्ले तेवढे राहिले हाेते. दुपारी ३ वाजेची वेळ असेल. लागून असलेल्या नाल्यातील पाण्याचा माेठा लाेंढा वस्तीत शिरला आणि काही कळण्याच्या आत सारं काही उद्ध्वस्त करून गेला. घरात कमरेभर साचलेल्या पाण्यात अन्नधान्य, तेलमीठ, कपडेलत्ते, अंथरून-पांघरून, भांडीकुंडी सारं काही तरंगत हाेते. कुणाला सावरण्याचा वेळच मिळाला नाही. बायाबापडे चिमुकल्यांना घेऊन जीव मुठीत घेऊन सैरभैर धावत सुटले. जगदंबानगर, म्हसाळा टाेलीत राहणाऱ्या नागरिकांनी अनुभवलेली १६ जुलैची ती घटना सांगताना आजही त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला.

काेराडी वीज केंद्रातील राख साचविलेल्या तलावाचा बंधारा फुटल्यामुळे पाच-सहा किलाेमीटरच्या परिसरात त्याचे भीषण परिणाम झाले. म्हसाळा टाेलीवासीयांना राखमिश्रीत पुराचा तडाखा बसला. या वस्तीत रेल्वे रुळाला लागून दीडशेच्यावर कुटुंब राहतात. बहुतेक लाेक हातमजुरी व घरकाम करणारे आहेत. यातील १३ कुटुंबाचे संसारच पुराने उद्ध्वस्त केले. दुपारी ३ वाजता पुराचे पाणी वस्तीत शिरले तेव्हा लाेकांना सावरण्यालाही वेळ मिळाला नाही. घरात कमरेएवढे पाणी भरले हाेते. घरातील सर्व सामान पाण्यावर तरंगत नाल्यामध्ये वाहून गेले. घरात असलेल्या महिला व माणसे लहान मुलांना घेऊन जीव वाचवित उंचावरील रेल्वे रुळाकडे धावले.

पाणी ओसरेपर्यंत तब्बल पाच-सहा तास लाेक रेल्वे रुळाच्या कडेला बसून हाेते. शाळेत गेलेली मुले नाल्याच्या दुसऱ्या बाजूला बसून हाेती. अन्नधान्य, कपडेलत्ते वाहून गेल्याने पाेटात खायलाही काही उरले नाही. काही लाेक मुलांना घेऊन नातलगांकडे गेले तर काहींनी उपाशीपाेटी जागूनच रात्र काढली. दुसऱ्या दिवशी सकाळीच घरी जाता आले. मात्र पाणी ओसरल्यानंतरही घरांमध्ये राखेचा दीड फूट गाळ साचला हाेता. हा चिखल काढतच संपूर्ण दिवस गेला. या राखमिश्रीत पुरात सर्वस्व गमावलेल्या सुजाता साेनटक्के, माेहम्मद गुलजार, इंदिरा अशाेक भाेयर, मुरलीधर ठवकर, नैना संताेष समुद्रे, शांती तामसिंग मडावी, राजेश विश्वकर्मा, संताेष परते, नुरजहां खातून, कांता भाऊराव पाटील यांनी डाेळ्यातील पाणी पुसत लाेकमतजवळ व्यथा मांडली.

चार दिवसांनंतरही राखेचा गाळ

चार दिवस लाेटल्यानंतरही वस्तीत पुराचा चिखल आणि घरात राखेचा गाळ साचला आहे. या पुरामुळे घर पडलेल्या प्रल्हाद बडगुजर यांच्या घरात अजूनही राखेचा गाळ पसरलेला आहे. हा चिखल तुडवित, दुर्गंधी सहन करीतच दिवस काढावा लागताे आहे.

लाेक आले, मदत नाही

पुराच्या तिसऱ्या दिवशी म्हसाळा ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी व काही अधिकाऱ्यांनी येऊन सर्वेक्षण केले. मात्र अद्याप काेणतीही मदत मिळाली नाही. उसनवारी करूनच लाेक माेडलेला संसार उभा करीत आहेत.

टॅग्स :floodपूर