शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील शाळांना सीबीएसई पॅटर्न लागू करणे आत्मघातकी

By निशांत वानखेडे | Updated: March 24, 2025 18:42 IST

शिक्षण तज्ज्ञांचा आराेप : महाराष्ट्राची अस्मिता पणाला लावणारा निर्णय

निशांत वानखेडे, नागपूरनागपूर : राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्याचा निर्णय आत्मघातकी असल्याचा आराेप भाषा व शिक्षण तज्ज्ञांकडून हाेत आहे. अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर मराठी भाषेचीच गळचेपी करण्याचा आणि महाराष्ट्राची अस्मिता पणाला लावण्याचा घाट सरकारने घातल्याची टीका शिक्षण बचाव समन्वय समितीचे समन्वयक रमेश बिजेकर यांनी केली आहे.

पुढच्या वर्षी २०२५-२६ च्या शैक्षणिक सत्रापासुन राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुकाणू समितीच्या शिफारसीनंतर इयत्ता ३ ते १२ पर्यंत सीबीएसई पॅटर्न लागु करण्याची घोषणा राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली. त्यावर शिक्षण तज्ज्ञांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत. सीबीएसई पॅटर्नचे माध्यम काय असेल, याचा स्पष्ट उल्लेख घोषणेमध्ये दिसत नाही. परंतु केंद्रिय शिक्षण बोर्डाचा आराखडा स्विकारल्यानंतर माध्यम इंग्रजी असणार हे उघड आहे. त्यामुळे मराठीचे काय होणार? अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळवला त्याचे काय होणार? शिक्षण अभ्यासक मातृभाषेतुन शिक्षणाचा पुरस्कार करतात त्याचे काय करणार? महाराष्ट्राच्या संस्कृतीचे काय होणार? विविध विचार प्रवाहांनी व संत चळवळीने निर्माण केलेली महाराष्ट्राची संस्कृती सीबीएसई च्या जात्यात भरडल्या जाणार का, असे प्रश्न रमेश बिजेकर यांनी उपस्थित केले आहेत.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये केंद्रीकरणाची भूमिका घेतली आहे आणि महाराष्ट्र सरकारने हे धोरण लागू करुन १४ कोटी महाराष्ट्राच्या जनतेची अस्मिता पणाला लावल्याचा आराेप बिजेकर यांनी केला. गाव-गाड्यातील विद्यार्थी सीबीएसई पॅटर्न मध्ये गुदमरेल. महाराष्ट्राची विविध परंपरा, संस्कृती, सामाजिक व आर्थिक स्तर लक्षात घेता विकेंद्रिकरणाची भूमिका घेणे आवश्यक आहे. राज्यघटनेच्या कलम २४६ व सूची ७ प्रमाणे शिक्षणाचे स्वायत्त अधिकार राज्यांना दिले आहेत. या अधिकाराची पायमल्ली करणारा हा आत्मघातकी निर्णय आहे. आता सीबीएसई पॅटर्न लावुन महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळल्या जाणार आहे. या पॅटर्न मुळे गळतीचे प्रमाण वाढुन शाळाबाह्य विद्यार्थी मोठ्या प्रमाणात वाढतील, अशी भीती बिजेकर यांनी व्यक्त केली.

"राज्य सरकारने सीबीएसई पॅटर्न लागू करण्याचा निर्णय ताबडतोब मागे घेऊन सरकारी शाळांची गुणवत्ता सुधारावी. शिक्षण हक्क कायद्याचे निकष पूर्ण करुन सरकारी शाळांची सुधारना करावी.. शिक्षकांची ताबडतोब भरती करावी. २० पटसंख्या असलेल्या शाळांच्या संचमान्यतेचे निकष बदलावेत आणि वर्ग व विषय निहाय शिक्षक द्यावे."

- रमेश बिजेकर, समन्वयक, शिक्षण बचाव समन्वय समिती

टॅग्स :nagpurनागपूरCBSE Examसीबीएसई परीक्षाSchoolशाळा