शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
गिल 'गोल्डन डक' झाला अन् 'डगआउट'मध्ये बसलेल्या संजूसह पुन्हा चर्चेत आला 'वशीलेबाजी'चा मुद्दा
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात पाच आमदारांपुरती उरलेली काँग्रेस आता सत्तेत येईल, प्रभारी माणिकराव ठाकरे यांचा दावा 

By कमलेश वानखेडे | Updated: December 1, 2023 15:08 IST

एक्झिट पोलमध्ये तेलंगणात काँग्रेसची सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

नागपूर : तेंगणात काँग्रेसला गळली लागली होती. काँग्रेसचे बहुतांश आमदार व नेते पक्ष सोडून गेले. मात्र, पक्षाचा राज्य प्रभारी म्हणून चार्ज घेतल्यानंतर गेले ११ महिने काँग्रेस एकसंघ करण्याचे काम केले. त्यामुळे जनतेते काँग्रेसप्रति विश्वास निर्माण झाला. फक्त पाच आमदारांपुरती उरलेली काँग्रेस आता तेलंगणात सरकार स्थापन करणार आहे. काँग्रेसचे ७० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, असा दावा तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केला.

एक्झिट पोलमध्ये तेलंगणात काँग्रेसची सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लोकमतशी बोलताना तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे म्हणाले, ११ महिन्यांपूर्वी ४ जानेवारी रोजी आपल्याला तेलंगणाचे प्रभारी म्हणून जबाबदारी मिळाली होती. अ.भा. काँग्रेस कमिटीने मदतीला रोहीत चौधरी, विश्नुनाथ व मंसुर अली खान हे तीन सचिव दिले होते. तेलंगणा काँग्रेमध्ये प्रचंड अंतर्गत वाद होते.

सर्वप्रथम स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतले. सर्वांशी समन्वय साधला. कुणाशीही भेदभाव केला नाही. पहिल्या तीन महिन्यात अंतर्गत वाद संपवले व एकत्र होऊन काम करायला सुरवात केली. संघटन महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी पाठबळ दिले. प्रदेशाध्यक्ष रेवंत रे़डी यांनी चांगले काम केले. काँग्रेस एकसंघ आहे असे चित्र जनतोसमोर गेले. त्यामुळे लोकांचाही विश्वास बसला की काँग्रेस लढण्यासाठी ताकदीने पुढे आली आहे.

‘भारत जोडो’मुळे वातावरण निर्मिती- काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळे वातावरण निर्मिती झाली. या यात्रेनंतर झालेल्या राहुल गांधी यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जून खरगे व प्रियंका गांधी यांच्याही सभा झाल्या. शेवटच्या टप्प्यात भाजपसह बऱ्याच पक्षातील लोक काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसचेही गेलेले बरेच परत आले.

केसीआर यांची बॉर्डवरच नाकाबंदी- भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पाय पसरणे सुरू केले होते. मात्र, काँग्रेसने सर्वप्रथम सीमावर्ती भागावर लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे केसीआर यांची बॉर्डवरच नाकाबंदी झाली. शेवटी केसीआर यांना चार महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रातील दौरे बंद करावे लागले. भाजप व टीआरएस मध्ये फाईट होईल, असेच सर्व म्हणत होते. पण आज काँग्रेस स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Telanganaतेलंगणाtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३congressकाँग्रेस