शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

नागपूर विभागात खरिपाच्या ७४.३३ टक्के पेरण्या पूर्ण, कापूस १०० टक्के तर सोयाबिन ९४.३ टक्के!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 19:35 IST

खरिप हंगामामध्ये विभागात ७४.३३ टक्के पेरणी पूर्ण झाली असून यामध्ये वर्धा जिल्ह्यात सरासरी ४ लाख ११ हजार ९३७ तुलनेत ४ लाख ४ हजार ९५६ हेक्टर पेरणी झाली आहे.

- आनंद डेकाटे

नागपूर : विभागात सर्वत्र पाऊस पडत असून खरिप पिकांच्या पेरण्या अंतिम टप्यात आहेत. विभागातील मुख्य पिकाखाली क्षेत्रापैकी १९ लाख १४ हजार ७६६ हेक्टर क्षेत्रापैकी १४ लाख २३ हजार ३२० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या असून सरासरी ७४.३३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली जिल्ह्यात भात रोवणीला सुरुवात झाली असून विभागात ४३ टक्के पेक्षा जास्त भार रोवणी आटोपली आहे. या जिल्ह्यामध्ये भात रोवणीला गती आली आहे.

खरिप हंगामामध्ये विभागात ७४.३३ टक्के पेरणी पूर्ण झाली असून यामध्ये वर्धा जिल्ह्यात सरासरी ४ लाख ११ हजार ९३७ तुलनेत ४ लाख ४ हजार ९५६ हेक्टर पेरणी झाली आहे. (९८.३१ टक्के), नागपूर जिल्ह्यात सरासरी ४ लाख ६५ हजार ३२७ च्या तुलनेत ३ लाख ८६ हजार ३११ हेक्टर (८३.०२), भंडारा जिल्ह्यात सरासरी १ लाख ८६ हजार १५३ च्या तुलनेत १ लाख ५ हजार २४९ (५६.५४ टक्के), गोंदिया जिल्ह्यात १ लाख ८७ हजार ७१५ च्या तुलनेत १ लाख ६ हजार १२१ (५६.५३ टक्के), चंद्रपूर जिल्ह्यात ४ लाख ५८ हजार ६७० च्या तुलनेत ३ लाख ३८ हजार ९९७ (७३.०९ टक्के) तर गडचिरोली जिल्ह्यात सरासरी २ लाख ४ हजार ९६२ च्या तुलनेत ८१ हजार ७०७ हेक्टर (३९.८६ टक्के) पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

विभागात कापूस तसेच सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली असून १००.६४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये नागपूर जिल्ह्यात १०२.३३ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यात १०५.३ टक्के, वर्धा जिल्ह्यात ९६.१६ टक्के, भंडारा जिल्ह्यात ८४.६४ टक्के तर गडचिरोली जिल्ह्यात ९६.४५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सोयाबीन पिकाखाली असलेल्या सरासरी क्षेत्रापैकी ९४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून सर्वाधिक भंडारा जिल्ह्यात १४९.५६ टक्के, वर्धा जिल्ह्यात १०६.९४ टक्के, नागपूर जिल्ह्यात ९०.१२ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यात ७९.७९ टक्के तर गडचिरोली जिल्ह्यात ८६.४४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. खरिप हंगामामध्ये तूर, मुग, उडिद, तृणधान्य, कडधान्य, यासोबतच भुईमुग, तीळ इतर गळित धान्य यासह ऊसाची नवीन लागवड झाली आहे. ऊसाच्या एकुण क्षेत्रापैकी २६ टक्के लागवड नवीन क्षेत्रात झाली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी