शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नाश्त्याच्या नादात रेंगाळली वंदे भारत एक्सप्रेस?; अनेकजण हैराण, अधिकाऱ्यांचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 21:03 IST

दोन वर्षांपूर्वी नागपुरातून सुरू झालेली नागपूर बिलासपूर ही वंदे भारत एक्सप्रेस नागपूर स्थानकावरून रोज दुपारी २.५ वाजता सुटते

नरेश डोंगरे नागपूर : नाश्त्याच्या नादात एखादा प्रवासी रेल्वे स्थानकावर रेंगाळला अन् त्याची गाडी सुटून गेल्याचे अनेकदा बघायला, ऐकायला मिळते. मात्र, नाश्ता गाडीत ठेवण्यासाठी एखादी ट्रेनच रेल्वे स्थानकावर रेंगाळल्याची अफलातून घटना आज नागपूर स्थानकावर घडली. विशेष म्हणजे, ही ट्रेन साधी सुधी नव्हे तर सध्या देशभराच्या प्रवाशांच्या आकर्षणाचा विषय ठरलेली वंदे भारत एक्सप्रेस होय ! संबंधित सूत्रांनी दिलेल्या या माहितीचा मात्र ईन्कार करून अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले.

देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन म्हणून वंदे भारत एक्सप्रेसची ओळख असून ही गाडी विलंबाने धावूच शकत नाही, असेही ऐकिवात आहे. प्रत्यक्षात मात्र विलंब सोडा अनेकदा ही गाडी रद्द झाल्याचेही वास्तव आहे. दोन वर्षांपूर्वी नागपुरातून सुरू झालेली नागपूर बिलासपूर ही वंदे भारत एक्सप्रेस नागपूर स्थानकावरून रोज दुपारी २.५ वाजता सुटते. रस्त्यातील ६ थांबे घेत ती रात्री ७.२५ वाजता बिलासपूरला पोहचते. या आरामदायक गाडीत प्रवाशांना चहा-कॉफी, नाश्ता वगैरेची सुविधा मिळते. प्रवाशांच्या माहितीनुसार, या गाडीत प्रवाशांसाठी नाश्ता चढविण्यासाठी उशिर झाला. त्यामुळे 'वेअर ईन माय ट्रेन' अॅप मध्ये या गाडीची सुटण्याची (डिपार्चर) टाईम २.११ वाजता दाखविण्यात आली आहे. संबंधित प्रवाशांच्या माहितीनुसार ही गाडी १० मिनिटे विलंबाने सुटली.

केवळ एकच मिनिटाचा विलंबमध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी मात्र ही गाडी केवळ १ मिनिट उशिराने सुटल्याचे सांगितले. नाश्ता चढविण्याच्या कारणाचा त्यांनी नकार केला. या संबंधाने आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क केला असता त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :railwayरेल्वे