शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

राज्यातील शाळांना सीबीएसई पॅटर्न लागू करणे आत्मघातकी

By निशांत वानखेडे | Updated: March 24, 2025 18:42 IST

शिक्षण तज्ज्ञांचा आराेप : महाराष्ट्राची अस्मिता पणाला लावणारा निर्णय

निशांत वानखेडे, नागपूरनागपूर : राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्याचा निर्णय आत्मघातकी असल्याचा आराेप भाषा व शिक्षण तज्ज्ञांकडून हाेत आहे. अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर मराठी भाषेचीच गळचेपी करण्याचा आणि महाराष्ट्राची अस्मिता पणाला लावण्याचा घाट सरकारने घातल्याची टीका शिक्षण बचाव समन्वय समितीचे समन्वयक रमेश बिजेकर यांनी केली आहे.

पुढच्या वर्षी २०२५-२६ च्या शैक्षणिक सत्रापासुन राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुकाणू समितीच्या शिफारसीनंतर इयत्ता ३ ते १२ पर्यंत सीबीएसई पॅटर्न लागु करण्याची घोषणा राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली. त्यावर शिक्षण तज्ज्ञांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत. सीबीएसई पॅटर्नचे माध्यम काय असेल, याचा स्पष्ट उल्लेख घोषणेमध्ये दिसत नाही. परंतु केंद्रिय शिक्षण बोर्डाचा आराखडा स्विकारल्यानंतर माध्यम इंग्रजी असणार हे उघड आहे. त्यामुळे मराठीचे काय होणार? अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळवला त्याचे काय होणार? शिक्षण अभ्यासक मातृभाषेतुन शिक्षणाचा पुरस्कार करतात त्याचे काय करणार? महाराष्ट्राच्या संस्कृतीचे काय होणार? विविध विचार प्रवाहांनी व संत चळवळीने निर्माण केलेली महाराष्ट्राची संस्कृती सीबीएसई च्या जात्यात भरडल्या जाणार का, असे प्रश्न रमेश बिजेकर यांनी उपस्थित केले आहेत.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये केंद्रीकरणाची भूमिका घेतली आहे आणि महाराष्ट्र सरकारने हे धोरण लागू करुन १४ कोटी महाराष्ट्राच्या जनतेची अस्मिता पणाला लावल्याचा आराेप बिजेकर यांनी केला. गाव-गाड्यातील विद्यार्थी सीबीएसई पॅटर्न मध्ये गुदमरेल. महाराष्ट्राची विविध परंपरा, संस्कृती, सामाजिक व आर्थिक स्तर लक्षात घेता विकेंद्रिकरणाची भूमिका घेणे आवश्यक आहे. राज्यघटनेच्या कलम २४६ व सूची ७ प्रमाणे शिक्षणाचे स्वायत्त अधिकार राज्यांना दिले आहेत. या अधिकाराची पायमल्ली करणारा हा आत्मघातकी निर्णय आहे. आता सीबीएसई पॅटर्न लावुन महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळल्या जाणार आहे. या पॅटर्न मुळे गळतीचे प्रमाण वाढुन शाळाबाह्य विद्यार्थी मोठ्या प्रमाणात वाढतील, अशी भीती बिजेकर यांनी व्यक्त केली.

"राज्य सरकारने सीबीएसई पॅटर्न लागू करण्याचा निर्णय ताबडतोब मागे घेऊन सरकारी शाळांची गुणवत्ता सुधारावी. शिक्षण हक्क कायद्याचे निकष पूर्ण करुन सरकारी शाळांची सुधारना करावी.. शिक्षकांची ताबडतोब भरती करावी. २० पटसंख्या असलेल्या शाळांच्या संचमान्यतेचे निकष बदलावेत आणि वर्ग व विषय निहाय शिक्षक द्यावे."

- रमेश बिजेकर, समन्वयक, शिक्षण बचाव समन्वय समिती

टॅग्स :nagpurनागपूरCBSE Examसीबीएसई परीक्षाSchoolशाळा