शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारवर १०० कोटीचा दावा खर्च बसवा : हायकोर्टाला विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 20:12 IST

राज्य सरकारने नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सत्यव्रत दत्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अवमानना याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देनासुप्र बरखास्तीवर अवमानना याचिका दाखल

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्य सरकारने नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सत्यव्रत दत्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अवमानना याचिका दाखल केली आहे. त्यात नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणच्या आयुक्त व नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती शीतल तेली-उगले यांच्यावर १०० कोटी रुपये दावा खर्च बसविण्याची व अवमानना कारवाई करण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे.दत्ता यांची नासुप्र बरखास्तीविरुद्धची जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामध्ये उच्च न्यायालयाने नासुप्रशी संबंधित योजना व व्यवहारांसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई केली आहे. यासंदर्भात १३ जून २०१८ रोजी आदेश जारी करण्यात आला आहे. तसेच, १० ऑक्टोबर २०१८ रोजीच्या आदेशाद्वारे राज्य सरकारला ३१ ऑक्टोबर २०१८ पर्यंत नासुप्रचे ऑडिटेड अकाऊन्टस् सादर करण्यास सांगण्यात आले होते. परंतु, सरकारने या दोन्ही आदेशांचे पालन केले नाही असे दत्ता यांचे म्हणणे आहे.२० ऑक्टोबर २०१८ रोजी झालेल्या बैठकीत नासुप्रचे विविध प्रकल्प व ३५१.७३ कोटी रुपये नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. २९ जानेवारी २०१९ रोजी अविकसित ले-आऊट हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ४ जुलै २०१९ रोजीच्या बैठकीनंतर नासुप्रकडे सध्या उपलब्ध असलेले भूखंड, उपलब्ध जमीन, विकण्यात आलेली जमीन, वाटप केलेले भूखंड, उद्याने इत्यादीची माहिती मागण्यात आली. तसेच, ४ जुलै २०१९ रोजी नासुप्र बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन झाले असे दत्ता यांनी याचिकेत नमूद केले आहे. ही याचिका लवकरच सुनावणीसाठी येणार आहे. दत्ता यांच्यातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर कामकाज पाहतील.कलम १२१ चे पालन आवश्यकनागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यास कायद्यातील कलम १२१ मधील तरतुदीचे पालन करणे आवश्यक आहे. या कलमानुसार, नासुप्र कायद्यांतर्गत मंजूर योजना पूर्णपणे अमलात आणल्या गेल्यानंतरच राज्य सरकार अधिसूचना जारी करून नासुप्र बरखास्त करू शकते. सध्या अशा अनेक योजना अर्धवट आहेत. त्यामुळे बरखास्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाऊ शकत नाही असा दावा दत्ता यांनी केला आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयNagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यास