शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

ट्रायच्या एमआरपी अ‍ॅक्टमध्ये व्हावी सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 12:15 IST

महाराष्ट्र केबल ऑपरेटर्स फाऊंडेशनने टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया(ट्राय)च्या एमआरपी अ‍ॅक्टमध्ये संशोधन करून तो लागू करण्याची मागणी केली आहे. यासाठी तीन महिन्याची मुदत द्यावी, अशी मागणी केबल ऑपरेटर्सनी केली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र केबल ऑपरेटर्स फाऊंडेशनतीन महिन्यांची मागितली मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र केबल ऑपरेटर्स फाऊंडेशनने टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया(ट्राय)च्या एमआरपी अ‍ॅक्टमध्ये संशोधन करून तो लागू करण्याची मागणी केली आहे. यासाठी तीन महिन्याची मुदत द्यावी, अशी मागणी केबल ऑपरेटर्सनी केली आहे. ‘ट्राय’चा १ फेब्रुवारीपासून एमआरपी अ‍ॅक्ट लागू करण्यात येणार आहे. या नवीन कायद्याला केबल ऑपरेटर्सचा सुरुवातीपासूनच विरोध आहे. सोमवारी प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र केबल ऑपरेटर्स फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी नवीन नियम लागू करण्याची तारीख वाढविण्याची मागणी केली आहे.यावेळी महाराष्ट्र केबल ऑपरेटर्स फाऊंडेशनचे विदर्भ संयोजक सुभाष बांते, प्रभात अग्रवाल, विजय कराडे, विवेक शेंडे, नॅलॉड डेव्हिड, श्याम मंडपे, हरविंदर भामरा, कमलेश समर्थ आदी उपस्थित होते.सुभाष बांते यांनी सांगितले की, कुठलीही तयारी न करता ट्रायने नवीन नियम लागू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे केबल ऑपरेटर्ससह ग्राहकांचाही त्रास वाढेल. त्यांनी सांगितले की, तीन महिन्याची मुदत देऊन या कायद्याला सुधारित स्वरूपात लागू करण्यात यावा. मुदत वाढवून केबल ऑपरेटर्सला प्रशिक्षित करण्यात यावे, ग्राहकांना पूर्ण माहिती उपलब्ध करून द्यावी.त्यांनी सांगितले की, या कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता यासाठी आहे की, नियमानुसार पूर्वीची सिंगल चॅनल घेण्याची पद्धत रद्द करीत एकच ब्रॉडकास्ट पॅकेज बनवण्यात आले आहे. ते मागे घेण्यात यावे. यामुळे ग्राहकांना बळजबरीने चॅनल देण्याची पद्धत चुकीची आहे. परंतु आता ही पद्धत लागू केली जात आहे.बांते यांनी सांगितले की, नवीन नियमामध्ये एमएसओ(मल्टी सर्व्हिस ऑपरेटर)आणि केबल ऑपरेटर्सच्या हिताचा विचार करण्यात आलेला नाही. यात सुधारणा व्हावी. फाऊंडेशनने ग्राहक पंचायत, ग्राहक सेवा संघटना यांनाही आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्यावतीने सरकारकडे मागणी करावी की, पूर्वीप्रमाणेच व्यवस्था सुरू ठेवावी. जीएसटी १८ टक्क्यांऐवजी ५ टक्के घेण्यात यावी.

चॅनल रोज बदलवीत आहेत किमतीमहाराष्ट्र केबल ऑपरेटर्स फाऊंडेशनचे प्रभात अग्रवाल यांनी सांगितले की, ट्रायच्या नवीन कायद्यात पे चॅनलचे रेट निर्धारित करण्यात आले आहे. परंतु काही दिवसांपासून पे चॅनल रोज आपले रेट (किमती) बदलवीत आहेत. यामुळे केबल ऑपरेटर्सच्या समस्या वाढतील, कारण ते ग्राहकांना रेट लिस्ट देतात.

नवीन नियम ग्राहकांच्या हिताचेट्रायचे एमआरपीचे नवीन नियम हे ग्राहकांच्या हिताचे आहे. ते बदलण्याची गरज नाही. केबल ऑपरेटर्स हे मनोरंजन कर, प्रोफेशनल टॅक्स आणि त्यांच्याकडे असलेली ग्राहकांची संख्या ही खरंच सांगितल्यानुसार आहे का? हा खरा प्रश्न आहे. केबल ऑपरेटर्सला यात सुधारणा व्हावी असे वाटत असेल तर त्यांनी पत्रपरिषद घेण्याऐवजी न्यायालयात दाद मागावी.देवेंद्र तिवारी, राष्ट्रीय महासचिव,अ.भा. ग्राहक कल्याण परिषद

टॅग्स :Televisionटेलिव्हिजन