शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

नागपूर विभागात खरिपाच्या ७४.३३ टक्के पेरण्या पूर्ण, कापूस १०० टक्के तर सोयाबिन ९४.३ टक्के!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 19:35 IST

खरिप हंगामामध्ये विभागात ७४.३३ टक्के पेरणी पूर्ण झाली असून यामध्ये वर्धा जिल्ह्यात सरासरी ४ लाख ११ हजार ९३७ तुलनेत ४ लाख ४ हजार ९५६ हेक्टर पेरणी झाली आहे.

- आनंद डेकाटे

नागपूर : विभागात सर्वत्र पाऊस पडत असून खरिप पिकांच्या पेरण्या अंतिम टप्यात आहेत. विभागातील मुख्य पिकाखाली क्षेत्रापैकी १९ लाख १४ हजार ७६६ हेक्टर क्षेत्रापैकी १४ लाख २३ हजार ३२० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या असून सरासरी ७४.३३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली जिल्ह्यात भात रोवणीला सुरुवात झाली असून विभागात ४३ टक्के पेक्षा जास्त भार रोवणी आटोपली आहे. या जिल्ह्यामध्ये भात रोवणीला गती आली आहे.

खरिप हंगामामध्ये विभागात ७४.३३ टक्के पेरणी पूर्ण झाली असून यामध्ये वर्धा जिल्ह्यात सरासरी ४ लाख ११ हजार ९३७ तुलनेत ४ लाख ४ हजार ९५६ हेक्टर पेरणी झाली आहे. (९८.३१ टक्के), नागपूर जिल्ह्यात सरासरी ४ लाख ६५ हजार ३२७ च्या तुलनेत ३ लाख ८६ हजार ३११ हेक्टर (८३.०२), भंडारा जिल्ह्यात सरासरी १ लाख ८६ हजार १५३ च्या तुलनेत १ लाख ५ हजार २४९ (५६.५४ टक्के), गोंदिया जिल्ह्यात १ लाख ८७ हजार ७१५ च्या तुलनेत १ लाख ६ हजार १२१ (५६.५३ टक्के), चंद्रपूर जिल्ह्यात ४ लाख ५८ हजार ६७० च्या तुलनेत ३ लाख ३८ हजार ९९७ (७३.०९ टक्के) तर गडचिरोली जिल्ह्यात सरासरी २ लाख ४ हजार ९६२ च्या तुलनेत ८१ हजार ७०७ हेक्टर (३९.८६ टक्के) पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

विभागात कापूस तसेच सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली असून १००.६४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये नागपूर जिल्ह्यात १०२.३३ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यात १०५.३ टक्के, वर्धा जिल्ह्यात ९६.१६ टक्के, भंडारा जिल्ह्यात ८४.६४ टक्के तर गडचिरोली जिल्ह्यात ९६.४५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सोयाबीन पिकाखाली असलेल्या सरासरी क्षेत्रापैकी ९४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून सर्वाधिक भंडारा जिल्ह्यात १४९.५६ टक्के, वर्धा जिल्ह्यात १०६.९४ टक्के, नागपूर जिल्ह्यात ९०.१२ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यात ७९.७९ टक्के तर गडचिरोली जिल्ह्यात ८६.४४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. खरिप हंगामामध्ये तूर, मुग, उडिद, तृणधान्य, कडधान्य, यासोबतच भुईमुग, तीळ इतर गळित धान्य यासह ऊसाची नवीन लागवड झाली आहे. ऊसाच्या एकुण क्षेत्रापैकी २६ टक्के लागवड नवीन क्षेत्रात झाली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी