शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

सरकारवर १०० कोटीचा दावा खर्च बसवा : हायकोर्टाला विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 20:12 IST

राज्य सरकारने नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सत्यव्रत दत्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अवमानना याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देनासुप्र बरखास्तीवर अवमानना याचिका दाखल

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्य सरकारने नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सत्यव्रत दत्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अवमानना याचिका दाखल केली आहे. त्यात नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणच्या आयुक्त व नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती शीतल तेली-उगले यांच्यावर १०० कोटी रुपये दावा खर्च बसविण्याची व अवमानना कारवाई करण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे.दत्ता यांची नासुप्र बरखास्तीविरुद्धची जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामध्ये उच्च न्यायालयाने नासुप्रशी संबंधित योजना व व्यवहारांसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई केली आहे. यासंदर्भात १३ जून २०१८ रोजी आदेश जारी करण्यात आला आहे. तसेच, १० ऑक्टोबर २०१८ रोजीच्या आदेशाद्वारे राज्य सरकारला ३१ ऑक्टोबर २०१८ पर्यंत नासुप्रचे ऑडिटेड अकाऊन्टस् सादर करण्यास सांगण्यात आले होते. परंतु, सरकारने या दोन्ही आदेशांचे पालन केले नाही असे दत्ता यांचे म्हणणे आहे.२० ऑक्टोबर २०१८ रोजी झालेल्या बैठकीत नासुप्रचे विविध प्रकल्प व ३५१.७३ कोटी रुपये नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. २९ जानेवारी २०१९ रोजी अविकसित ले-आऊट हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ४ जुलै २०१९ रोजीच्या बैठकीनंतर नासुप्रकडे सध्या उपलब्ध असलेले भूखंड, उपलब्ध जमीन, विकण्यात आलेली जमीन, वाटप केलेले भूखंड, उद्याने इत्यादीची माहिती मागण्यात आली. तसेच, ४ जुलै २०१९ रोजी नासुप्र बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन झाले असे दत्ता यांनी याचिकेत नमूद केले आहे. ही याचिका लवकरच सुनावणीसाठी येणार आहे. दत्ता यांच्यातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर कामकाज पाहतील.कलम १२१ चे पालन आवश्यकनागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यास कायद्यातील कलम १२१ मधील तरतुदीचे पालन करणे आवश्यक आहे. या कलमानुसार, नासुप्र कायद्यांतर्गत मंजूर योजना पूर्णपणे अमलात आणल्या गेल्यानंतरच राज्य सरकार अधिसूचना जारी करून नासुप्र बरखास्त करू शकते. सध्या अशा अनेक योजना अर्धवट आहेत. त्यामुळे बरखास्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाऊ शकत नाही असा दावा दत्ता यांनी केला आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयNagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यास