शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नागपूर विभागात खरिपाच्या ७४.३३ टक्के पेरण्या पूर्ण, कापूस १०० टक्के तर सोयाबिन ९४.३ टक्के!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 19:35 IST

खरिप हंगामामध्ये विभागात ७४.३३ टक्के पेरणी पूर्ण झाली असून यामध्ये वर्धा जिल्ह्यात सरासरी ४ लाख ११ हजार ९३७ तुलनेत ४ लाख ४ हजार ९५६ हेक्टर पेरणी झाली आहे.

- आनंद डेकाटे

नागपूर : विभागात सर्वत्र पाऊस पडत असून खरिप पिकांच्या पेरण्या अंतिम टप्यात आहेत. विभागातील मुख्य पिकाखाली क्षेत्रापैकी १९ लाख १४ हजार ७६६ हेक्टर क्षेत्रापैकी १४ लाख २३ हजार ३२० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या असून सरासरी ७४.३३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली जिल्ह्यात भात रोवणीला सुरुवात झाली असून विभागात ४३ टक्के पेक्षा जास्त भार रोवणी आटोपली आहे. या जिल्ह्यामध्ये भात रोवणीला गती आली आहे.

खरिप हंगामामध्ये विभागात ७४.३३ टक्के पेरणी पूर्ण झाली असून यामध्ये वर्धा जिल्ह्यात सरासरी ४ लाख ११ हजार ९३७ तुलनेत ४ लाख ४ हजार ९५६ हेक्टर पेरणी झाली आहे. (९८.३१ टक्के), नागपूर जिल्ह्यात सरासरी ४ लाख ६५ हजार ३२७ च्या तुलनेत ३ लाख ८६ हजार ३११ हेक्टर (८३.०२), भंडारा जिल्ह्यात सरासरी १ लाख ८६ हजार १५३ च्या तुलनेत १ लाख ५ हजार २४९ (५६.५४ टक्के), गोंदिया जिल्ह्यात १ लाख ८७ हजार ७१५ च्या तुलनेत १ लाख ६ हजार १२१ (५६.५३ टक्के), चंद्रपूर जिल्ह्यात ४ लाख ५८ हजार ६७० च्या तुलनेत ३ लाख ३८ हजार ९९७ (७३.०९ टक्के) तर गडचिरोली जिल्ह्यात सरासरी २ लाख ४ हजार ९६२ च्या तुलनेत ८१ हजार ७०७ हेक्टर (३९.८६ टक्के) पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

विभागात कापूस तसेच सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली असून १००.६४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये नागपूर जिल्ह्यात १०२.३३ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यात १०५.३ टक्के, वर्धा जिल्ह्यात ९६.१६ टक्के, भंडारा जिल्ह्यात ८४.६४ टक्के तर गडचिरोली जिल्ह्यात ९६.४५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सोयाबीन पिकाखाली असलेल्या सरासरी क्षेत्रापैकी ९४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून सर्वाधिक भंडारा जिल्ह्यात १४९.५६ टक्के, वर्धा जिल्ह्यात १०६.९४ टक्के, नागपूर जिल्ह्यात ९०.१२ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यात ७९.७९ टक्के तर गडचिरोली जिल्ह्यात ८६.४४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. खरिप हंगामामध्ये तूर, मुग, उडिद, तृणधान्य, कडधान्य, यासोबतच भुईमुग, तीळ इतर गळित धान्य यासह ऊसाची नवीन लागवड झाली आहे. ऊसाच्या एकुण क्षेत्रापैकी २६ टक्के लागवड नवीन क्षेत्रात झाली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी