शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

तेलंगणात पाच आमदारांपुरती उरलेली काँग्रेस आता सत्तेत येईल, प्रभारी माणिकराव ठाकरे यांचा दावा 

By कमलेश वानखेडे | Updated: December 1, 2023 15:08 IST

एक्झिट पोलमध्ये तेलंगणात काँग्रेसची सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

नागपूर : तेंगणात काँग्रेसला गळली लागली होती. काँग्रेसचे बहुतांश आमदार व नेते पक्ष सोडून गेले. मात्र, पक्षाचा राज्य प्रभारी म्हणून चार्ज घेतल्यानंतर गेले ११ महिने काँग्रेस एकसंघ करण्याचे काम केले. त्यामुळे जनतेते काँग्रेसप्रति विश्वास निर्माण झाला. फक्त पाच आमदारांपुरती उरलेली काँग्रेस आता तेलंगणात सरकार स्थापन करणार आहे. काँग्रेसचे ७० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, असा दावा तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केला.

एक्झिट पोलमध्ये तेलंगणात काँग्रेसची सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लोकमतशी बोलताना तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे म्हणाले, ११ महिन्यांपूर्वी ४ जानेवारी रोजी आपल्याला तेलंगणाचे प्रभारी म्हणून जबाबदारी मिळाली होती. अ.भा. काँग्रेस कमिटीने मदतीला रोहीत चौधरी, विश्नुनाथ व मंसुर अली खान हे तीन सचिव दिले होते. तेलंगणा काँग्रेमध्ये प्रचंड अंतर्गत वाद होते.

सर्वप्रथम स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतले. सर्वांशी समन्वय साधला. कुणाशीही भेदभाव केला नाही. पहिल्या तीन महिन्यात अंतर्गत वाद संपवले व एकत्र होऊन काम करायला सुरवात केली. संघटन महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी पाठबळ दिले. प्रदेशाध्यक्ष रेवंत रे़डी यांनी चांगले काम केले. काँग्रेस एकसंघ आहे असे चित्र जनतोसमोर गेले. त्यामुळे लोकांचाही विश्वास बसला की काँग्रेस लढण्यासाठी ताकदीने पुढे आली आहे.

‘भारत जोडो’मुळे वातावरण निर्मिती- काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळे वातावरण निर्मिती झाली. या यात्रेनंतर झालेल्या राहुल गांधी यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जून खरगे व प्रियंका गांधी यांच्याही सभा झाल्या. शेवटच्या टप्प्यात भाजपसह बऱ्याच पक्षातील लोक काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसचेही गेलेले बरेच परत आले.

केसीआर यांची बॉर्डवरच नाकाबंदी- भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पाय पसरणे सुरू केले होते. मात्र, काँग्रेसने सर्वप्रथम सीमावर्ती भागावर लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे केसीआर यांची बॉर्डवरच नाकाबंदी झाली. शेवटी केसीआर यांना चार महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रातील दौरे बंद करावे लागले. भाजप व टीआरएस मध्ये फाईट होईल, असेच सर्व म्हणत होते. पण आज काँग्रेस स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Telanganaतेलंगणाtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३congressकाँग्रेस