शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या रानभाज्या झाल्या दुर्मिळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 13:22 IST

महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या रानभाज्या वर्षानुवर्षेपासून लोकांच्या आहाराचा भाग राहिल्या आहेत; मात्र आरोग्यदायी असूनही दुर्लक्षामुळे त्या नामशेष होत आहेत.

ठळक मुद्देकोरानाच्या संकटात संवर्धनाची गरजराज्यात १०४ प्रजातींची नोंद

निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ चा विळखा रोखणारी औषधी सध्यातरी उपलब्ध झाली नाही. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, हाच सर्वोत्तम पर्याय मानला जात आहे. अशावेळी ही प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आहारात रानभाज्यांचा समावेश महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या रानभाज्या वर्षानुवर्षेपासून लोकांच्या आहाराचा भाग राहिल्या आहेत; मात्र आरोग्यदायी असूनही दुर्लक्षामुळे त्या नामशेष होत आहेत. कोरोनाच्या निमित्ताने का होईना, या रानभाज्यांच्या संवर्धनाकडे लक्ष वेधले आहे.

पावसाळा आला की रानावनात, शेतात अनेक प्रकारच्या भाज्या फुलायला लागतात. तरोटा, पातूर, शेपू, रानमेथी किंवा फळ प्रकारातील काटवेल या लोकप्रिय भाज्या. केवळ जंगलात मिळणारे काटवेल खायला चवदार आणि आरोग्यदायी आहेत पण दुर्मिळ असल्याने इतर भाज्यांच्या तुलनेत त्याचे दर कायम अधिकच राहिले आहेत. हायब्रीड काटवेल मिळतात पण त्यात रानातल्या काटवेलाची सर नाही, असे हमखास ऐकायला मिळते.

राज्यात अनेक प्रकारच्या रानभाज्या लोकांच्या आहारात राहिल्या आहेत. त्यातल्या काही कॉमन तर काही विभागानुसार बदलणाºया आहेत. वनस्पतीतज्ज्ञ डॉ. नानासाहेब उगेमुगे व त्यांच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करून रानभाज्यांचे वैशिष्ट्य लोकांसमोर आणले. त्यांच्या सर्वेक्षणानुसार, राज्यात १०४ प्रजातींच्या रानभाज्या आढळून येतात. त्यातील ७६ प्रजाती कॉमन म्हणजे सर्व जिल्ह्यात आढळून येतात. यामध्ये राजगिरा, चवळी, सुरण, सापकांदा, शतावरी, आपटा, कोंदल, काटवेल, रानतरोटा, तरोटा, काटबोर, धोपा, अंबाडी, लाल अंबाडी, उंदिरकानी, रानमेथी, शेवगा, कमळ, लाजाळू, शेपू, चिवडी, घोळ, चिंच, रानपालक या काही कॉमन रानभाज्या आहेत.

२९ प्रकारच्या रानभाज्या या वेगवेगळ्या विभागात दिसून येतात. त्यामध्ये विदर्भात ९, कोकणात ५, मराठवाड्यात ६ आणि खानदेशातील ८ प्रजातींच्या रानभाज्यांचा समावेश असल्याची माहिती डॉ. उगेमुगे यांनी दिली. विदर्भातील भाज्यांमध्ये धानभाजी, गोजिभ, हरदफरी, फासवेल, देवकांदा, झिलबुली, समुद्रशोत, कानफुटी किंवा कपाळफोडी, माक्का आणि पातूरच्या भाजीचा समावेश आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्राय लोकांच्या अन्नात रानभाज्यांचा समावेश राहिला आहे. या भाज्यांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याची क्षमता अधिक असते. मात्र या भाज्यांच्या संवर्धनाकडे हवे तसे लक्ष देण्यात आले नाही. कोरोनाच्या निमित्ताने या भाज्यांच्या संवर्धनाचा विषय महत्त्वाचा झाला आहे.- डॉ. नानासाहेब उगेमुगे, वनस्पतीतज्ज्ञ

 

टॅग्स :vegetableभाज्या